उद्धव ठाकरे यांचे विधान आचारसंहिता भंग करणारे ? मंत्री एँड आशिष शेलार यांचा सवाल

ठाकरेंचे सल्लागार सडके आणि हे रडके


मुंबई : एखादा सराईत असतो त्या पद्धतीने उद्धव ठाकरे हे वारंवार निवडणुकीच्या दिवशीच पत्रकार परिषदा घेतायेत, त्यांच्या पत्रकार परिषदांना परवानगी होती का? त्या पत्रकार परिषदेत त्यांनी निवडणूक यंत्रणेवर बोट ठेवलंय, त्यात त्यांचा राजकीय हेतू त्यांना साध्य करायचा आहे.


त्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेले विधान हे निवडणूक आयोगाने पाहावं लागेल. हे विधान आचारसंहितेचा भंग आहे का? असा आक्षेप एँड आशिष शेलार यांनी आज माध्यमांशी बोलताना नोंदवला.


उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेला मंत्री आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेऊन उत्तर दिले. यावेळी ते म्हणाले की, मुंबईत ज्यावेळेला मतदार जोमाने मतदान करतायेत, दीड वाजेपर्यंत ३० टक्के पार झालंय. मतदार, या यंत्रणा लोकशाहीवर विश्वास मजबुतीने ठेवून सहभागी होतायेत, त्यावेळेला हे आरडाओरडा का? ही अडकाठी का? हा स्पीडब्रेकर का? हा गतिरोध का? उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद आणि त्यांनी केलेले आरोप हे निवडणूक यंत्रणा, निवडणुकीत सहभागी होणारे अधिकारी, मतदार यांना गतिरोध आहेत का? हा स्पीडब्रेकर आहे का? त्याच्यामागचा हेतू काय? ते प्रेस कॉन्फरन्स का घेतायेत? निवडणूक आयोगाने यावर लक्ष ठेवलं पाहिजे आणि हे वारंवार करतायेत, असे शेलार म्हणाले.


पहिल्यांदा दोन्ही ठाकरे बंधूंनी आरोप केला की, मतचोरी झाली. मग मतचोरीवरून मतदार यादीतल्या नावांची चोरी झाली. मग मतदार यादीतल्या नावांच्या चोरीनंतर, मतदार नोंदणीच्या असलेल्या एजन्सी आणि कंपन्या यामध्ये चोरी झाली. तेवढ्यावर थांबले नाहीत, मग दुबार मतदारी चोरी झाली हा आरोप केला. तेवढ्यावर थांबले नाहीत, मग मतदान यंत्रात चोरी आहे सांगितलं. तेवढ्यावर थांबले नाहीत, मग मतदान केंद्र निवड प्रक्रियेमध्ये चोरी आहे सांगितलं. तेवढ्यावर थांबले नाहीत, मग मतदान प्रक्रियेतल्या अधिकाऱ्यांच्या निवडीमध्ये चोरी आहे सांगितलं. तेवढ्यावर थांबले नाहीत, मग प्रचार करण्याच्या नियम नियमावलीमध्ये चोरी आहे असं सांगितलं. तेवढ्यावर थांबले नाहीत, मग पाडू या यंत्रणेत चोरी आहे सांगितलं. तेवढ्यावर थांबले नाहीत, आता शाईवर चोरी आहे सांगितलं.


या एवढ्या चोऱ्या नाहीत. हा त्यांच्या बुद्धीतील हेराफेरीचा प्रकार आहे. यांच्या राजकीय मेंदूमध्ये केमिकल लोचा झाला आहे. बुद्धीतली हेराफेरी आहे, चोरी नाही! यांचे सल्लागार सडके आणि हे रडके, अशी अवस्था यांची झाली आहे, असा आरोपही यांनी केला.

Comments
Add Comment

Nashik : कांदा उत्पादकांना मोठा दिलासा! ‘नाफेड-NCCF’ थेट बाजारात; 'या' दिवसापासून कांदा खरेदी सुरू

Nashik Onion Farmer : मागील अनेक दिवसांपासून कमी दरामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यात अक्षरशः पाणी आलं होतं. योग्य

The Fort owners : किल्लेदारांनी बोटीतून केली मिठी नदीची सैर... दाखवला नदीत कचऱ्यासह तीन फुटांपर्यंतचा गाळ

मुंबई : मान्सूनच्या पार्श्वभूमीवर मुंबईत सध्या नालेसफाईच्या कामाला सुरुवात असून सत्ताधारी पक्षाकडून प्रत्येक

Monkey's Pool Party Inside Taj Mahal : ताजमहालच्या फाउंटनमध्ये माकडांची 'पूल-पार्टी'! उकाड्यापासून वाचण्यासाठी वानरसेनेची धम्माल; व्हिडिओ व्हायरल

नवी दिल्ली : सध्या सर्वत्र उन्हाळ्याच्या तीव्र झळा जाणवत आहेत. या कडक उन्हापासून दिलासा मिळवण्यासाठी जशी

Navi Mumbai : नवी मुंबई हादरली! खारघरमध्ये महामार्गालगत महिलेचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळला; पोलिसांकडून कसून तपास सुरु

नवी मुंबई : नवी मुंबईतील खारघर परिसरात एक अत्यंत धक्कादायक आणि गूढ घटना उघडकीस आली आहे. शनिवारी मुंबई-पुणे

Jalgaon : भीषण अपघातामुळे वाटेतच काळाची झडप, १ वर्षाच्या चिमुकलीसह चौघांचा हृदयद्रावक अंत

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील वरणगावजवळ मुंबई-नागपूर महामार्गावरील (Mumbai-Nagpur Highway) बायपासवर थरारक अशी भीषण रस्ते अपघाताची

Vaibhav Sooryvanshi : ब्रेकिंग न्यूज ! बेबी बॉसने टीम इंडियात येताच सचिनला टाकलं मागे !

मुंबई : भारतीय क्रिकेटच्या भविष्यातील सुपरस्टार मानल्या जाणाऱ्या वैभव सूर्यवंशीने आता नवा इतिहास रचला