जे साथ देतील त्यांच्यासोबत, अन्यथा त्यांच्याशिवाय पुढे जाऊ!- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; राजकारणात कोणीही शत्रू नाही

मुंबई : “निवडणुका संपल्या, आता आमचा कोणीही शत्रू नाही. जे असतील, ते आमचे वैचारिक विरोधक आहेत. त्यामुळे मुंबईच्या विकासाच्या अजेंड्याला जे साथ देतील, त्यांना सोबत घेऊ. जे साथ देणार नाहीत त्यांच्याशिवाय पुढे जाऊ. पण, मुंबई आता थांबणार नाही”, अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी मांडली.


मुंबई पालिका निवडणुकीत विजयी झालेल्या भाजप उमेदवारांचा शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी नवनिर्वाचित नगरसेवकांना संबोधित करताना ते बोलत होते. या कार्यक्रमाला मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम, मंत्री आशिष शेलार, आमदार प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्यासह भाजपचे मुंबईतील वरिष्ठ नेते उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले, “काहीजण सांगू लागले आहेत, गेल्यावेळी तुमच्या ८२ जागा आल्या होत्या, त्यात आला केवळ ७ जागांची वाढ झाली, तुम्ही असे कोणंते मोठे यश मिळवले. पण, त्यांना मला सांगायचे आहे, गेल्यावेळी आम्ही २२७ जागा लढवल्या होत्या, त्यापैकी ८२ जिंकलो होतो. पण, यंदा १३५ लढवून ८९ जिंकलो आहोत. एकट्या भाजपला मुंबईत ४५ टक्के मतदान झाले. उबाठाचा विचार करता, भाजपपेक्षा ३० अधिक जागा लढवूनही ते २७ टक्क्यांवर आहेत. गेल्या तीन निवडणुकांत जो सगळ्यात मोठा पक्ष होता, त्याला ८९ जागा कधीच मिळाल्या नव्हत्या. भाजपने कमी जागा लढवून देखील, ते साध्य करून दाखवले.”


फडणवीस म्हणाले, मुंबईतील कुठलाही विभाग बघा, झोपडपट्टीपासून ते टोलेजंग इमारतींपर्यंत सगळ्या समाजाने भाजपला मतदान केले आहे. भाषेच्या, जातीच्या पलिकडे, प्रत्येक समाज भाजपसोबत उभा राहिला आहे. विशेषतः जे लोक मराठी माणसाला आपली जहागीर समजत होते, त्यांच्या हे लक्षात आले आहे, की मुंबईतील मराठी माणूस हा विकासासोबत म्हणजे भाजपसोबत आहे. भाजपने सर्वस्पर्शी आणि सर्वव्यापी यश मिळवले आहे. त्यासाठी अमित साटम यांचे अभिनंदन. अध्यक्ष म्हणून त्यांनी खूप चांगले योगदान दिले. निवडणूक प्रमुख आशिष शेलार आणि सगळ्या आमदारांनी पूर्ण ताकदीने आपापल्या क्षेत्रात प्रचंड मोठा विजय खेचून आणला. त्यामुळे हा टीम मुंबई भाजपचा विजय आहे.



आता मराठी माणूस मुंबईबाहेर जाणार नाही


“या विजयाने आम्ही आनंदीत आहोत. पण, हा आनंद उन्मादात परिवर्तीत होऊ देणार नाही. ज्या दिवशी महायुतीचा महापौर मुंबई पालिकेत बसेल, त्याच्या दुसऱ्या दिवशीपासून आम्ही कामाला लागू आणि मुंबईला जगातील उत्तम शहर बनवण्यासाठी प्रयत्न करू. या मुंबईतून एकही मराठी माणूस बाहेर जाणार नाही. झोपडपट्टी, चाळीत, पागडीमध्ये राहणाऱ्या मुंबईकरांना हक्काचे घर देण्याचा संकल्प आम्ही पूर्ण करू. मुंबईची हवा शुद्ध झाली पाहिजे, या अजेंड्यावर काम करू”, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.



मुंबई ‘लिव्हेबल’ आणि ‘लव्हेबल’ बनवू


देवेंद्र फडणवीस म्हणाले, “मी मुंबईकरांना विश्वास देतो, की सध्या हातात घेतलेली विकासकामे पुढच्या दोन-तीन वर्षांत पूर्ण करू आणि नवीन कामे हाती घेऊ. मुंबई ‘लिव्हेबल’ आणि ‘लव्हेबल’ बनवू. सर्व नगरसेवकांना माझी विनंती आहे, की हा विश्वास मुंबईकरांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महायुतीने केलेल्या विकासावर दाखवलेला आहे. त्यामुळे आपल्यापैकी प्रत्येकाला या विश्वासाला पात्र ठरावे लागेल. या महापालिकेत पारदर्शी आणि प्रामाणिकतेने कारभार चालवावा लागेल. मुंबई पालिका पूर्णपणे लोकाभिमूख पद्धतीने चालवावी लागेल, जनतेचेच राज्य महापालिकेत चालले पाहिजे, अशा पद्धतीने कारभार चालवण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे. तरच पुढच्या काळात मुंबईकरांसमोर ताठ मानेने जाता येईल. ”

Comments
Add Comment

Dhurandhar 2 Box Office Collection Day 12 : बॉक्स ऑफिसवर 'धुरंदर २ चं' वादळ! KGF २ च्या विक्रमांना लोळवत ९०० कोटींच्या उंबरठ्यावर!

मुंबई : बॉलिवूडचा सुपरस्टार रणवीर सिंह सध्या आपल्या 'धुरंधर: द रिवेंज' (Dhurandhar 2) या चित्रपटामुळे चर्चेच्या

Shivsena : शिवसेना लोकसभा संपर्क प्रमुखांची नावं जाहीर; पाहा संपूर्ण यादी

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार शिवसेनेच्या लोकसभा संपर्क प्रमुखांची नावं जाहीर करण्यात आली

रझाला हॉटेलमध्ये घेऊन गेला अन्...; शाहीन शाह आफ्रिदीला ठोठावला मोठा दंड

नवी दिल्ली: पाकिस्तान सुपर लीगमध्ये (पीएसएल) आणखी एक घोटाळा उघडकीस आला आहे. या तिसऱ्या स्तरावरील स्पर्धेत

Narhari Zirwal : नरहरी झिरवळ व्हिडिओ प्रकरणात पहिली कारवाई; ट्रान्सजेंडरच्या भावावर मुंबईत गुन्हा दाखल, मोठी माहिती समोर

मुंबई : राज्याचे मंत्री नरहरी झिरवळ एका नवीन वादात सापडले आहेत. त्यांचा एक कथित व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या

नितीश यांच्या विधान परिषद सदस्यपदाच्या राजीनाम्यानंतर राजकीय खळबळ; कोण होणार मुख्यमंत्री?

नवी दिल्ली: मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आज विधान परिषद सदस्यपदाचा राजीनामा दिला. यापूर्वी ते राज्यसभेवर

संयुक्त राष्ट्राचे राजनयिक मोहम्मद सफा यांनी दिला राजीनामा; नेमकं कारण काय?

नवी दिल्ली: इराणमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर, एक महत्त्वपूर्ण बातमी समोर आली आहे, ज्यामुळे