पश्चिम रेल्वेवरील ब्लॉकमुळे २४० लोकल फेऱ्या रद्द

काही लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांच्या थांब्यात बदल


मुंबई : पश्चिम रेल्वेवरील कांदिवली ते बोरिवली दरम्यान सहाव्या मार्गिकेच्या कामासाठी ३० दिवसांचा ब्लॉक घेण्यात आला असून त्यामुळे दररोज शेकडो लोकल फेऱ्या रद्द होत आहेत. शुक्रवार आणि शनिवारी रात्रकालीन ब्लॉक घेऊन कामे केली जाणार असल्याने या ब्लॉकमुळे तब्बल २४० लोकल फेऱ्या रद्द केल्या जातील. त्यामुळे या मार्गावरील प्रवास गैरसोयीचा ठरणार आहे.


गेल्या वर्षी पश्चिम रेल्वेवर खार रोड ते कांदिवलीपर्यंत सहावी मार्गिका सुरू करण्यात आली. आता कांदिवली ते बोरिवलीपर्यंत सहावी मार्गिका वाढविण्यात येत आहे. या नवीन मार्गिकेमुळे लोकल सेवेचा वक्तशीरपणा वाढविणे आणि लोकल फेऱ्या वाढविणे शक्य होईल. कांदिवली ते बोरिवली विभागादरम्यान सहाव्या मार्गिकेच्या कामासाठी पश्चिम रेल्वेने २० डिसेंबर २०२५ च्या रात्रीपासून ३० दिवसांचा ब्लॉक घेतला आहे. हा ब्लॉक १८ जानेवारीपर्यंत असेल. या ब्लॉकमुळे पश्चिम रेल्वेने लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांच्या वेळापत्रकात बदल केला आहे. तसेच काही लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांच्या थांब्यात बदल केला आहे. तर, काही लोकल सेवा रद्द केल्या आहेत.


पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, बोरिवली ते मालाड दरम्यान अप जलद मार्गावर शुक्रवार आणि शनिवारी रात्री ११.१५ ते रात्री ३.१५ आणि डाऊन जलद मार्गावर मध्यरात्री १ ते पहाटे ४.३० वाजेर्यंत ब्लॉक घेण्यात आला आहे. या ब्लॉकच्या कालावधीत पाचवा मार्ग बंद केल्यामुळे तसेच वेगमर्यादा लागू केल्यामुळे लोकल सेवा रद्द राहतील. त्यात १२ डबा लोकल, १५ डबा लोकल आणि वातानुकूलित लोकलचा समावेश आहे.


जलद लोकलवरील गर्दी कमी होण्याची अपेक्षा


पश्चिम रेल्वेवरील वाढत्या प्रवाशांसाठी लोकल फेऱ्या वाढविण्याचे नियोजन आहे. मर्यादित मार्ग असल्याने लोकल सेवा वाढविणे शक्य होत नाही. वांद्रे टर्मिनस ते बोरिवली दरम्यान लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांसाठी एक स्वतंत्र मार्गिका तयार करण्यात येत आहे. पश्चिम रेल्वेवरील खार रोड ते गोरेगावपर्यंत सहावी मार्गिका होती. गेल्यावर्षी कांदिवलीपर्यंत तिचा विस्तार करण्यात आला. बोरिवलीपर्यंत सहावी मार्गिका वाढविण्यात येईल. या नवीन मार्गिकेमुळे लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांना स्वतंत्र मार्ग उपलब्ध होईल. या मार्गिकेमुळे खार ते बोरिवली दरम्यानच्या जलद लोकलवरील गर्दी कमी होण्याची अपेक्षा आहे.

Comments
Add Comment

मुंबईला जलमुक्त करण्यासाठी महापालिकेचा मास्टर प्लॅन

मुंबई : मुंबई महानगराची भौगोलिक रचना लक्षात घेता सखल भागांमध्ये साचणाऱ्या पावसाच्या पाण्याचा जलद आणि

आर्थिक संकटातील बेस्टची मदतीसाठी राज्य-केंद्राकडे धाव

मुंबई : बेस्टच्या सन २०२६-२७ च्या अर्थसंकल्पीय अंदाजामध्ये सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या थकीत उपदान (ग्रॅच्युटी)

संपूर्ण कोकणाला जलवाहतुकीने जोडणार

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; येत्या ३ वर्षांत मुंबई-महानगरात २७ जेट्टी कार्यान्वित करणार मुंबई : "मुंबई महानगर

ओबीसी समाजाच्या विकासासाठी केंद्र-राज्य समन्वयातून योजनांची अंमलबजावणी करण्यात यावी

 ओबीसी समाजाचा विकास राज्याच्या सर्वांगीण प्रगतीचा पाया;ओबीसी सक्षमीकरणासाठी शासन कटिबद्ध मुंबई: ओबीसी

दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराला 'अ' वर्ग पर्यटन स्थळाचा दर्जान

मुंबई : पुण्यातील प्रसिद्ध दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराला 'अ' वर्ग पर्यटन स्थळाचा दर्जा देण्यात आला आहे. मंगळवारी,

नदीजोड प्रकल्पांची कामे कालमर्यादेत पूर्ण करा -ना.विखे पाटील

कोकण-गोदावरीसह चार महत्त्वाच्या योजनांचा घेतला आढावा मुंबई: राज्यातील महत्त्वाच्या नदीजोड प्रकल्पांची कामे