Tejasavee Ghosalkar : दहिसरमध्ये तेजस्वी घोसाळकरांचा 'महाविजय'! उबठाच्या धनश्री कोलगेंचा दारुण पराभव; मुंबईत भाजपची मुसंडी

मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या मतमोजणीत भाजपने दहिसरच्या बालेकिल्ल्यात भगवा फडकवला आहे. प्रभाग क्रमांक २ मधून भाजपच्या उमेदवार तेजस्वी अभिषेक घोसाळकर यांनी तब्बल १०,७२५ मतांच्या प्रचंड फरकाने ऐतिहासिक विजय नोंदवला आहे. त्यांनी शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवार धनश्री कोलगे यांचा पराभव केला असून, या विजयाने उत्तर मुंबईत भाजपचे वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.



प्रतिष्ठेची लढाई आणि राजकीय संघर्ष


माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या दुर्दैवी निधनानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीत तेजस्वी घोसाळकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे ही जागा शिवसेना ठाकरे गटासाठी केवळ प्रतिष्ठेचीच नाही, तर 'निष्ठावंत विरुद्ध पक्ष बदलणारे' अशा संघर्षाची बनली होती. ठाकरे गट आणि मनसे युतीने याठिकाणी मोठे आव्हान उभे केले होते, मात्र तेजस्वी घोसाळकर यांनी सर्व समीकरणे मोडीत काढत निर्विवाद यश मिळवले. प्रचारादरम्यान तेजस्वी घोसाळकर यांनी मांडलेले भविष्यातील विकासाचे मुद्दे आणि मतदारांशी साधलेला भावनिक संवाद त्यांच्या पथ्यावर पडला. अभिषेक घोसाळकर यांच्या कार्याचा वारसा पुढे नेण्याचे आश्वासन आणि भाजपची ताकद यामुळे मतदारांनी त्यांना कौल दिला. १०,७२५ मतांचा हा मोठा फरक हेच दर्शवतो की, मतदारांनी केवळ सहानुभूतीच नाही तर तेजस्वी यांच्या नेतृत्वावरही विश्वास दाखवला आहे.



दहिसरमध्ये जल्लोष


निकालाची अधिकृत घोषणा होताच दहिसर परिसरात भाजप कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. फटाक्यांची आतिषबाजी आणि गुलालाची उधळण करत तेजस्वी घोसाळकर यांचे जंगी स्वागत करण्यात आले. "हा विजय प्रभाग २ मधील जनतेचा आणि अभिषेक घोसाळकर यांच्या कार्याचा विजय आहे," अशा भावना यावेळी तेजस्वी यांनी व्यक्त केल्या.

Comments
Add Comment

BMC : मुंबई महानगरपालिका मुख्यलयात मंत्रालयाच्या धर्तीवर प्रवेश

मुंबई  : मुंबई महापालिका मुख्यालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी प्राप्त झाल्यानंतर पुन्हा एकदा महापालिका

BMC मुख्यालय उडवून देण्याची धमकी, महापौरांसह इमारतीच्या सुरक्षेत वाढ

महापािलका मुख्यालय उडवून देण्याची धमकी ; महापौरांसह इमारतीच्या सुरक्षेत वाढ अशा धमक्यांना मी मुळीच घाबरत नाही-

अवकाळी पावसाने बाधित फळपिकांचे पंचनामे पूर्ण करा, कृषिमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : 'राज्यात मे आणि जून २०२६ या कालावधीत अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि गारपिटीमुळे बाधित झालेल्या फळपिकांच्या

Verification of Street Vendors : मुंबईत २० हजार फेरीवाल्यांची पडताळणी पूर्ण

येत्या २६ जून पर्यंत पडताळणी न झालेल्यांना मिळणार नाही क्यू आर कोड ओळखपत्र मुंबई (विशेष प्रतिनिधी ) : उच्‍च

Devendra Fadnavis : समर्थ भारत ते विकसित भारत’ पंतप्रधान मोदींमुळेच शक्य

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; महाराष्ट्र राज्याच्या वतीने पत्र लिहून केले अभिनंदन मुंबई : देशाच्या इतिहासात

Panvel-Karjat Corridor : रेल्वेला नवी लाइफलाइन! लवकरच धावणार उपनगरी रेल्वे; पनवेल-कर्जत कॉरिडॉरचे ९८ टक्के काम पूर्ण

MUMBAI : मुंबई उपनगरी रेल्वे नेटवर्कसाठी महत्त्वाचा ठरणारा बहुप्रतीक्षित पनवेल-कर्जत रेल्वे कॉरिडॉर आता