श्रीवर्धन पोलिसांच्या भूमिकेवर संशयाची सुई

माजी सैनिकावरील प्राणघातक हल्ल्याचे प्रकरण


श्रीवर्धन : श्रीवर्धन एसटी स्टँड परिसरात सरकारी कर्मचारी आणि माजी सैनिक कमलाकर गायकवाड यांच्यावर झालेल्या अमानुष मारहाणीच्या प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे. या प्रकरणात श्रीवर्धन पोलिसांनी कमालीची निष्काळजी दाखवत संशयास्पद भूमिका घेतल्याचा गंभीर आरोप होत आहे. पोलिसांनी आरोपींना वाचवण्यासाठी तपासात जाणीवपूर्वक त्रुटी ठेवल्याची चर्चा आता सर्वत्र सुरू झाली आहे.


पीडिताने ४ ते ५ जणांनी हल्ला केल्याचे सांगूनही एफआयआरमध्ये केवळ २ ते ३ जणांचीच नावे का? प्राणघातक हल्ला झालेला असतानाही अजामीनपात्र कलमे लावण्याऐवजी जामीनपात्र कलमे लावून आरोपींना तत्काळ फायदा का मिळवून देण्यात आला?


"अनोळखी आरोपी शोधण्यास वेळ लागेल" असे सांगून पीडिताचा सविस्तर जबाब नोंदवण्यास पोलिसांनी नकार का दिला? घटनेनंतर रात्री उशिरा पीडिताच्या विरोधातच गुन्हा दाखल करून दोन्ही बाजू समसमान दाखवण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला का? एका सरकारी कर्मचाऱ्यावर आणि माजी सैनिकावर हल्ला होऊनही पोलीस तक्रार गांभीर्याने घेत नसल्याने श्रीवर्धन तालुका ग्राम महसूल अधिकारी संघटनेने तीव्र संताप व्यक्त केला आहे.


आंदोलनाचा इशारा


या प्रकरणातील पोलिसांच्या भूमिकेमुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. श्रीवर्धन तालुका ग्राम महसूल अधिकारी संघटनेने या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे. जर दोषींवर कडक कारवाई झाली नाही तर तालुका तीव्र आंदोलनाचा इशारा संघटनेने दिला आहे.

Comments
Add Comment

Murud-Janjira Fort : मुरुड-जंजिरा किल्ल्यावर आता 'हायटेक' जेट्टी

मुरुड-जंजिरा : जागतिक पर्यटनाच्या नकाशावर असलेल्या ऐतिहासिक जंजिरा जलदुर्ग किल्ल्याच्या दर्शनासाठी येणाऱ्या

Raigad : भरडखोल बंदर प्रकल्पामुळे मच्छीमारांना मिळणार अत्याधुनिक सुविधा

श्रीवर्धन : महाराष्ट्रातील मच्छीमारांच्या सोयीसुविधांमध्ये वाढ करण्यासाठी आणि मत्स्यव्यवसायाला चालना

Raigad : रायगड जिल्ह्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील : पर्यटनमंत्री शंभूराज देसाई

मुंबई: रायगड जिल्ह्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी जिल्ह्यात सुरू असलेल्या पर्यटनांच्या कामांना गती

Tourists on Raigad's Beaches : रायगडच्या समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांची विक्रमी गर्दी; समुद्रकिनारे पर्यटकांनी बहरले

रायगड : महाराष्ट्र दिनाची सुट्टी, त्याला जोडून आलेला शनिवार-रविवार आणि शाळांच्या परीक्षा संपल्यानंतर लागलेल्या

चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून भीषण अपघात, २५ वर्षीय चालकाचा चिरडून मृत्यू

श्रीवर्धन – श्रीवर्धन येथे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून भीषण अपघात घडल्याची घटना घडली आहे. म्हसळा

रायगड जिल्ह्यातील अंबा व कुंभे उदंचन जलविद्युत प्रकल्प क्षमतावाढीसाठी CM देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत 'एनटीपीसी'शी सुधारित सामंजस्य करार

मुंबई : एनटीपीसी लिमिटेडच्या रायगड जिल्ह्यातील कुंभे व अंबा उदंचन जलविद्युत प्रकल्पांच्या स्थापित