अजित पवारांचे दोन, तर शरद पवारांचा एक नगरसेवक मुंबईत विजयी

मुंबई (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन नगरसेवकांचा विजय झाला असून त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) मुंबईत आपले खाते उघडले आहे. त्यामुळे मुंबईत अजित पवारांचे दोन ते शरद पवार गटाचे दोन नगरसेवक निवडून आले आहेत. मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसने मुंबई ९२ जागा लढवल्या होत्या, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने (शरद पवार) ११ उमेदवार निवडणूूक रिंगणात होते. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन नगरसेवकांनी सकाळीच आपले खाते उघडले. परंतु, सकाळ आणि दुपारपर्यंत या पक्षाचा एकही उमेदवार निवडून न आल्याने त्यांना आपला भोपळाही फोडता आलेला नाही अशा प्रकारच्या चर्चा होत्या; परंतु संध्याकाळी या पक्षाचा पहिला नगरसेवक निवडून आला. भाजपचे महापालिका पक्षनेते विनोद मिश्रा यांचा पराभव केला. मालाड पूर्वमधील प्रभाग क्रमांक ४३मधून भाजपचे विनोद मिश्रा यांचा राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) उमेदवार अजित रावराणे यांनी पराभव केला. या पक्षा हे एकमेव नगरसेवक असून यापूर्वी अजित रावराणे आणि त्यांच्या पत्नी रूपाली रावराणे या नगरसेवक म्हणून निवडून आले होत. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने डॉ. सईदा खान आणि बुशरा मलिक हे उमेदवार निडून आले आहे.
Comments
Add Comment

मुंबईचा पश्चिम आणि पूर्व द्रुतगती महामार्ग पावसाळ्यापूर्वी समतल करा; उपमहापौरांची आयुक्तांकडे निवेदनाद्वारे मागणी

मुंबई: मुंबई महानगरातील रस्त्यांची स्थिती अधिक सुधारण्यासाठी पश्चिम व पूर्व द्रुतगती महामार्ग तसेच प्रमुख

महापालिकेच्यावतीने मुंबई क्लीन लीग स्पर्धा; स्वच्छता विषयक स्पर्धेच्या नोंदणीचा अक्षय कुमार यांच्या उपस्थितीत शुभारंभ

मुंबई: मुंबई अधिक स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याच्या अनुषंगाने, महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीने

मुंबई वॉटर मेट्रो जलवाहतूक प्रकल्पाला गती देण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश

मुंबई : "मुंबई महानगर प्रदेशात जलप्रवासी वाहतुकीसाठी वॉटर मेट्रो प्रकल्प तीन टप्प्यात कार्यान्वित करण्यात

आमदार हेमंत पाटील यांनी मांडली 'लव्ह जिहाद' आणि 'लोकसंख्या नियंत्रणाची' आग्रही भूमिका

विधान परिषदेत धर्मांतर विरोधी विधेयकावर चर्चा मुंबई : विधान परिषदेत आज धर्मांतर विरोधी विधेयकावर अत्यंत

धर्मांतर हा श्रद्धेचा विषय, व्यवहाराचा नाही!"; विधान परिषदेत आमदार प्रवीण दरेकरांची ठाम भूमिका

मुंबई: "धर्म हा केवळ मानवी श्रद्धेचा भाग असून त्याचा व्यवहारासाठी किंवा स्वार्थासाठी वापर करणे चुकीचे आहे.

राज्यातील कालबाह्य ८० कायदे रद्द

विधेयक मंजूर; मुंबई फटक्यांची शिक्षा रद्द करण्याचा अधिनियम रद्द मुंबई : महाराष्ट्रातील कालबाह्य झालेले ८०