तेजिंदर सतनाम सिंग तिवाना यांचा प्रचंड मतांनी दणदणीत विजय

वार्ड ४७ मध्ये तरुणाईचा विजयघोष


मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीत वार्ड क्रमांक ४७ मधून भारतीय जनता पक्षाचे युवा नेतृत्व तेजिंदर सतनाम सिंग तिवाना यांनी प्रचंड मतांनी दणदणीत विजय मिळवत इतिहास रचला आहे. मुंबई भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष म्हणून त्यांना उमेदवारी देण्यात आली होती, त्यामुळे ही जागा भाजपासाठी मान, सन्मान आणि प्रतिष्ठेचा विषय ठरली होती.


भाषिक, सांस्कृतिक व सामाजिक वैविध्याने नटलेल्या वार्ड ४७ मध्ये विजय मिळवणे भाजपासाठी मोठे आव्हान होते. अशा परिस्थितीत या वार्डमधून भाजपाला विजय मिळवून देण्याची क्षमता केवळ तेजिंदर सतनाम सिंग तिवाना यांच्यातच होती, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.


या वार्डातील मतदारसंरचनेत सुमारे २२ टक्के मराठी, २१ टक्के दक्षिण भारतीय, १२ टक्के ख्रिश्चन आणि ६ टक्के मुस्लिम मतदारांचा समावेश आहे. त्यामुळे शिवसेना (ठाकरे गट) किंवा काँग्रेससारख्या पक्षांसाठी हा प्रभाग सहज विजयाचा मानला जात होता. दुसरीकडे भाजपाचे पारंपरिक मतदार—१७ टक्के उत्तर भारतीय/पंजाबी आणि १८ टक्के गुजराती/राजस्थानी—लक्षणीय संख्येत असले तरी पुनर्विकास प्रकल्पांमुळे अनेक मतदार वार्डाबाहेर स्थलांतरित झाले होते. त्यातच मतदानाचा दिवस मकर संक्रांतीचा असल्याने गुजराती मतदारांची अनुपस्थिती हे मोठे आव्हान होते.


या सर्व प्रतिकूल परिस्थितींवर मात करत मिळवलेला हा विजय तेजिंदर सतनाम सिंग तिवाना यांच्या अथक मेहनतीचा, स्थानिक पातळीवरील प्रचंड स्वीकारार्हतेचा आणि घरोघरी पोहोचलेल्या प्रभावी जनसंपर्काचा परिणाम आहे.


तेजिंदर सतनाम सिंग तिवाना आणि त्यांचे कुटुंब गेली ४० हून अधिक वर्षे या परिसरात सातत्याने जनसेवा करत आहे. कोणताही पदभार नसतानाही नागरिकांच्या अडचणींसाठी २४x७ उपलब्ध राहण्याची त्यांची परंपरा असल्यामुळेच परिसरातील जनतेचा त्यांच्या कुटुंबावर दृढ विश्वास आहे.


या विजयाचे श्रेय भाजपाच्या ज्येष्ठ नेतृत्वालाही जाते, ज्यांनी युवकांवर विश्वास टाकत त्यांना संधी दिली. युवकांनी आपल्या नव्या विचारसरणी, ऊर्जेने आणि संघटन कौशल्याने या बीएमसी निवडणुकीचे राजकीय चित्रच बदलून टाकले आहे.
तेजिंदर यांचे “मदत का ठिकाना” हे अभिनव अभियान या निवडणुकीची ओळख ठरले. या अभियानामुळे निर्माण झालेला उत्साह नगरसेवक निवडणुकीपुरता मर्यादित न राहता विधानसभा निवडणुकीसारखा भासू लागला. अभियानातील गीते, जाहिरात चित्रफिती आणि सोशल मीडियावरील प्रभावी संवाद थेट जनतेच्या हृदयाला भिडला.


तेजिंदर सतनाम सिंग तिवाना यांचा हा विजय खऱ्या अर्थाने मुंबईच्या स्पिरिटचा विजय आहे—जिथे भाषा, प्रांत आणि समाजाच्या पलीकडे जाऊन, मेहनती, नेहमी उपलब्ध असलेल्या एका तरुण नेतृत्वाला जनतेने प्रचंड विश्वासाने विजयी केले.

Comments
Add Comment

BMC News : रुग्णालयात मॅमोग्राफी उपकरण उपलब्ध; स्तनाचा कर्करोग पिडीत महिलांची धावपळ वाचेल

- शीव आणि केईएम रुग्णालयातील विविध वैद्यकीय सुविधांचे महापौरांच्या हस्ते लोकार्पण मुंबई (विशेष

BMC News : दक्षिण मुंबईतील पाणी पुरवठा शनिवारपासून पूर्ववत

- मुख्य जलवाहिनी दुरुस्तीचे काम ४४ तासांच्‍या प्रयत्‍नानंतर पूर्ण मुंबई (विशेष प्रतिनिधी) जी दक्षिण विभागातील

Ravi Pandit Passes Away : पुण्यातील नामांकित उद्योजक रवी पंडित यांचे निधन; आयटी क्षेत्रातील दूरदर्शी नेतृत्व हरपले...

पुण्यातील प्रसिद्ध उद्योजक आणि KPIT Technologies चे संस्थापक व अध्यक्ष रवी पंडित यांचे आज (८ मे) पुण्यात निधन झाले. कंपनीने

Central Railway : मुंबई PRS प्रणाली बंद; PNR फाईल कॉम्प्रेशनमुळे काही रेल्वे सेवा तात्पुरत्या ठप्प

मुंबई : मध्य रेल्वेच्या मुंबई प्रवासी आरक्षण प्रणाली (PRS) मध्ये PNR फाईल कॉम्प्रेशनच्या तांत्रिक देखभाल कामासाठी

Chief Minister Devendra Fadnavis: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची केपीआयटीचे अध्यक्ष, ज्येष्ठ उद्योजक रवी पंडित यांना श्रद्धांजली

देशातील माहिती तंत्रज्ञान उद्योगाच्या पहिल्या फळीतील मार्गदर्शक उद्योजक हरपला मुंबई : माहिती तंत्रज्ञानाच्या

Mega Block on Central Railway : रविवारी मध्य रेल्वेचा मेगा ब्लॉक; मेन लाईन आणि ट्रान्स-हार्बरवरील अनेक लोकल सेवा प्रभावित

मुंबई : सेंट्रल रेल्वेच्या मुंबई विभागाकडून रविवार, १० मे २०२६ रोजी विविध अभियांत्रिकी आणि देखभाल दुरुस्तीची