भावनिक आवाहनाला न फसता महाराष्ट्राच्या विकासाला मतदारांची पसंती - भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण

मुंबई : वर्षानुवर्षे भाजपा कार्यकर्त्याने यशाच्या दिशेने पार्टीला नेण्याचे स्वप्न पाहिले आणि ते स्वप्न साकार करण्यासाठी झोकून देऊन काम केले. त्याग व समर्पण भावनेतून असंख्य कार्यकर्त्यांनी पार्टीची विचारधारा तळागाळात पोहोचवली. हा विजय सर्व कार्यकर्त्यांना समर्पित करतो, अशी भावना भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी आज महापालिका निवडणुकांच्या निकालानंतर व्यक्त केली.


पंतप्रधान नरेंद्र मोदी, केद्रीय गृहमंत्री अमित शाह, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, राष्ट्रीय कार्याध्यक्ष नितीन नबीन, यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मुख्यमंत्री देवेन्द्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने विकासाच्या अजेंड्यावर निवडणूक लढली. या निवडणुकीत भावनिक आवाहन करून मतदारांना भुरळ घालण्याचा प्रयत्न विरोधकांनी केला, पण अशा भोंदूगिरीला जनता भुलत नाही, हेच स्पष्ट झाले आहे. भाजपाने विकासाच्या दिशेने निवडणूक लढवली. त्याला मतदारांचे आशीर्वाद लाभले त्याबद्दल धन्यवाद मानतो. असेही रविंद्र चव्हाण यांनी सांगितले.


गेल्या अनेक वर्षांपासून निवडणुका या भावनिक आवाहनांवर लढवल्या जात होत्या आणि अनेक मतदार त्या दिशेने प्रभावित होत होते.  मात्र, ही निवडणूक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सक्षम नेतृत्वाखाली महाराष्ट्राला विकासाच्या दिशेने नेणारी ठरली.  ‘व्हिजन महाराष्ट्र’ आणि महाराष्ट्राला ट्रिलियन इकॉनॉमीकडे नेण्याच्या संकल्पनेला मतदारानी जो भरभरून आशीर्वाद दिला, त्याबद्दल भारतीय जनता पक्षाचा प्रदेशाध्यक्ष म्हणून आणि भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकत्यांच्या  वतीने मी संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेचे मनःपूर्वक आभार मानतो व कृतज्ञता व्यक्त करतो असेही रविंद्र चव्हाण यांनी सांगितले.

Comments
Add Comment

BMC Election 2026 : भाजपची ऐतिहासिक मुसंडी तर ठाकरे, काँग्रेसचं काय? २९ महापालिकांच्या रणसंग्रामाचे 'A to Z' अपडेट्स!

मुंबई : भाजपचे निर्विवाद वर्चस्व राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने (भाजप) दणदणीत

 कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मलबार हिलचा गड राखला, भाजपाचे पाचही उमेदवार विजयी - मलबार हिल मध्ये कार्यकर्त्यांचा जल्लोष

मुंबई : राज्याचे कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दक्षिण मुंबईतला आपला मलबार हिलचा गड राखला आहे. त्यांच्या

BMC Election 2026 : शरद पवारांच्या राष्ट्रवादीची २९ पैकी १४ महापालिकेत घसरगुंडी! पुणे-पिंपरी चिंचवडमध्येही भोपळा फुटला नाही

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांचा निकाल आज समोर येत असून, शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील

मुंबईत महायुतीला बहुमत मिळाल्याबद्दल केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेवून केले अभिनंदन

राज्यभरातील २९ महानगरपालिकांमध्ये महायुतीच अव्वल मुंबई : अत्यंत प्रतिष्ठेची निवडणुक ठरलेल्या मुंबई

Raj Thackeray : भावाशी युती करूनही राज ठाकरेंच्या खात्यात २२ शून्य, मुंबईत 'मनसे'ला जबरदस्त धक्का; ठाकरे ब्रँड फेल!

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या सत्तेसाठी २० वर्षांचा वनवास संपवून एकत्र आलेल्या 'ठाकरे बंधूं'साठी आजचा निकाल

तेजिंदर सतनाम सिंग तिवाना यांचा प्रचंड मतांनी दणदणीत विजय

वार्ड ४७ मध्ये तरुणाईचा विजयघोष मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीत वार्ड क्रमांक ४७ मधून भारतीय जनता पक्षाचे