कांदिवली–बोरिवली सहावा ट्रॅक सुरू; महिन्याभराच्या ब्लॉकनंतर पश्चिम रेल्वेने घेतला मोकळा श्वास

मुंबई: पश्चिम रेल्वेवरील सततच्या ब्लॉकमुळे हैराण झालेल्या प्रवाशांसाठी अखेर दिलासादायक बातमी समोर आली आहे. कांदिवली ते बोरिवली दरम्यान उभारण्यात आलेल्या सहाव्या रेल्वे मार्गाचे काम पूर्ण झाले असून १९ जानेवारीपासून या मार्गावर नियमित वाहतूक सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे लोकल आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या वेळापत्रकात निर्माण झालेला गोंधळ हळूहळू संपुष्टात येत आहे.


डिसेंबरच्या उत्तरार्धापासून जानेवारीच्या मध्यापर्यंत सुरू असलेल्या पायाभूत कामांमुळे या विभागात मोठ्या प्रमाणावर लोकल फेऱ्या रद्द कराव्या लागल्या होत्या. रोजच्या प्रवासात उशीर, प्रचंड गर्दी आणि पर्यायी मार्गांचा आधार घ्यावा लागल्याने प्रवासी त्रस्त होते. सहाव्या मार्गिकेचे काम पूर्ण झाल्याने हा ताण आता कमी होण्याची चिन्हे आहेत.


पश्चिम रेल्वेची सहावी मार्गिका मुंबईच्या उपनगरीय रेल्वे जाळयात एक महत्वाचा टप्पा मानली जात आहे. नव्या मार्गामुळे कांदिवली–बोरिवली या अत्यंत वर्दळीच्या पट्ट्यात रेल्वे वाहतुकीची क्षमता वाढणार आहे. लांब पल्ल्याच्या आणि एक्सप्रेस गाड्यांना स्वतंत्र मार्ग मिळाल्याने उपनगरिय लोकलवरील दबाव कमी होणार असून, लोकल सेवा अधिक वेळेवर चालण्यास मदत होणार आहे.


रेल्वे प्रशासनाने या मार्गावर आवश्यक तांत्रिक चाचण्या आणि सुरक्षिततेची प्रक्रिया पूर्ण केली असून मंजुरीनंतरच प्रवासी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. मुंबई सेंट्रल ते बोरिवली विस्तार योजनेतील हा महत्त्वाचा टप्पा मानला जात असून, याचा फायदा पश्चिम रेल्वेने प्रवास करणाऱ्या लाखो मुंबईकरांना होणार आहे.


Comments
Add Comment

Vinayak Raut : विनायक राऊत यांच्या सुनेच्या छळ प्रकरणात न्यायालयात धक्कादायक खुलासे

- संशयित बाबाच्या दर्ग्यातून लिंबू, टाचण्या, सुगंधी द्रव्ये जप्त; अघोरी कृत्यांचा पोलिसांचा दावा मुंबई : उबाठा

Devendra Fadnavis : २६/११ हल्ल्याबाबत आर. व्ही. एस. मणी यांचे दावे धक्कादायक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी मुंबई : मुंबईवर झालेल्या २६/११ च्या भीषण

Chandrashekhar Bawankule : दुबार पेरणीचा खर्च आता सरकार उचलणार

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती; 'डीपीडीसी'मधून खर्चाची तरतूद करणार मुंबई : पावसाने ओढ दिल्याने आणि

Ashish Shelar : दरवर्षी नाट्यगृहांच्या भाड्यात केवळ 1 ते 2 टक्के वाढ

• कोविडपूर्वीचाच मूळ दर आधारभूत मानणार • नाट्यसृष्टीच्या गोडाऊन व वाहनतळाच्या प्रश्नासाठी महिनाभरात

Navnath Ban : संजय राऊत, इतरांकडे पाहण्यापेक्षा अडगळीत पडलेल्या उबाठाकडे लक्ष द्या - नवनाथ बन

मुंबई : नवनाथ बन यांनी संजय राऊतांवर जोरदार टीका केली. पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले "जनाब संजय राऊत

Nitesh Rane : मच्छिमारांच्या सुरक्षिततेसाठी अत्याधुनिक संप्रेषण व्यवस्था उभारणीसाठी शासन सकारात्मक – मंत्री नितेश राणे

खोल समुद्रातील संपर्कासाठी मच्छिमारांना सॅटेलाईट फोन उपलब्ध करण्यासाठी पुढाकार; बीएसएनएलसोबत समन्वय मुंबई, :