नवी मुंबई महापालिकेत भाजपचे स्पष्ट बहुमत

१११ पैकी ६६ जागांवर भाजप विजयी


नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भाजपने घवघवीत यश मिळवत स्पष्ट आघाडी घेतली आहे. अधिकृत माहितीनुसार १११ पैकी ६६ जागांवर भाजपने विजय मिळवला असून, शिवसेना (शिंदे गट) २४ जागांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. या निकालानंतर भाजप नेते आणि मंत्री गणेश नाईक तात्काळ अॅक्शन मोडमध्ये आले असून, त्यांनी घेतलेल्या दोन मोठ्या निर्णयांमुळे शहरातील बिल्डरांचे धाबे दणाणले आहेत. निकाल जाहीर होताच माध्यमांशी संवाद साधताना गणेश नाईक यांनी अनधिकृत बांधकामांवर कडक कारवाई करण्याचे स्पष्ट संकेत दिले.


मैदाने बिल्डरांच्या घशात घालू देणार नाही:


नवी मुंबईतील विविध भागांत सुरू असलेली अनधिकृत टोलेजंग इमारतींची बांधकामे तात्काळ थांबवण्यात येतील, असे त्यांनी ठामपणे सांगितले.


याशिवाय निवडून आलेल्या ६५ नगरसेवकांना प्रशासन, कायदे आणि नगररचनेबाबत विशेष प्रशिक्षण दिले जाईल, अशी घोषणाही त्यांनी केली. “शहरातील मैदाने बिल्डरांच्या घशात घालू देणार नाही,” अशी ठाम भूमिका नाईक यांनी मांडली. तसेच सिग्नलवरील वाहतूक कोंडी, भिकाऱ्यांचा प्रश्न, स्वच्छता व नागरी सुविधांशी संबंधित प्रलंबित समस्या लवकरात लवकर सोडवण्यात येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. वाढत्या लोकसंख्येमुळे निर्माण होणाऱ्या पाणीटंचाईवर २०३० पर्यंत ठोस उपाययोजना राबवण्यात येणार असल्याचे आश्वासनही त्यांनी दिले.


या निवडणुकीत नवी मुंबईत लढत चुरशीची ठरली होती. प्रचारादरम्यान गणेश नाईक यांनी नवी मुंबईतील भ्रष्टाचाराचा मुद्दा उपस्थित करत शिवसेनेवर जोरदार टीका केली होती. त्यामुळे ही निवडणूक प्रतिष्ठेची मानली जात होती.

Comments
Add Comment

Milk adulteration in Navi Mumbai : नवी मुंबईतील महापेतून लाखो रुपयांचा भेसळ केलेल्या दुग्धजन्य पदार्थांचा साठा जप्त

महापे : नवी मुंबईतील महापे एमआयडीसी परिसरातील पी. के. डेअरीवर धाड टाकून अन्न व औषध प्रशासनाने

Navi Mumbai Traffic : पाम बीच रोडवर 15 आणि 16 ऑगस्टला वाहतूक निर्बंध; वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

नवी मुंबई : स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या विविध कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईतील

Navi Mumbai Railway : ऐरोली ते बेलापूर रेल्वे स्थानकांचा होणार कायापालट; प्रवाशांना मिळणार अत्याधुनिक सुविधा

नवी मुंबई : ऐरोली ते बेलापूरदरम्यानच्या सर्व रेल्वे स्थानकांचा लवकरच कायापालट होणार आहे. या स्थानकांमधील

Devendra Fadnavis : भारताच्या भविष्यातील विकासाचे मुख्य केंद्र नवी मुंबईच; "मेघालय भवन" विकास संस्कृती आणि एकात्मतेचा संगम - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

'मेघालय भवन' उभारणीसाठी जमीन हस्तांतरण व भूमीपूजन सोहळा

Koparkhairane Connecting Link : नवी मुंबईकरांचा प्रवास होणार सुसाट! कोपरखैरणेतील 'कनेक्टिंग लिंक' पुलाचे गणेश नाईक यांच्या हस्ते लोकार्पण

नवी मुंबई : नवी मुंबईतील अत्यंत गजबजलेल्या कोपरखैरणे आणि परिसरातील नागरिकांना आता वाहतूककोंडीच्या त्रासातून

Airoli Murder Mystery : ११ महिने पचवला मर्डर, पण 'त्या' एका चुकीने खेळ खल्लास! ऐरोलीतील थरारक हत्याकांडाचा पर्दाफाश

नवी मुंबई : सिया आणि केतन या बहुचर्चित हत्याकांडाची चर्चा अद्याप ताजी असतानाच, नवी मुंबईतील ऐरोली (Navi Mumbai) परिसरातून