ठाण्याचा गड महायुतीने राखला

सलग दुसऱ्यांदा एकहाती वर्चस्व; सत्ता एकनाथ शिंदेंचीच


ठाणे :ठाणे महानगरपालिका निवडणुकीत महायुतीने दिलेला ‘शंभर पार’चा नारा यशस्वी ठरला असून, एकूण १०० हून अधिक जागांवर विजय मिळवला आहे. या यशातही स्पष्टपणे वर्चस्व हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचेच राहिले आहे. शिवसेना (शिंदे गट) ने ७० हून अधिक जागा जिंकत महापालिकेत एकहाती सत्ता प्रस्थापित केली आहे. त्यामुळे ठाण्याचे ‘ठाणेदार’ पुन्हा एकदा एकनाथ शिंदेच असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. ठाणे महापालिकेच्या एकूण ३३ प्रभागांतील १३१ जागांसाठी ही निवडणूक पार पडली. या निवडणुकीसाठी १ हजार १०७ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. छाननीत ९९ अर्ज बाद झाले, तर उमेदवारी मागे घेण्याच्या प्रक्रियेत २६९ उमेदवारांनी माघार घेतली. त्यामुळे ६४९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. यापैकी शिवसेना (शिंदे गट) चे ७ उमेदवार बिनविरोध निवडून आले.


महायुतीत शिवसेना (शिंदे गट) ने ८७ जागा, भाजपने ४० जागा तर मित्रपक्षांना ४ जागा देण्यात आल्या होत्या. निकालानुसार शिवसेनेचे ७० हून अधिक उमेदवार विजयी झाले असून, भाजपचे २७ ते २८ नगरसेवक निवडून आले आहेत. मागील निवडणुकीच्या तुलनेत दोन्ही पक्षांच्या संख्येत वाढ झाली असली, तरी बहुमताचा ६७ चा आकडा शिंदे गटाने सहज पार केल्याने पालिकेतील सत्ता पूर्णतः त्यांच्या हातात जाणार आहे. त्यामुळे महापौरपदही शिवसेना (शिंदे गट) कडेच जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


निकराची लढत; शिंदेंचे पॅनल विजयी:


मानपाडा–आझादनगर येथील प्रभाग क्रमांक ३ मध्ये अटीतटीची लढत पाहायला मिळाली. येथे शिवसेना (शिंदे गट) च्या माजी महापौर मिनाक्षी शिंदे यांच्यासह विक्रांत वायचळ, लहू पाटील आणि पदमा भगत हे चारही उमेदवार विजयी झाले. उमेदवारी नाकारल्यामुळे अपक्ष म्हणून रिंगणात उतरलेल्या माजी नगरसेवक भुषण भोईर आणि मधुकर पावशे यांनी जोरदार आव्हान दिले होते. मतदानानंतर दोन्ही समर्थकांमध्ये वाद झाल्याने परिसरात तणाव निर्माण झाला होता आणि मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मनसे आणि उबाठा गटाचे उमेदवारही रिंगणात असल्याने ही लढत अधिक चुरशीची ठरली. अखेर शिंदे गटाच्या पॅनलने येथे बाजी मारत आपले वर्चस्व सिद्ध केले. ठाणे महापालिकेच्या या निकालामुळे सलग दुसऱ्या निवडणुकीत एकनाथ शिंदे यांचे शहरावरचे राजकीय नियंत्रण अधिक मजबूत झाल्याचे स्पष्ट झाले आहे.


मनसे-काँग्रेस शून्य; दोन्ही पक्षांचे शहराध्यक्ष हरले:


काँग्रेस आणि मनसेला मोठा धक्का बसला असून, दोन्ही पक्षांचा एकही उमेदवार विजयी झाला नाही. काँग्रेसचे ठाणे जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण आणि मनसेचे ठाणे शहराध्यक्ष रविंद्र मोरे यांचाही पराभव झाला. या दोन्ही पक्षांचे अक्षरशः धूळधाण झाली आहे. शिवसेना फुटीनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील वर्चस्व कायम राखले आहे. त्यांना आव्हान देण्यासाठी उबाठा, मनसे, राष्ट्रवादी (शरद पवार गट) आणि काँग्रेस यांच्याकडून महाविकास आघाडीची रणनिती आखण्यात आली होती. मनसेने महाविकास आघाडीतून २८ उमेदवार रिंगणात उतरवले होते. मागील निवडणुकीप्रमाणे यंदाही मनसेला ठाण्यात यश मिळाले नाही.

Comments
Add Comment

Shivshahi Bus Fire : ठाणे स्टेशनवर ‘शिवशाही’ बसला भीषण आग; १५ प्रवासी थोडक्यात बचावले

ठाणे रेल्वे स्टेशन परिसरातील सेटीस ब्रिजवर आज म्हणजेच गुरुवार २३ एप्रिल रोजी ‘शिवशाही’ बसला अचानक भीषण आग

Central Railway : मध्य रेल्वे सलग तिसऱ्या दिवशी ४५ मिनिटे उशिराने; प्रवाशांचे हाल

ठाणे : डोंबिवली स्थानकावर रिकाम्या रेल्वेचा डब्बा घसरला आणि संपूर्ण मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले, त्या

Mumbai Local : डोंबिवलीमध्ये रिकाम्या लोकलचा डब्बा रुळावरून घसरला; लोकलचे वेळापत्रक कोलमडले

ठाणे : डोंबिवली, ठाणे, कल्याण, या परिसरातून अनेक लोक मुंबईत आपल्या कामानिमित्त येत असतात. अशातच जर मुंबईच्या

Thane : मेट्रो, टनेल, पॉड टॅक्सी ते परवडणारी घरे; ठाणे बनतंय सुपर सिटी

ठाणे : “पूर्वी ‘पुणे तिथे काय उणे’ म्हटले जायचे; आता ‘ठाणे तिथे काय उणे’ असे आत्मविश्वासाने म्हणण्याची वेळ आली

Thane Illegal Cylinder Storage : ‘डॉमिनोज पिझ्झा’मधून ४.५९ लाखांचा सिलिंडर साठा जप्त

शिधावाटप भरारी पथकाचे छापासत्र; एकाला बेड्या, १४० सिलिंडर घेतले ताब्यात मुंबई : व्यावसायिक वापरासाठीच्या

LPG Scam : पोलिसांनी उधळला LPG सिलिंडरचा काळा बाजार करण्याचा डाव

ठाणे : पश्चिम आशियात युद्ध सुरू झाल्यापासून देशात ठिकठिकाणी एलपीजी सिलिंडरची कृत्रिम टंचाई निर्माण करून