BMC Election 2026 : बोटावरची शाई पुसून गैरकृत्य कराल तर सावधान! आयोगाने दिला कायदेशीर कारवाईचा इशारा

मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानादरम्यान 'बोटावरील शाई पुसली जात असल्याच्या' अफवा आणि तक्रारींच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने आज, १५ जानेवारी २०२६ रोजी अधिकृत स्पष्टीकरण दिले आहे. बोटावर लावलेली शाई पुसून पुन्हा मतदान करण्याचा प्रयत्न करणे हे एक गंभीर गैरकृत्य असून, अशा व्यक्तींविरुद्ध कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा आयोगाने दिला आहे.



निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे की, एखाद्या मतदाराने शाई पुसून पुन्हा मतदान केंद्रावर येण्याचा प्रयत्न केला, तरी त्याला पुन्हा मतदान करता येणार नाही. मतदाराने एकदा मतदान केल्यानंतर त्याची नोंद अधिकृतरीत्या केली जाते. त्यामुळे केवळ शाई पुसल्याने कोणीही दुसऱ्यांदा मतदान करू शकणार नाही, याबाबत सर्व निवडणूक केंद्रांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत.







स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मतदाराच्या बोटाला शाई लावण्यासाठी १९ नोव्हेंबर २०११ आणि २८ नोव्हेंबर २०११ रोजी निर्गमित केलेल्या आदेशानुसार 'मार्कर पेन'चा वापर केला जातो. या मार्कर पेनने शाई लावण्याचे विशेष नियम आहेत. बोटावर ठळकपणे उमटेल अशा पद्धतीने शाई लावली जावी. नखावर आणि नखाच्या वरच्या बाजूला त्वचेवर ३-४ वेळा घासून शाई लावण्याच्या सूचना यापूर्वीच देण्यात आल्या आहेत. मार्कर पेनवरही या सूचना स्पष्टपणे नमूद केलेल्या असतात. बोटावर लावलेली शाई पुसण्याचा प्रयत्न करून मतदारांमध्ये विनाकारण संभ्रम निर्माण करणे हे चुकीचे आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये आणि अशा प्रकारचे गैरकृत्य करण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन राज्य निवडणूक आयोगाने केले आहे.

Comments
Add Comment

Chief Minister Devendra Fadnavis : राज्याचे ‘क्वांटम व ‘डीप टेक’धोरण लवकरच आणण्यात येणार

मुंबई: महाराष्ट्राला अत्याधुनिक तंत्रज्ञान क्षेत्रात देशात अग्रस्थानी नेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र

Chief Minister Devendra Fadnavis : मालाडमध्ये जागतिक दर्जाचे ‘मीडिया हब’ उभारण्यासाठी कंपनी स्थापन करण्यात येणार

मुंबई : मालाड येथील आकाशवाणी (प्रसार भारती) च्या जागेवर जागतिक दर्जाचा ‘एकात्मिक चित्रपट आणि दूरदर्शन मीडिया हब’

Amravati : १७ पैकी ४ मतदारसंघात 'मविआ' निवडणुकीआधीच स्पर्धेबाहेर

अमरावतीत शिवसेनेच्या बंडखोराचा अर्ज बाद; नाशिकमध्ये 'उबाठा'कडून शरणागती मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य

Labor Minister Adv. Akash Fundkar : राज्यात ५० किलोपेक्षा अधिक वजनाची हाताळणी न होण्यासाठी नियमांची प्रभावी अंमलबजावणी करणार

मुंबई : आरोग्य आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने राज्यात माथाडी कामगारांकडून ५० किलोपेक्षा अधिक वजनाची हाताळणी करून

Tourism Policy of Maharashtra : हॉटेल्सना 'स्टार श्रेणी प्रमाणपत्रा'ची सक्ती हटवली

पर्यटन विभागाचा निर्णय; 'हॉटेल' आणि 'होमस्टे'च्या व्याख्यांमध्ये सुधारणा मुंबई : राज्यात पर्यटन क्षेत्राला चालना

Nitesh Rane : चिपी विमानतळ ते गोवा जलवाहतूक सुरू होणार

मंत्री नितेश राणे यांच्याकडे प्रस्ताव सादर; प्रमुख पर्यटनस्थळांमधील संपर्क वेगवान होणार मुंबई : सिंधुदुर्ग