कांदिवली–बोरिवली सहावा ट्रॅक सुरू; महिन्याभराच्या ब्लॉकनंतर पश्चिम रेल्वेने घेतला मोकळा श्वास

मुंबई: पश्चिम रेल्वेवरील सततच्या ब्लॉकमुळे हैराण झालेल्या प्रवाशांसाठी अखेर दिलासादायक बातमी समोर आली आहे. कांदिवली ते बोरिवली दरम्यान उभारण्यात आलेल्या सहाव्या रेल्वे मार्गाचे काम पूर्ण झाले असून १९ जानेवारीपासून या मार्गावर नियमित वाहतूक सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे लोकल आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या वेळापत्रकात निर्माण झालेला गोंधळ हळूहळू संपुष्टात येत आहे.


डिसेंबरच्या उत्तरार्धापासून जानेवारीच्या मध्यापर्यंत सुरू असलेल्या पायाभूत कामांमुळे या विभागात मोठ्या प्रमाणावर लोकल फेऱ्या रद्द कराव्या लागल्या होत्या. रोजच्या प्रवासात उशीर, प्रचंड गर्दी आणि पर्यायी मार्गांचा आधार घ्यावा लागल्याने प्रवासी त्रस्त होते. सहाव्या मार्गिकेचे काम पूर्ण झाल्याने हा ताण आता कमी होण्याची चिन्हे आहेत.


पश्चिम रेल्वेची सहावी मार्गिका मुंबईच्या उपनगरीय रेल्वे जाळयात एक महत्वाचा टप्पा मानली जात आहे. नव्या मार्गामुळे कांदिवली–बोरिवली या अत्यंत वर्दळीच्या पट्ट्यात रेल्वे वाहतुकीची क्षमता वाढणार आहे. लांब पल्ल्याच्या आणि एक्सप्रेस गाड्यांना स्वतंत्र मार्ग मिळाल्याने उपनगरिय लोकलवरील दबाव कमी होणार असून, लोकल सेवा अधिक वेळेवर चालण्यास मदत होणार आहे.


रेल्वे प्रशासनाने या मार्गावर आवश्यक तांत्रिक चाचण्या आणि सुरक्षिततेची प्रक्रिया पूर्ण केली असून मंजुरीनंतरच प्रवासी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. मुंबई सेंट्रल ते बोरिवली विस्तार योजनेतील हा महत्त्वाचा टप्पा मानला जात असून, याचा फायदा पश्चिम रेल्वेने प्रवास करणाऱ्या लाखो मुंबईकरांना होणार आहे.


Comments
Add Comment

Mumbai Monsoon : मुंबईत अखेर मान्सूनची दमदार एन्ट्री! १३ दिवसांच्या प्रतीक्षेनंतर पावसाचे आगमन; पुढील दोन दिवस यलो अलर्ट

मुंबई : मुंबईकरांची प्रतीक्षा अखेर संपली असून मान्सूनने (Monsoon) मंगळवारी मुंबईत अधिकृतपणे प्रवेश केला आहे. यंदा

BMC News : दिव्यांग व्यक्तींद्वारे निर्मित छत्री व रेनकोटचे मुंबईच्या महापौर आणि आयुक्तांकडून कौतुक

महापौर आणि आयुक्तांनी खरेदी केल्या छत्री मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या नियोजन विभागाच्या सहकार्याने आणि ‘दि

Weather Update : महाराष्ट्रासाठी पुढचे २४ तास महत्त्वाचे ! राज्यातील 3० जिल्ह्यांना यलो अलर्ट; लवकरच मान्सूनचे आगमन होणार ?

Mumbai : मुंबईसह राज्यातील काही भागात मंगळवारी (२३ जून ) ला पावसानी हजेरी लावली. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या

Chandrashekhar Bawankule : अहिल्यानगरमध्ये दारुगोळा, स्फोटके, संरक्षण साहित्य, सौरऊर्जा प्रकल्प

शेती महामंडळाची साडेचार हजार एकर जमीन देण्यास महसूल विभागाची मान्यता मुंबई : अहिल्यानगर जिल्ह्यातील हरेगाव मळा

Bhayandar Accident : भाईंदरमध्ये शाळेच्या बसला डंपरची धडक

भाईंदर : शाळेच्या विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या एका बसला मागून येणाऱ्या डंपरने जोरदार धडक दिल्याची घटना

Devendra Fadnavis : सर्वाधिक मूल्य असलेल्या पिकांच्या नुकसानीच्या आकडेवारीसाठी ड्रोनचा वापर करा

 केळी पिकाच्या विम्यासंदर्भात विधानभवनात बैठक; शेतकऱ्यांना तात्काळ भरपाई देण्याचे आदेश मुंबई, : राज्यातील