Tejasavee Ghosalkar : दहिसरमध्ये तेजस्वी घोसाळकरांचा 'महाविजय'! उबठाच्या धनश्री कोलगेंचा दारुण पराभव; मुंबईत भाजपची मुसंडी

मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या मतमोजणीत भाजपने दहिसरच्या बालेकिल्ल्यात भगवा फडकवला आहे. प्रभाग क्रमांक २ मधून भाजपच्या उमेदवार तेजस्वी अभिषेक घोसाळकर यांनी तब्बल १०,७२५ मतांच्या प्रचंड फरकाने ऐतिहासिक विजय नोंदवला आहे. त्यांनी शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवार धनश्री कोलगे यांचा पराभव केला असून, या विजयाने उत्तर मुंबईत भाजपचे वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.



प्रतिष्ठेची लढाई आणि राजकीय संघर्ष


माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या दुर्दैवी निधनानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीत तेजस्वी घोसाळकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे ही जागा शिवसेना ठाकरे गटासाठी केवळ प्रतिष्ठेचीच नाही, तर 'निष्ठावंत विरुद्ध पक्ष बदलणारे' अशा संघर्षाची बनली होती. ठाकरे गट आणि मनसे युतीने याठिकाणी मोठे आव्हान उभे केले होते, मात्र तेजस्वी घोसाळकर यांनी सर्व समीकरणे मोडीत काढत निर्विवाद यश मिळवले. प्रचारादरम्यान तेजस्वी घोसाळकर यांनी मांडलेले भविष्यातील विकासाचे मुद्दे आणि मतदारांशी साधलेला भावनिक संवाद त्यांच्या पथ्यावर पडला. अभिषेक घोसाळकर यांच्या कार्याचा वारसा पुढे नेण्याचे आश्वासन आणि भाजपची ताकद यामुळे मतदारांनी त्यांना कौल दिला. १०,७२५ मतांचा हा मोठा फरक हेच दर्शवतो की, मतदारांनी केवळ सहानुभूतीच नाही तर तेजस्वी यांच्या नेतृत्वावरही विश्वास दाखवला आहे.



दहिसरमध्ये जल्लोष


निकालाची अधिकृत घोषणा होताच दहिसर परिसरात भाजप कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. फटाक्यांची आतिषबाजी आणि गुलालाची उधळण करत तेजस्वी घोसाळकर यांचे जंगी स्वागत करण्यात आले. "हा विजय प्रभाग २ मधील जनतेचा आणि अभिषेक घोसाळकर यांच्या कार्याचा विजय आहे," अशा भावना यावेळी तेजस्वी यांनी व्यक्त केल्या.

Comments
Add Comment

तब्बल २५ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर चिखलवाडीतील रहिवाशांचे गृह स्वप्न पूर्ण

मुंबई : मुंबईतील ग्रांट रोड परिसरातील जुनी चिखलवाडीचा पुनर्विकास पूर्ण झाला असून येथील २६५ रहिवाशांना

मुंबईतील १२ प्रभाग समित्या बिनविरोध, पाच प्रभाग समित्यांमध्ये होणार निवडणूक

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेत महापौर आणि उपमहापौरांसह चार वैधानिक समित्यांच्या अध्यक्षपदाची निवड

पुण्याच्या इंदिरा युनिव्हर्सिटीच्या संचालकांनी मानले उपमुख्यमंत्री शिंदेंचे आभार

मुंबई: “आजवर तुमच्याबद्दल फक्त ऐकून होते, मात्र तुम्ही प्रत्यक्षात संकटाच्या वेळी मदतीला धावून येता, याची

​गेटवे-एलिफंटा जलवाहतूक सक्षम करण्यासाठी बोट आधुनिकीकरणावर भर; मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत मंत्रालयात बैठक

मुंबई : गेटवे ऑफ इंडिया ते एलिफंटा आणि अलिबाग दरम्यान धावणाऱ्या प्रवासी बोटींचे आधुनिकीकरण करून प्रवाशांना

डॉ. अभिजित चौधरी 'पीएमआरडीए'चे नवे आयुक्त

मुंबई : राज्य शासनाने बुधवारी दोघा सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले असून, पुणे महानगर प्रदेश विकास

पुणे व रायगड जिल्ह्यांत २१०० मेगावॉट क्षमतेच्या उदंचन जलविद्युत प्रकल्प उभारणीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार

मुंबई, दि. ४ : - पुणे व रायगड जिल्ह्यांत २१०० मेगावॉट क्षमतेचा पिंपळपाडा-सावळे उदंचन जलविद्युत प्रकल्प विकसित