मुंबईच्या महापौरपदाबाबत कोणताही वाद नाही : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : मुंबईच्या महापौरपदाबाबत कोणताही वाद नाही महापौरपदाचा निर्णय एकनाथ शिंदे, मी आणि दोन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते एकत्र बसून घेऊ, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी दिली.


राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर होत असले तरी संपूर्ण देशाचे लक्ष मुंबई महानगरपालिकेच्या निकालांकडे लागले होते. या निवडणुकीत भाजप आणि शिवसेना यांच्या महायुतीने स्पष्ट बहुमत मिळवत सत्ता स्थापन करण्याचा मार्ग मोकळा केला आहे. दुसरीकडे उबाठा आणि राज ठाकरे यांच्या मनसेच्या आघाडीने ७० हून अधिक जागांवर विजय मिळवला असून विरोधी बाकांवरही मजबूत उपस्थिती निर्माण केली आहे.


मुंबईत भाजपने ८९ जागांवर विजय मिळवत सर्वात मोठा पक्ष म्हणून आपली ताकद सिद्ध केली आहे. तर महायुतीतील शिवसेनेने २९ जागा जिंकत सत्तेत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. या निकालानंतर आता मुंबईचा पुढील महापौर कोण होणार, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.


महापौरपदाबाबत शिवसेनेतील काही नवनिर्वाचित नगरसेवक आणि नेत्यांनी आपली अपेक्षा व्यक्त केली होती. यावर प्रसारमाध्यमांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारणा केली असता, त्यांनी कोणताही वाद होणार नसल्याचे स्पष्ट केले. महापौरपदाचा निर्णय एकनाथ शिंदे, मी आणि दोन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते एकत्र बसून घेऊ, असे त्यांनी सांगितले.


मुंबई महापौरपदाबाबत बैठक घेऊन सविस्तर चर्चा केली जाईल. महापौर कोण असेल, किती काळासाठी असेल आणि सत्तेचे नियोजन कसे असेल, याचा निर्णय परस्पर समन्वयातून घेतला जाईल. कोणताही संघर्ष न करता दोन्ही पक्ष एकत्रितपणे मुंबईचे प्रशासन सक्षमपणे चालवतील, असा विश्वासही फडणवीस यांनी व्यक्त केला.

Comments
Add Comment

मनपा निवडणुकीच्या निकालानंतर कोल्हापुरात काँग्रेसला धक्का

गोकुळ दूध संघाचे माजी अध्यक्ष विश्वासराव पाटील यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या

जे साथ देतील त्यांच्यासोबत, अन्यथा त्यांच्याशिवाय पुढे जाऊ!- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; राजकारणात कोणीही शत्रू नाही

मुंबई : “निवडणुका संपल्या, आता आमचा कोणीही शत्रू नाही. जे असतील, ते आमचे वैचारिक विरोधक आहेत. त्यामुळे मुंबईच्या

इंदापूरचे माजी नगराध्यक्ष प्रदीप गारटकर यांचा भाजपमध्ये प्रवेश

मुंबई : महापालिका निवडणुकीनंतर भाजपने आता जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीवर लक्ष केंद्रीत केले

राणेंचे घर तोडण्यापासून सुरुवात झाली, आता मातोश्री-२ ची वेळ!

मंत्री नितेश राणेंचा इशारा; ‘जय श्रीराम’चा जयघोष करीत मुंबईत आमचा महापौर विराजमान होणार मुंबई : “उद्धव ठाकरेंनी

महापालिका निकालानंतर मुंबई काँग्रेसमध्ये नाराजीनाट्य - शहराध्यक्ष बदला; भाई जगताप यांनी केली वर्षा गायकवाडांच्या राजीनाम्याची मागणी

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीत २४ जागा राखून सर्वांनाच धक्का देणाऱ्या काँग्रेसमध्ये नवे नाराजीनाट्य सुरू

महापालिका निवडणुकीनंतरच्या पहिल्या कॅबिनेटला दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची दांडी

मुंबई : राज्यातील महापालिका निवडणुकीनंतरच्या पहिल्या कॅबिनेट बैठकीला दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी दांडी