काँग्रेसमुळे मुंबईत ठाकरे बंधूंच्या ७ जागा पडल्या

मुंबई : ज्या काँग्रेसपायी उबाठाने भाजपशी नाते तोडले, त्याच काँग्रेसमुळे मुंबई पालिका निवडणुकीत त्यांना ७ हक्काच्या जागा गमवाव्या लागल्याची माहिती समोर आली आहे. अनेक प्रभागांमध्ये काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीने मिळवलेली मते ही थेट उबाठा गट आणि मनसेसाठी घातक ठरली आहेत.


या निवडणुकीत काँग्रेसने महाविकास आघाडीतून बाहेर पडत प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीसोबत हातमिळवणी करत ‘मुंबई विकास आघाडी’ स्थापन केली होती. या आघाडीने विशेषतः मुस्लीम आणि दलित बहुल प्रभागांमध्ये स्वतंत्र ताकद लावली. मात्र, या ताकदीचा मोठा फटका उबाठा आणि मनसेला बसल्याचे मतमोजणीतून स्पष्ट झाले.


प्रभाग क्रमांक २० मध्ये भाजपचे दीपक तावडे (१०,२५८ मते) विजयी झाले, तर मनसेचे दिनेश साळवी (७,५३०) आणि काँग्रेसचे मस्तान खान (३,३५१) यांच्यातील मतविभाजनामुळे मनसेचा पराभव झाला. प्रभाग क्रमांक २३ मध्येही असाच प्रकार पाहायला मिळाला. भाजपचे शिवकुमार झा (७,०९०) विजयी झाले, तर मनसेचे किरण जाधव (५,८१०) आणि काँग्रेसचे आर.पी. पांडे (१,३१७) यांच्यातील मतविभाजन मनसेच्या पराभवाला कारणीभूत ठरले.

कुठे काय घडले?
- प्रभाग क्रमांक ५२ मध्ये भाजपच्या प्रीती सातम (९,९७१) यांनी उबाठा गटाच्या सुप्रिया गाडावे (८,९५३) यांचा पराभव केला. येथे काँग्रेसच्या स्वाती सांगळे यांना मिळालेली १ हजार ३९९ मते निर्णायक ठरली. प्रभाग १२६ मध्येही भाजपच्या अर्चना भालेराव (११,१३४) यांनी उबाठा गटाच्या शिल्पा भोसले (१०,२६३) यांच्यावर मात केली. काँग्रेसच्या साजिदा खान यांना मिळालेली १ हजार ६५ मते उबाठा गटासाठी घातक ठरली.
- प्रभाग क्रमांक १६६ मध्ये शिवसेनेच्या मीनल तुर्डे (६,४३५) विजयी झाल्या, तर मनसेचे राजन खैरनार (४,४८०) आणि काँग्रेसचे घनश्याम भापकर (३,२८६) यांच्यातील मतविभाजनाने मनसेची संधी हिरावली. प्रभाग क्रमांक १७४ मध्ये भाजपच्या साक्षी कनोजिया (५,५२३) यांनी उबाठा गटाच्या पद्मावती शिंदे (३,०७८) यांचा पराभव केला. येथे काँग्रेसच्या ईश्वरी वेलु (२,९२१) यांची मते निर्णायक ठरली.
- वॉर्ड क्रमांक १७५ मध्ये शिवसेनेच्या मानसी सातमकर (६,८९५) विजयी ठरल्या, तर काँग्रेसच्या ललिता यादव (६,६४६) आणि मनसेच्या अर्चना कासले (२,७५९) यांच्यातील मतविभाजनाचा ठाकरे गटाला अप्रत्यक्ष फटका बसला.

Comments
Add Comment

MahaCare : महाकेअरच्या माध्यमातून राज्यात जागतिक दर्जाच्या कर्करोग उपचार सुविधा; नागपुरात हाय एनर्जी मेडिकल सायक्लोट्रॉन प्रकल्पाला मंजुरी

मुंबई : राज्यातील कर्करोग रुग्णांना जागतिक दर्जाचे उपचार आणि संशोधन सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र

Devendra Fadnavis : आता शाळेत मिळणार 'ड्रग्ज'च्या दुष्परिणामांचे धडे

मख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश; अंमली पदार्थमुक्त महाराष्ट्र व्यूहरचना आणि कृती योजनेबाबत

Central Railway : कर्जत-लोणावळा रेल्वे मार्ग पूर्णपणे पूर्ववत; 17 जुलैपासून अनेक एक्सप्रेस गाड्या पुन्हा मूळ मार्गावर

मुंबई : कर्जत-लोणावळा (Karjat lonavala) दरम्यानच्या मध्य रेल्वेच्या दक्षिण-पूर्व डाऊन मार्गावरील रेल्वे सेवा पूर्णपणे

Transformation of railway stations : पंतप्रधान मोदी उद्या ७५ स्थानके राष्ट्राला करणार समर्पित; 'अमृत भारत' योजनेचा वेग वाढला

मुंबई: रेल्वे प्रवाशांना जागतिक दर्जाच्या सुविधा मिळाव्यात आणि स्थानकांचे रूप पालटावे, या उद्देशाने

Pratap Sarnaik : ओला, उबरसह सर्व कंपन्यांना आता राज्य सरकारचा परवाना बंधनकारक

महाराष्ट्राचे नवे ॲग्रीगेटर धोरण लागू; रिक्षा टॅक्सीप्रमाणे चालकांना बॅच बंधनकारक मुंबई : महाराष्ट्रातील

Devendra Fadnavis : महाराष्ट्राला सर्वाधिक सुलभ शासकीय सेवा देणारे राज्य बनवा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; गव्हर्नन्स प्रोसेस रि-इंजिनियरिंग संदर्भात तिसऱ्या टप्प्याची बैठक मुंबई : राज्य