BMC Election 2026 : बोटावरची शाई पुसून गैरकृत्य कराल तर सावधान! आयोगाने दिला कायदेशीर कारवाईचा इशारा

मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानादरम्यान 'बोटावरील शाई पुसली जात असल्याच्या' अफवा आणि तक्रारींच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने आज, १५ जानेवारी २०२६ रोजी अधिकृत स्पष्टीकरण दिले आहे. बोटावर लावलेली शाई पुसून पुन्हा मतदान करण्याचा प्रयत्न करणे हे एक गंभीर गैरकृत्य असून, अशा व्यक्तींविरुद्ध कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा आयोगाने दिला आहे.



निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे की, एखाद्या मतदाराने शाई पुसून पुन्हा मतदान केंद्रावर येण्याचा प्रयत्न केला, तरी त्याला पुन्हा मतदान करता येणार नाही. मतदाराने एकदा मतदान केल्यानंतर त्याची नोंद अधिकृतरीत्या केली जाते. त्यामुळे केवळ शाई पुसल्याने कोणीही दुसऱ्यांदा मतदान करू शकणार नाही, याबाबत सर्व निवडणूक केंद्रांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत.







स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मतदाराच्या बोटाला शाई लावण्यासाठी १९ नोव्हेंबर २०११ आणि २८ नोव्हेंबर २०११ रोजी निर्गमित केलेल्या आदेशानुसार 'मार्कर पेन'चा वापर केला जातो. या मार्कर पेनने शाई लावण्याचे विशेष नियम आहेत. बोटावर ठळकपणे उमटेल अशा पद्धतीने शाई लावली जावी. नखावर आणि नखाच्या वरच्या बाजूला त्वचेवर ३-४ वेळा घासून शाई लावण्याच्या सूचना यापूर्वीच देण्यात आल्या आहेत. मार्कर पेनवरही या सूचना स्पष्टपणे नमूद केलेल्या असतात. बोटावर लावलेली शाई पुसण्याचा प्रयत्न करून मतदारांमध्ये विनाकारण संभ्रम निर्माण करणे हे चुकीचे आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये आणि अशा प्रकारचे गैरकृत्य करण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन राज्य निवडणूक आयोगाने केले आहे.

Comments
Add Comment

राज्यात आठ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई  : राज्य शासनाने प्रशासकीय स्तरावर मोठे फेरबदल केले असून, राज्यातील ८ वरिष्ठ सनदी (आयएएस) अधिकाऱ्यांच्या

ई-गव्हर्नन्स सुधारणांमध्ये मंत्री नितेश राणेंच्या ‘महाराष्ट्र सागरी मंडळा’चा डंका

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रदीप पी. यांनी स्वीकारले प्रशस्तीपत्र मुंबई  : प्रशासकीय कामकाज अधिक पारदर्शक,

महाराष्ट्रात १ एप्रिलपासून वीजदरात कपात

मुंबई : राज्यातील लाखो वीज ग्राहकांसाठी दिलासादायक बातमी असून, येत्या १ एप्रिलपासून वीजदरात कपात लागू होणार आहे.

राष्ट्रीय महामार्गांतील प्रकल्पग्रस्तांसाठी ऐतिहासिक निर्णय

राज्यातील २८ हजार प्रलंबित दावे जलद मार्गी लावण्यासाठी ५७ लवादांची नियुक्ती फडणवीस सरकारचा शेतकरी हिताचा

मुंबईकरांनो लक्ष द्या! उद्या, मध्य, आणि पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक; वेळ पाहूनच बाहेर पडा

मुंबई : रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे मार्गांवर

राज्यात ‘वन स्टेट, वन पोर्टल’ संकल्पनेला गती; महा सारथी पोर्टलचे मुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण

मुंबई : राज्यात डिजिटल गव्हर्नन्स अधिक सक्षम व नागरिककेंद्रित करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ‘वन स्टेट, वन