Raj Thackeray : भावाशी युती करूनही राज ठाकरेंच्या खात्यात २२ शून्य, मुंबईत 'मनसे'ला जबरदस्त धक्का; ठाकरे ब्रँड फेल!

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या सत्तेसाठी २० वर्षांचा वनवास संपवून एकत्र आलेल्या 'ठाकरे बंधूं'साठी आजचा निकाल धक्कादायक ठरताना दिसत आहे. मतमोजणीच्या ताज्या कलानुसार, शिवसेना (उबाठा) आणि मनसेच्या युतीला मुंबईकरांनी नाकारल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. एकीकडे भाजप आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या महायुतीने बहुमताच्या दिशेने वेगाने वाटचाल केली असताना, दुसरीकडे राज ठाकरे यांची मनसे केवळ काही मोजक्याच जागांवर अडकली आहे. विशेष म्हणजे चुलत भाऊ उद्धव ठाकरे यांच्यासोबत युती करूनही राज ठाकरे यांना मुंबईत आपली छाप पाडता आलेली नाही.



महायुतीची निर्णायक मुसंडी


भारतीय जनता पक्षाने मोठी झेप घेतली असून, 'मिशन मुंबई' फत्ते करण्याच्या दिशेने निर्णायक पाऊल टाकले आहे. २२७ जागांसाठी झालेल्या या अटीतटीच्या लढतीत भाजपने तब्बल ८८ जागांवर आघाडी घेत मुंबईतील सर्वात मोठा पक्ष म्हणून आपले स्थान भक्कम केले आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेनेही २८ जागांवर आघाडी मिळवत महायुतीची ताकद वाढवली आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना (उबाठा) गटाने दिलेले कडवे आव्हान मोडीत काढत, मुंबईकरांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या 'डबल इंजिन' सरकारवर विश्वास व्यक्त केला आहे.



मनसेला मोठा फटका


मराठी माणसाच्या मुद्द्यावर राजकारण करणाऱ्या राज ठाकरे यांच्या मनसेचे या निवडणुकीत अक्षरशः पानिपत झाले आहे. राज ठाकरे यांनी यंदा उद्धव ठाकरे यांच्याशी हातमिळवणी करत मुंबईत 'मराठी कार्ड' खेळण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, सुरुवातीच्या निकालानुसार मनसेला केवळ ५ जागांवर समाधान मानावं लागत असल्याचं दिसत आहे. २०१७ च्या निवडणुकीत मनसेचे ७ नगरसेवक निवडून आले होते, यंदा युती करूनही ही संख्या वाढताना दिसत नाहीये. राज ठाकरे यांची सभा आणि संवाद यांचा प्रभाव मतपेटीतून उमटला नसल्याचे चित्र आहे.



प्रमुख शहरांमधील मनसेची पीछेहाट


राज ठाकरे यांच्या पक्षाला अनेक महत्त्वाच्या शहरांमध्ये खातेही उघडता आलेले नाही. पुण्यात १६५ जागांपैकी १२२ जागांचे कल हाती आले असून तिथे मनसेला एकही जागा मिळालेली नाही. ठाणे, नवी मुंबई आणि उल्हासनगरमध्ये मनसेला प्रत्येकी केवळ १ जागा मिळाली आहे. नाशिकमध्ये २ तर अहिल्यानगरमध्ये ३ उमेदवार आघाडीवर आहेत. कल्याण डोंबिवलीत १२२ जागांपैकी मनसेला केवळ ४ जागांवर आघाडी मिळवता आली आहे. याशिवाय नागपूर, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर आणि सोलापूरसह एकूण २२ शहरांमध्ये मनसेचा पूर्णपणे सफाया झाला आहे.



कोणत्या शहरात मनसेचा सफाया?


ज्या २२ शहरातील महानगपालिका निवडणुकीत मनसेला खातं उघडता आलेलं नाही, त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर, नागपूर, कोल्हापूर, सांगली-मिरज-कुपवाड, सोलापूर, मालेगाव, जळगाव, धुळे, इचलकरंजी, नांदेड, लातूर, परभणी, जालना, अमरावती, अकोला आणि चंद्रपूर या महानगरपालिकांचा समावेश आहे.

Comments
Add Comment

Chandrashekhar Bawankule : दुबार पेरणीचा खर्च आता सरकार उचलणार

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती; 'डीपीडीसी'मधून खर्चाची तरतूद करणार मुंबई : पावसाने ओढ दिल्याने आणि

Ashish Shelar : दरवर्षी नाट्यगृहांच्या भाड्यात केवळ 1 ते 2 टक्के वाढ

• कोविडपूर्वीचाच मूळ दर आधारभूत मानणार • नाट्यसृष्टीच्या गोडाऊन व वाहनतळाच्या प्रश्नासाठी महिनाभरात

Navnath Ban : संजय राऊत, इतरांकडे पाहण्यापेक्षा अडगळीत पडलेल्या उबाठाकडे लक्ष द्या - नवनाथ बन

मुंबई : नवनाथ बन यांनी संजय राऊतांवर जोरदार टीका केली. पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले "जनाब संजय राऊत

Nitesh Rane : मच्छिमारांच्या सुरक्षिततेसाठी अत्याधुनिक संप्रेषण व्यवस्था उभारणीसाठी शासन सकारात्मक – मंत्री नितेश राणे

खोल समुद्रातील संपर्कासाठी मच्छिमारांना सॅटेलाईट फोन उपलब्ध करण्यासाठी पुढाकार; बीएसएनएलसोबत समन्वय मुंबई, :

Vinayak Raut News : विनायक राऊतांची सून घेणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट

राऊत कुटुंबियांचा पाय खोलात; फिरोज बाबा शेखच्या साथीदारालाही अटक मुंबई : उबाठा गटाचे माजी खासदार विनायक राऊत(Vinayak

Pratap Sarnaik : एसटीच्या ७८ व्या वर्धापन दिनानिमित्त राज्यव्यापी वृक्षारोपण अभियानाचा शुभारंभ

"झाडे लावा, झाडे जगवा; पर्यावरण संवर्धन ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी" – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक मुंबई :