पोळी-भात सोडता आता वजन करता येणार कमी! जाणून घ्या...

मुंबई : वजन कमी करायचं म्हटलं की सर्वात आधी भात, पोळी आणि बटाट्यांना रामराम ठोकावा लागतो, असा समज आजही अनेकांच्या मनात आहे. मात्र आहारतज्ज्ञांनी हा गैरसमज दूर करत वजन घटवण्याचा एक वेगळाच दृष्टिकोन मांडला आहे. खाणं बंद न करता, फक्त खाण्याची वेळ आणि क्रम बदलला तर वजन कमी होऊ शकतं, असं ते सांगतात.


तज्ज्ञांच्या मते, शरीरात चरबी साठण्यामागे ‘इन्सुलिन’ हा हार्मोन महत्त्वाची भूमिका बजावतो. आपण जेव्हा कर्बोदकं खातो, तेव्हा रक्तातील साखर वाढते आणि ती पेशींमध्ये ढकलण्यासाठी इन्सुलिन सक्रिय होतं. इन्सुलिनची पातळी सातत्याने जास्त राहिली तर चरबी साठण्याची प्रक्रिया वेग घेते. त्यामुळे साखरेत अचानक चढउतार होऊ न देणं, हाच वजन नियंत्रणाचा महत्वाचा मुद्दा आहे.


यासाठी अन्नपदार्थ पूर्णपणे टाळण्याऐवजी ते कसे खाल्ले जातात, याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ, भात किंवा बटाटे शिजवल्यानंतर थंड करून पुन्हा गरम केल्यास त्यातील स्टार्चची रचना बदलते. यामुळे साखर हळूहळू वाढते आणि शरीरावर ताण पडत नाही. त्याचबरोबर जेवताना आधी फायबरयुक्त पदार्थ, नंतर प्रथिनं आणि शेवटी भात-पोळी खाल्ल्यास वजन वाढीचा धोका कमी होतो.


दैनंदिन जीवनात हे पाच बदल केल्यास फरक दिसू शकतो. भात आधी शिजवून ठेवून नंतर गरम करून खाणे, रात्रीच्या जेवणात हलके व प्रथिनयुक्त पदार्थ निवडणे, जेवणानंतर थोडं चालणं, नुसती पोळी किंवा ब्रेड न खाता त्यासोबत तूप-दही-भाजी घेणे आणि जेवणाचा योग्य क्रम पाळणे या सवयी वजन कमी करण्यात मदत करतात.


थोडक्यात, उपाशी राहण्याऐवजी योग्य वेळेत खाल्लं, तर शरीर स्वतःच फॅट बर्निंग मोडमध्ये जातं. पोळी-भात खातानाही वजन आटोक्यात ठेवता येऊ शकत.

Comments
Add Comment

Homemade Body Scrub : उन्हाळ्यात 'हे' घरगुती स्क्रब ठरतील फायदेशीर, त्वचा होईल चमदार

उन्हाळ्यात तीव्र ऊन, आर्द्रतेमुळे चेहरा काळवंडतो. कडक उन्हामध्येही चेहरा फ्रेश राहावा, चेहऱ्यावरची चमक कायम

Spirituality to your everyday life : अध्यात्म म्हणजे जगापासून पळणे नव्हे, तर शांततेने जगणे; गौर गोपाल दास यांनी सांगितले दैनंदिन जीवनात अध्यात्म आणण्याचे ५ सोपे मार्ग

मुंबई : आजच्या धावपळीच्या आणि तणावपूर्ण जीवनात 'अध्यात्म' हा शब्द ऐकला की, अनेकांना वाटते की यासाठी घरदार सोडून

तुम्ही एसी आणि इंडक्शन एकाच वेळी वापरत असाल तर सावधान; तुम्हाला दंड होऊ शकतो

मुंबई: एलपीजी सिलिंडरच्या कमतरतेमुळे लोकांनी आपल्या घरात इंडक्शन कुकटॉप वापरायला सुरुवात केली आहे. उन्हाळ्यात

Vijaypat Singhania : कोणत्याही परिस्थितीत यश मिळवण्याचा संदेश देणाऱ्या विजयपत सिंघानिया यांचा प्रेरणादायी जीवनप्रवास जाणून घ्या

मुंबई : उद्योगविश्वातील दिग्गज व्यक्तिमत्व डॉ. विजयपत सिंघानिया (vijay singhania) यांचं शनिवारी सायंकाळी मुंबईत दुख:द निधन

Summer Tips : दही आणि ताक या दोन्हीपैकी उन्हाळ्यात पोटाच्या आरोग्यासाठी काय भारी ? जाणून घ्या

मुंबई : उन्हाळ्याचा तडाखा मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. त्यामुळे अनेकजण उन्हाळ्यात दही आणि ताक घेणं पसंत

उन्हाळ्यात कोल्डड्रिंक्सऐवजी 'या' आरोग्यवर्धक पदार्थाचं सेवन करा, जाणून घ्या फायदे

उन्हाळ्याचा तडाखा सध्या सर्वत्र जाणवत आहे. अनेकजण उन्हाळ्यात फ्रेश राहण्यासाठी आणि घशाची कोरड घालवण्यासाठी