शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष राजू भोईर पराभूत

भाईंदर : मीरा भाईंदर शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष तथा सतत तीन टर्म नगरसेवक आणि विरोधी पक्षनेते राहिलेले राजू भोईर प्रभाग क्र. १६ या आपल्या पारंपरिक मतदारसंघातून निवडणूक लढवत होते. राजकीय वारसा लाभलेले राजू भोईर यांचे आजोबा आणि वडील सरपंच होते. तर त्यांची आई नगरसेविका तसेच सभापती होत्या. त्यांचा वारसा चालवत राजू भोईर यांच्या सह त्यांची पत्नी भावना भोईर दोन टर्म नगरसेविका तर भाऊ कमलेश भोईर हे सुद्धा दोन टर्म नगरसेवक होते. या निवडणुकीत मात्र राजू भोईर, त्यांची पत्नी भावना भोईर आणि भाऊ कमलेश भोईर सर्व भोईर कुटुंब पराभूत झाले आहेत. राजू भोईर यांचा भाजपचे तरुण उमेदवार व पहिल्यांदा निवडणूक लढवत असलेले नवीन सिंह यांनी पराभूत केले तर त्यांच्या पत्नीला भाजपच्या प्रतिभा जाट यांनी पराभूत केले, तर बंधू कमलेश भोईर यांना भाजपच्या मोहन म्हात्रे यांनी धूळ चारली आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रमोद सामंत यांना भाजपच्या संजय पवार यांनी पराभूत केले आहे.

Comments
Add Comment

Eknath Shinde : ठाणे क्लस्टर योजनेला गती देण्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

वागळे इस्टेट, किसननगर, कोपरी क्लस्टर महाप्रीतकडून एमएसआरडीसीकडे देण्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे

Central Railway Power Block Update : मध्य रेल्वेवर पॉवर ब्लॉक; ६ जूनला अनेक गाड्या रद्द, वेळापत्रकात बदल, लोकल सेवांवरही परिणाम!

कल्याण (Mumbai Central Railway Block) : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात आटगाव स्थानकावर नवीन इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग (Electronic Interlocking)

No-Parking Restrictions Ulhasnagar Roads : ठाणेकरांनो लक्ष द्या! उल्हासनगरमधील 'या' ५ मुख्य रस्त्यांवर २४ तास नो-पार्किंग; वाहतूक पोलिसांचा कडक निर्णय

उल्हासनगर : उल्हासनगर शहरात (Ulhasnagar) दररोज होणाऱ्या वाहतूक कोंडीतून नागरिकांची सुटका करण्यासाठी ठाणे वाहतूक

Thane News : दिवा येथून ७ वर्षीय चिमुकली बेपत्ता; ३६ तासांच्या प्रयत्नानंतर ठाणे पोलिसांना यश

ठाणे : ठाणे (Thane News) जिल्ह्यातील दिवा परिसरातून बेपत्ता झालेल्या ७ वर्षीय मुलीचा अवघ्या ३६ तासांत शोध घेण्यात ठाणे

Bhiwandi Water : भिवंडीच्या १५ लाख लोकांना २७३ एमएलडी पाणी मिळणार, ४२६ कोटींचा पाणी प्रकल्प

भिवंडी : अमृत अभियान २.० उपक्रमांतर्गत भिवंडी-निझामपूर शहराच्या विस्तारित पाणीपुरवठा योजनेंतर्गत १५ लाख

Actor Sharad Ponkshe : सावरकरांचे विचार विश्व कल्याणाचे - अभिनेते शरद पोंक्षे

ठाणे : स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे विचार कोणीही थांबवू शकत नाही. त्यांचे विचार विश्वकल्याणाचे आहेत. त्यांचे