शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष राजू भोईर पराभूत

भाईंदर : मीरा भाईंदर शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष तथा सतत तीन टर्म नगरसेवक आणि विरोधी पक्षनेते राहिलेले राजू भोईर प्रभाग क्र. १६ या आपल्या पारंपरिक मतदारसंघातून निवडणूक लढवत होते. राजकीय वारसा लाभलेले राजू भोईर यांचे आजोबा आणि वडील सरपंच होते. तर त्यांची आई नगरसेविका तसेच सभापती होत्या. त्यांचा वारसा चालवत राजू भोईर यांच्या सह त्यांची पत्नी भावना भोईर दोन टर्म नगरसेविका तर भाऊ कमलेश भोईर हे सुद्धा दोन टर्म नगरसेवक होते. या निवडणुकीत मात्र राजू भोईर, त्यांची पत्नी भावना भोईर आणि भाऊ कमलेश भोईर सर्व भोईर कुटुंब पराभूत झाले आहेत. राजू भोईर यांचा भाजपचे तरुण उमेदवार व पहिल्यांदा निवडणूक लढवत असलेले नवीन सिंह यांनी पराभूत केले तर त्यांच्या पत्नीला भाजपच्या प्रतिभा जाट यांनी पराभूत केले, तर बंधू कमलेश भोईर यांना भाजपच्या मोहन म्हात्रे यांनी धूळ चारली आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रमोद सामंत यांना भाजपच्या संजय पवार यांनी पराभूत केले आहे.

Comments
Add Comment

Kalyan News : कल्याण रेल्वे स्थानकात RPF जवानावर तिघांचा हल्ला; प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण

कल्याण : कल्याण रेल्वे स्थानकात रेल्वे सुरक्षा दलाच्या (RPF) जवानावर तिघांकडून हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर

Kalyan Crime News : कल्याणमध्ये टवाळखोरांचा हैदोस! गार्डनमध्ये बसलेल्या तरुण-तरुणीला बेदम मारहाण, डोक्यात बाटल्या फोडल्या

कल्याण: कल्याण पूर्व परिसरात पुन्हा एकदा टवाळखोरांची दहशत समोर आली आहे. गार्डनमध्ये बसून गप्पा मारत असलेल्या

Thane Murder Case : ठाण्यात थरारक हत्याकांड; प्रियकराची हत्या करून मृतदेह ड्रममध्ये लपवला!

ठाणे : उत्तर प्रदेशातील मेरठ ड्रम हत्याकांडासारखीच एक धक्कादायक घटना ठाण्यातील मुंब्रा परिसरात समोर आली आहे.

Deputy Chief Minister Eknath Shinde : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून ईव्ही गाडीचा वापर सुरू, ताफ्यातील वाहनेही केली कमी

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या आवाहनाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून प्रतिसाद पंतप्रधान

Bhiwandi Water Cut : भिवंडीकरांनो पाणी जपून वापरा! शहरात उद्यापासून २४ तास पाणीपुरवठा बंद; 'या' भागात होणार परिणाम

ठाणे : भिवंडी शहराला पाणीपुरवठा (Bhiwandi Water Cut) करणाऱ्या यंत्रणेमध्ये तातडीच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे.

Kalyan : लोकलच्या छतावर जीवघेणा स्टंट; कल्याण रेल्वे स्थानकावर गोंधळ

कल्याण : ऐन गर्दीच्या वेळी कामावर जाण्याची वेळ आणि कल्याण ते विठ्ठलवाडी दरम्यानची रेल्वे वाहतूक खोळंबली, कारण