श्रीवर्धन पोलिसांच्या भूमिकेवर संशयाची सुई

माजी सैनिकावरील प्राणघातक हल्ल्याचे प्रकरण


श्रीवर्धन : श्रीवर्धन एसटी स्टँड परिसरात सरकारी कर्मचारी आणि माजी सैनिक कमलाकर गायकवाड यांच्यावर झालेल्या अमानुष मारहाणीच्या प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे. या प्रकरणात श्रीवर्धन पोलिसांनी कमालीची निष्काळजी दाखवत संशयास्पद भूमिका घेतल्याचा गंभीर आरोप होत आहे. पोलिसांनी आरोपींना वाचवण्यासाठी तपासात जाणीवपूर्वक त्रुटी ठेवल्याची चर्चा आता सर्वत्र सुरू झाली आहे.


पीडिताने ४ ते ५ जणांनी हल्ला केल्याचे सांगूनही एफआयआरमध्ये केवळ २ ते ३ जणांचीच नावे का? प्राणघातक हल्ला झालेला असतानाही अजामीनपात्र कलमे लावण्याऐवजी जामीनपात्र कलमे लावून आरोपींना तत्काळ फायदा का मिळवून देण्यात आला?


"अनोळखी आरोपी शोधण्यास वेळ लागेल" असे सांगून पीडिताचा सविस्तर जबाब नोंदवण्यास पोलिसांनी नकार का दिला? घटनेनंतर रात्री उशिरा पीडिताच्या विरोधातच गुन्हा दाखल करून दोन्ही बाजू समसमान दाखवण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला का? एका सरकारी कर्मचाऱ्यावर आणि माजी सैनिकावर हल्ला होऊनही पोलीस तक्रार गांभीर्याने घेत नसल्याने श्रीवर्धन तालुका ग्राम महसूल अधिकारी संघटनेने तीव्र संताप व्यक्त केला आहे.


आंदोलनाचा इशारा


या प्रकरणातील पोलिसांच्या भूमिकेमुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. श्रीवर्धन तालुका ग्राम महसूल अधिकारी संघटनेने या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे. जर दोषींवर कडक कारवाई झाली नाही तर तालुका तीव्र आंदोलनाचा इशारा संघटनेने दिला आहे.

Comments
Add Comment

Ashok Kharat Case : भोंदू खरातचा उरणमध्ये जमीन खरेदी विक्रीत कोट्यवधींचा झोलझाल

रायगड : अशोक खरात केसमध्ये हे प्रकरण किती खोल आहे याचा अंदाज महाराष्ट्राला येत जात आहे, अशोक खरातचे काळे धंदे करत

Eknath Shinde : 'पात्र लाडक्या बहिणी लाभापासून वंचित राहणार नाहीत'

रायगड : बोरीचा माळ सारख्या छोट्या गावात लक्ष्मी नारायणाचे मंदिर उभे राहिले आहे. त्यामुळे आता तुम्हाला रोज

GI Tag White Onion Production : जीआय टॅग मिळूनही अडचण; पांढऱ्या कांद्याच्या उत्पादनात मोठी घट

रायगड : बदलत्या हवामानाचा मोठा फटका यंदा अलिबाग तालुक्यातील पांढरा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. यावर्षी

Mumbai Goa Expressway : कोकणात विकेंड रश; मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा

माणगाव : उन्हाळी सुट्ट्यांची सुरुवात आणि सलग तीन दिवसांचा विकेंड यामुळे कोकणाच्या दिशेने पर्यटकांचा ओघ प्रचंड

मुंबई-गोवा महामार्गावर बस उलटून भीषण अपघात; ३८ प्रवासी जखमी दोघांचा मृत्यू

नागोठणे : शुक्रवारी ( ३ एप्रिल ) मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या एका खासगी बसचा मुंबई गोवा महामार्गावर अपघात झाला.

कोकणातील दुर्गम भागात ऊर्जेचे नवे पर्व

लघु जलविद्युत विकास योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी अलिबाग : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या