६६ नगरसेवकांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा

मुंबई : राज्यातील महानगरपालिका निवडणुकीत ६६ नगरसेवकांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला असून, याविरोधात मनसेच्या अविनाश जाधव यांनी दाखल केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली. उमेदवार बिनविरोध निवडून आला असला, तरी मतदारांसाठी नोटाचा पर्याय असावा, अशी मागणी याचिकेत करण्यात आली होती.
मात्र, न्यायालयाने याचिकाकर्त्यांना खडेबोल सुनावत ही याचिका फेटाळून लावली. तुम्ही न्यायालयात सकाळी चुकीचा युक्तिवाद केला, तसेच रिट पिटिशन आणि आधीच्या याचिकेत सार्धम्य असल्याचे सांगितले, मात्र यामध्ये काहीही साम्य आढळून आलेले नाही, त्यामुळे आम्ही याचिकाकर्त्यांना दंड ठोठावत असल्याचे सुरुवातीला न्यायमूर्तींनी सांगितले.
ही याचिका इतर प्रलंबित याचिकांसारखीच असल्याचे नमूद करण्यात आले. मात्र, सुनावणीसाठी याचिका पुकारण्यात आल्यानंतर ऑनलाईन उपस्थित असलेले असीम सरोदे यांनी सांगितले की, ही याचिका तत्सम नसून निवडणुकीशी संबंधित आहे. यामुळे खंडपीठाने नाराजी व्यक्त केली. चुकीचे विधान केल्याबद्दल आम्ही तुमच्यावर दंड लावणार आहोत, असे हायकोर्टाकडून सांगण्यात आले. एखाद्या पक्षकारासाठी अशी चुकीची माहिती देण्यामागे तुमची घाई काय होती?, असा सवालही न्यायालयाने याचिकाकर्त्यांना विचारला. शेवटी न्यायालयाने दंड न आकारता ही याचिका फेटाळून लावली.

किती नगरसेवक बिनविरोध ?


राज्यातील २९ महानगरपालिकांमध्ये मतदान होण्यापूर्वीच ६६ उमेदवार विजयी झाले आहेत. निवडणुका बिनविरोध करण्यात भाजपने आघाडी घेतली असून, भाजपचे ४४ उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत. त्यापाठोपाठ निवडणुका बिनविरोध करण्यात शिवसेनेने दुसरा क्रमांक पटकावला आहे. शिंदेंच्या शिवसेनेते तब्बल १९ नगरसेवक बिनविरोध विजयी झाले आहेत. कल्याण-डोंबिवलीत भाजपचे सर्वाधिक १४ उमेदवार, तर शिवसेनेचे ६ उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत. त्यानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे २, तर मालेगावमधून इस्लाम पार्टीचा एक उमेदवार बिनविरोध विजयी झाला आहे.
Comments
Add Comment

BMC Election 2026 : मुंबई महापालिकेसाठी मतमोजणी कधी सुरू होणार ? कशी असेल प्रक्रिया ?

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई महापालिकेसाठी मतमोजणी शुक्रवार १६ जानेवारी २०२६

‘टपाली मतपत्रिकांच्या पेट्या मतमोजणीच्या दिवशीच गोदामातून बाहेर काढणार’

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ - २६ अंतर्गत, निवडणूक निर्णय अधिकारी - २१ (प्रभाग क्रमांक

मतदानाची वेळ संपली, आतापर्यंत झाले किती टक्के मतदान ?

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांसाठी मतदान करण्याची वेळ

शाई पुसून पुन्हा मतदान करणे शक्य नाही!

राज्य निवडणूक आयुक्तांचे स्पष्टीकरण; मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न मुंबई : महापालिका

Ashish Shelar : मेंदूत केमिकल लोचा अन् हातावर...'रडके' म्हणत आशिष शेलारांनी ठाकरे बंधूना काढला चिमटा

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज उत्साहात मतदान पार पडत असतानाच, शाईच्या

मतदानानंतर बोटावर शाई का लावली जाते? हात किंवा बोट नसल्यास काय असते नियम?

मुंबई : राज्यातील अनेक महापालिकांमध्ये आज मतदान प्रक्रिया सुरू असून नागरिक उत्साहाने आपला मतदानाचा हक्क बजावत