BMC Election 2026 : बोटावरची शाई पुसून गैरकृत्य कराल तर सावधान! आयोगाने दिला कायदेशीर कारवाईचा इशारा

मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानादरम्यान 'बोटावरील शाई पुसली जात असल्याच्या' अफवा आणि तक्रारींच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने आज, १५ जानेवारी २०२६ रोजी अधिकृत स्पष्टीकरण दिले आहे. बोटावर लावलेली शाई पुसून पुन्हा मतदान करण्याचा प्रयत्न करणे हे एक गंभीर गैरकृत्य असून, अशा व्यक्तींविरुद्ध कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा आयोगाने दिला आहे.



निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे की, एखाद्या मतदाराने शाई पुसून पुन्हा मतदान केंद्रावर येण्याचा प्रयत्न केला, तरी त्याला पुन्हा मतदान करता येणार नाही. मतदाराने एकदा मतदान केल्यानंतर त्याची नोंद अधिकृतरीत्या केली जाते. त्यामुळे केवळ शाई पुसल्याने कोणीही दुसऱ्यांदा मतदान करू शकणार नाही, याबाबत सर्व निवडणूक केंद्रांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत.







स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मतदाराच्या बोटाला शाई लावण्यासाठी १९ नोव्हेंबर २०११ आणि २८ नोव्हेंबर २०११ रोजी निर्गमित केलेल्या आदेशानुसार 'मार्कर पेन'चा वापर केला जातो. या मार्कर पेनने शाई लावण्याचे विशेष नियम आहेत. बोटावर ठळकपणे उमटेल अशा पद्धतीने शाई लावली जावी. नखावर आणि नखाच्या वरच्या बाजूला त्वचेवर ३-४ वेळा घासून शाई लावण्याच्या सूचना यापूर्वीच देण्यात आल्या आहेत. मार्कर पेनवरही या सूचना स्पष्टपणे नमूद केलेल्या असतात. बोटावर लावलेली शाई पुसण्याचा प्रयत्न करून मतदारांमध्ये विनाकारण संभ्रम निर्माण करणे हे चुकीचे आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये आणि अशा प्रकारचे गैरकृत्य करण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन राज्य निवडणूक आयोगाने केले आहे.

Comments
Add Comment

‘टपाली मतपत्रिकांच्या पेट्या मतमोजणीच्या दिवशीच गोदामातून बाहेर काढणार’

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ - २६ अंतर्गत, निवडणूक निर्णय अधिकारी - २१ (प्रभाग क्रमांक

मतदानाची वेळ संपली, आतापर्यंत झाले किती टक्के मतदान ?

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांसाठी मतदान करण्याची वेळ

शाई पुसून पुन्हा मतदान करणे शक्य नाही!

राज्य निवडणूक आयुक्तांचे स्पष्टीकरण; मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न मुंबई : महापालिका

Ashish Shelar : मेंदूत केमिकल लोचा अन् हातावर...'रडके' म्हणत आशिष शेलारांनी ठाकरे बंधूना काढला चिमटा

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज उत्साहात मतदान पार पडत असतानाच, शाईच्या

मतदानानंतर बोटावर शाई का लावली जाते? हात किंवा बोट नसल्यास काय असते नियम?

मुंबई : राज्यातील अनेक महापालिकांमध्ये आज मतदान प्रक्रिया सुरू असून नागरिक उत्साहाने आपला मतदानाचा हक्क बजावत

'मशिदीवर पुन्हा भोंगे लावण्याचे उबाठाचे वचन'

मुंबई :मशिदीवरील भोंगे पुन्हा लावण्याचे वचन देत उद्धव ठाकरेंनी निवडणूक प्रचार केला, असा गंभीर आरोप मुख्यमंत्री