नवी मुंबई महापालिकेत भाजपचे स्पष्ट बहुमत

१११ पैकी ६६ जागांवर भाजप विजयी


नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भाजपने घवघवीत यश मिळवत स्पष्ट आघाडी घेतली आहे. अधिकृत माहितीनुसार १११ पैकी ६६ जागांवर भाजपने विजय मिळवला असून, शिवसेना (शिंदे गट) २४ जागांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. या निकालानंतर भाजप नेते आणि मंत्री गणेश नाईक तात्काळ अॅक्शन मोडमध्ये आले असून, त्यांनी घेतलेल्या दोन मोठ्या निर्णयांमुळे शहरातील बिल्डरांचे धाबे दणाणले आहेत. निकाल जाहीर होताच माध्यमांशी संवाद साधताना गणेश नाईक यांनी अनधिकृत बांधकामांवर कडक कारवाई करण्याचे स्पष्ट संकेत दिले.


मैदाने बिल्डरांच्या घशात घालू देणार नाही:


नवी मुंबईतील विविध भागांत सुरू असलेली अनधिकृत टोलेजंग इमारतींची बांधकामे तात्काळ थांबवण्यात येतील, असे त्यांनी ठामपणे सांगितले.


याशिवाय निवडून आलेल्या ६५ नगरसेवकांना प्रशासन, कायदे आणि नगररचनेबाबत विशेष प्रशिक्षण दिले जाईल, अशी घोषणाही त्यांनी केली. “शहरातील मैदाने बिल्डरांच्या घशात घालू देणार नाही,” अशी ठाम भूमिका नाईक यांनी मांडली. तसेच सिग्नलवरील वाहतूक कोंडी, भिकाऱ्यांचा प्रश्न, स्वच्छता व नागरी सुविधांशी संबंधित प्रलंबित समस्या लवकरात लवकर सोडवण्यात येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. वाढत्या लोकसंख्येमुळे निर्माण होणाऱ्या पाणीटंचाईवर २०३० पर्यंत ठोस उपाययोजना राबवण्यात येणार असल्याचे आश्वासनही त्यांनी दिले.


या निवडणुकीत नवी मुंबईत लढत चुरशीची ठरली होती. प्रचारादरम्यान गणेश नाईक यांनी नवी मुंबईतील भ्रष्टाचाराचा मुद्दा उपस्थित करत शिवसेनेवर जोरदार टीका केली होती. त्यामुळे ही निवडणूक प्रतिष्ठेची मानली जात होती.

Comments
Add Comment

Airoli Murder Mystery : ११ महिने पचवला मर्डर, पण 'त्या' एका चुकीने खेळ खल्लास! ऐरोलीतील थरारक हत्याकांडाचा पर्दाफाश

नवी मुंबई : सिया आणि केतन या बहुचर्चित हत्याकांडाची चर्चा अद्याप ताजी असतानाच, नवी मुंबईतील ऐरोली (Navi Mumbai) परिसरातून

Navi Mumbai Airport : नवी मुंबई विमानतळावरून औषधांच्या आयातीस परवानगी

- औषधांच्या आयातीसाठी अधिसूचित प्रवेश बंदरांची एकूण संख्या ४२ वर नवी दिल्ली : औषध पुरवठा साखळी बळकट करण्याच्या

Horrific accident in Navi Mumbai : तळोजा येथे भरधाव कारने १० जणांना उडवले; २ जणांचा मृत्यू, ८ गंभीर

नवी मुंबई: नवी मुंबईतील तळोजा परिसरात आज मंगळवारी, ७ जुलै २०२६ रोजी एक अत्यंत धक्कादायक आणि भीषण अपघाताची घटना

Navi Mumbai : धक्कादायक घटना ! अवघ्या १७ वर्षीय विद्यार्थ्याचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू

नवी मुंबई : आजकालच्या धावपळीच्या जीवनात आपल्या सोबत कधी काही होईल सांगता येत नाही. नवी मुंबई(Navi Mumbai) मध्ये एक

Road Development : ३० ते ४० मिनिटांचा प्रवास आता अवघ्या १५ मिनिटात होणार; कल्याण, शिळफाटा

मुंबई : मुंबईतीळ अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या खूप मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे. मात्र आता कल्याण मधील

Chandrashekhar Bawankule : मुद्रांक शुल्क घोटाळ्यावर सरकारचा मोठा दणका; राज्यभरातील ५ वर्षांच्या प्रकरणांची विशेष चौकशी

हजारो कोटींचा घोटाळा उघडकीस येण्याची शक्यता – महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे  अधिकाऱ्यांसाठी नवी नियमावली;