मुंबईच्या महापौरपदाबाबत कोणताही वाद नाही : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : मुंबईच्या महापौरपदाबाबत कोणताही वाद नाही महापौरपदाचा निर्णय एकनाथ शिंदे, मी आणि दोन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते एकत्र बसून घेऊ, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी दिली.


राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर होत असले तरी संपूर्ण देशाचे लक्ष मुंबई महानगरपालिकेच्या निकालांकडे लागले होते. या निवडणुकीत भाजप आणि शिवसेना यांच्या महायुतीने स्पष्ट बहुमत मिळवत सत्ता स्थापन करण्याचा मार्ग मोकळा केला आहे. दुसरीकडे उबाठा आणि राज ठाकरे यांच्या मनसेच्या आघाडीने ७० हून अधिक जागांवर विजय मिळवला असून विरोधी बाकांवरही मजबूत उपस्थिती निर्माण केली आहे.


मुंबईत भाजपने ८९ जागांवर विजय मिळवत सर्वात मोठा पक्ष म्हणून आपली ताकद सिद्ध केली आहे. तर महायुतीतील शिवसेनेने २९ जागा जिंकत सत्तेत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. या निकालानंतर आता मुंबईचा पुढील महापौर कोण होणार, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.


महापौरपदाबाबत शिवसेनेतील काही नवनिर्वाचित नगरसेवक आणि नेत्यांनी आपली अपेक्षा व्यक्त केली होती. यावर प्रसारमाध्यमांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारणा केली असता, त्यांनी कोणताही वाद होणार नसल्याचे स्पष्ट केले. महापौरपदाचा निर्णय एकनाथ शिंदे, मी आणि दोन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते एकत्र बसून घेऊ, असे त्यांनी सांगितले.


मुंबई महापौरपदाबाबत बैठक घेऊन सविस्तर चर्चा केली जाईल. महापौर कोण असेल, किती काळासाठी असेल आणि सत्तेचे नियोजन कसे असेल, याचा निर्णय परस्पर समन्वयातून घेतला जाईल. कोणताही संघर्ष न करता दोन्ही पक्ष एकत्रितपणे मुंबईचे प्रशासन सक्षमपणे चालवतील, असा विश्वासही फडणवीस यांनी व्यक्त केला.

Comments
Add Comment

Eknath Shinde : तुम लढो, हम कपडे संभालते हैं’; उद्धव ठाकरेंवर एकनाथ शिंदेंचा घणाघात"

तुम लढो, हम कपडे संभालते हैं' म्हणत हिंदुत्व, मोदी सरकार, पेपर लीक आणि एनडीएच्या वैचारिक भूमिकेवर एकनाथ शिंदेनी

Nashik : नाशिकच्या कांदा बाजारात रोकड टंचाईचे संकट; शेतकऱ्यांच्या देयकांना विलंब

Nashik : नाशिक जिल्ह्यातील कांदा बाजारात (Onion Market) सध्या रोकड टंचाईचे गंभीर संकट निर्माण झाले असल्याचे चित्र आहे आणि

Navnath Ban : संजय राऊत, इतरांकडे पाहण्यापेक्षा अडगळीत पडलेल्या उबाठाकडे लक्ष द्या - नवनाथ बन

मुंबई : नवनाथ बन यांनी संजय राऊतांवर जोरदार टीका केली. पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले "जनाब संजय राऊत

Shrirampur : जेवणाच्या ऑर्डरवरील किरकोळ वादातून हॉटेल व्यावसायिकाचा खून; 'त्या' अफवांवर विश्वास ठेवू नका, पोलिसांचे आवाहन

Shrirampur : श्रीरामपूर शहरात काही दिवसांपूर्वी घडलेल्या हॉटेल व्यावसायिकाच्या खूनप्रकरणाचा उलगडा करत पोलिसांनी

Ketan Agrawal Murder : 'माझ्या मुलाला न्याय द्या', पुणे व्यावसायिक केतन अग्रवाल यांच्या आईचे पंतप्रधान मोदींना भावनिक पत्र

पुणे : पुण्यात हत्या (Murder) झालेल्या रिअल इस्टेट व्यावसायिक केतन अग्रवाल यांच्या आई राखी अग्रवाल यांनी पंतप्रधान

BBL Schedule :ऑस्ट्रेलियाच्या BBL स्पर्धेचे वेळेपत्रक जाहीर; भारतात होणार पहिला सामना ! कुठे आणि कधी जाणून घ्या ?

मुंबई : ऑस्ट्रेलियाच्या बिग बॅस लिगचा १६ वा सीजन लवकरच सुरु होणार आहे. बीबीएलकडून आज (१४ जुलै) रोजी आगामी २०२६-२०२७