भाजप एका जागेवरून ४३ जागांवर

बहुजन विकास आघाडीच्या ३७ जागा घटल्या


विरार : वसई-विरार महापालिकेच्या निवडणुकीत बहुजन विकास आघाडीने ७० जागा जिंकल्या आहेत आणि स्पष्ट बहुमत मिळविले आहे, तर भारतीय जनता पक्ष हा ४३ जागा जिंकून दुसऱ्या क्रमांकावर राहिला आहे. सन २०१५ च्या निवडणुकीचा विचार करता भाजपच्या तब्बल ४३ जागा वाढल्या असून, बहुजन विकास आघाडीच्या मात्र ३७ जागा घटल्या आहेत. त्यामुळे भाजप हा पक्ष सत्तेच्या जवळ गेला नसला तरी त्यांनी चांगलीच मुसंडी मारल्याचे दिसून येत आहे.


यापूर्वी दोन निवडणुका पार पडल्या आहेत. दोन्ही निवडणुकांमध्ये येथे बहुजन विकास आघाडीची सत्ता राहिली आहे. २०१५ मध्ये झालेल्या निवडणुकीत, तर ११५ जागांपैकी १०७ जागांवर बहुजन विकास आघाडीने विजय मिळवून महापालिकेत त्यांचे एकहा ती वर्चस्व असल्याचे सिद्ध केले. दरम्यान, सन २०२० मध्ये महापालिकेची मुदत संपल्यानंतर निवडणुका झाल्या नाही. मात्र गेल्यावर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत बहुजन विकास आघाडीच्या हातून बोईसर, वसई आणि नालासोपारा हे तीनही मतदारसंघ गेले. त्यामुळे यावेळी होत असलेली महापालिकेची निवडणूक बहुजन विकास आघाडीसाठी अस्तित्वाची लढाई ठरली होती. अशातच निवडणुकीच्या तोंडावर काही माजी नगरसेवकांनी आणि पदाधिकाऱ्यांनी बहुजन विकास आघाडीची साथ सोडली. मात्र वसई विरार मधील मतदारांनी माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांची साथ सोडली नाही. आणि या निवडणुकीत बहुजन विकास आघाडीला महापालिकेच्या सभागृहात सत्तास्थापन करण्यासाठी बहुमत मिळवून दिले. तर दुसरीकडे पालघर लोकसभा, पाच विधानसभा आणि नुकताच झालेल्या नगर परिषद, नगरपंचायत निवडणुकीत चांगले यश मिळाल्याने वसई-विरार महापालिकेच्या निवडणुकीत भाजप शिवसेना यांनी आगरी सेना, श्रमजीवीला सोबत घेऊन महायुती म्हणून ही निवडणूक लढविली. शिवसेनेला २७ पैकी केवळ एक जागा निवडून आणता आली, तर भाजपचे ९३ उमेदवारांपैकी ४३ उमेदवार विजयी झाले आहेत. परिणामी गेल्या महापालिका निवडणुकीत केवळ एक जागा निवडून आलेल्या भाजपने यावेळी तब्बल ४३ जागा जिंकल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.


वसई-विरारकरांनी दिलेला कौल मान्य आहे. भाजपचे तळागाळातील सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी चांगली मेहनत घेतली. त्यामुळे ४२ जागा जिंकता आल्या आहेत. विरोधकांनी मतदारांमध्ये विविध प्रकारचा अपप्रचार केल्याने काही जागांवर फटका बसला आहे. माझ्यासह भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता नगरसेवक नाही तर सेवक म्हणून वसई-विरारमध्ये सेवा करत राहील.
- डॉ. हेमंत सवरा, खासदार पालघर.

Comments
Add Comment

Bullet Train : बुलेट ट्रेनचे राज्यातील काम जोरात, तंत्रज्ञांनी पालघर जिल्ह्यात केली कमाल

पालघर : मुंबई - अहमदाबाद बुलेट ट्रेनचे काम प्रगतीपथावर आहे. केंद्रातल्या मोदी सरकार आणि राज्यातल्या फडणवीस

Mumbai-Ahmedabad Bullet Train : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन: पालघरमध्ये तिसऱ्या डोंगराळ बोगद्याचे काम फत्ते; अवघ्या ५ महिन्यांत महाराष्ट्रातील 'हे' मोठे आव्हान पूर्ण

पालघर : देशातील पहिल्या हाय-स्पीड रेल्वे प्रकल्पाच्या (high-Speed Railway Project) म्हणजेच 'मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन'च्या

मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील अपघातात ठार १३ जणांवर अंत्यसंस्कार, पीडित कुटुंबांचे पालकत्व शासन स्वीकारणार

डहाणू : मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील धनिवरी येथे १८ मे रोजी झालेल्या भीषण अपघातातील १३ मृतांवर आज अत्यंत

Palghar Accident : काळजाचा ठोका चुकवणारं दृश्य! एकाच रांगेत १२ मृतदेह, बापूगावात महिलांचा हृदय पिळवटून टाकणारा आक्रोश

पालघर : आनंदाने नटलेले घर, साखरपुड्याच्या निमित्ताने जमलेले सर्व नातेवाईक आणि उत्साहाचे वातावरण... पण नियतीच्या

Palghar Accident : साखरपुड्याच्या वऱ्हाडावर काळाचा घाला, १३ जणांचा मृत्यू; मृतांच्या वारसांना मदत जाहीर

डहाणू : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर डहाणू तालुक्यातील धानोरी येथे रविवारी दुपारी एक अत्यंत भीषण आणि

Mumbai- Ahemdabad Expressway Accident : डहाणूमध्ये 100 वऱ्हाड्यांनी भरलेल्या ट्रकला भरधाव कंटेनरची धडक; 12 जणांचा जागीच मृत्यू, 25 हून अधिक गंभीर

डहाणू : साखरपुड्याचा आनंद साजरा करण्यासाठी निघालेल्या एका कुटुंबावर आणि त्यांच्या पाहुण्यांवर काळाने अचानक