BMC Election 2026 : बोटावरची शाई पुसून गैरकृत्य कराल तर सावधान! आयोगाने दिला कायदेशीर कारवाईचा इशारा

मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानादरम्यान 'बोटावरील शाई पुसली जात असल्याच्या' अफवा आणि तक्रारींच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने आज, १५ जानेवारी २०२६ रोजी अधिकृत स्पष्टीकरण दिले आहे. बोटावर लावलेली शाई पुसून पुन्हा मतदान करण्याचा प्रयत्न करणे हे एक गंभीर गैरकृत्य असून, अशा व्यक्तींविरुद्ध कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा आयोगाने दिला आहे.



निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे की, एखाद्या मतदाराने शाई पुसून पुन्हा मतदान केंद्रावर येण्याचा प्रयत्न केला, तरी त्याला पुन्हा मतदान करता येणार नाही. मतदाराने एकदा मतदान केल्यानंतर त्याची नोंद अधिकृतरीत्या केली जाते. त्यामुळे केवळ शाई पुसल्याने कोणीही दुसऱ्यांदा मतदान करू शकणार नाही, याबाबत सर्व निवडणूक केंद्रांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत.







स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मतदाराच्या बोटाला शाई लावण्यासाठी १९ नोव्हेंबर २०११ आणि २८ नोव्हेंबर २०११ रोजी निर्गमित केलेल्या आदेशानुसार 'मार्कर पेन'चा वापर केला जातो. या मार्कर पेनने शाई लावण्याचे विशेष नियम आहेत. बोटावर ठळकपणे उमटेल अशा पद्धतीने शाई लावली जावी. नखावर आणि नखाच्या वरच्या बाजूला त्वचेवर ३-४ वेळा घासून शाई लावण्याच्या सूचना यापूर्वीच देण्यात आल्या आहेत. मार्कर पेनवरही या सूचना स्पष्टपणे नमूद केलेल्या असतात. बोटावर लावलेली शाई पुसण्याचा प्रयत्न करून मतदारांमध्ये विनाकारण संभ्रम निर्माण करणे हे चुकीचे आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये आणि अशा प्रकारचे गैरकृत्य करण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन राज्य निवडणूक आयोगाने केले आहे.

Comments
Add Comment

तब्बल २५ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर चिखलवाडीतील रहिवाशांचे गृह स्वप्न पूर्ण

मुंबई : मुंबईतील ग्रांट रोड परिसरातील जुनी चिखलवाडीचा पुनर्विकास पूर्ण झाला असून येथील २६५ रहिवाशांना

मुंबईतील १२ प्रभाग समित्या बिनविरोध, पाच प्रभाग समित्यांमध्ये होणार निवडणूक

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेत महापौर आणि उपमहापौरांसह चार वैधानिक समित्यांच्या अध्यक्षपदाची निवड

पुण्याच्या इंदिरा युनिव्हर्सिटीच्या संचालकांनी मानले उपमुख्यमंत्री शिंदेंचे आभार

मुंबई: “आजवर तुमच्याबद्दल फक्त ऐकून होते, मात्र तुम्ही प्रत्यक्षात संकटाच्या वेळी मदतीला धावून येता, याची

​गेटवे-एलिफंटा जलवाहतूक सक्षम करण्यासाठी बोट आधुनिकीकरणावर भर; मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत मंत्रालयात बैठक

मुंबई : गेटवे ऑफ इंडिया ते एलिफंटा आणि अलिबाग दरम्यान धावणाऱ्या प्रवासी बोटींचे आधुनिकीकरण करून प्रवाशांना

डॉ. अभिजित चौधरी 'पीएमआरडीए'चे नवे आयुक्त

मुंबई : राज्य शासनाने बुधवारी दोघा सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले असून, पुणे महानगर प्रदेश विकास

पुणे व रायगड जिल्ह्यांत २१०० मेगावॉट क्षमतेच्या उदंचन जलविद्युत प्रकल्प उभारणीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार

मुंबई, दि. ४ : - पुणे व रायगड जिल्ह्यांत २१०० मेगावॉट क्षमतेचा पिंपळपाडा-सावळे उदंचन जलविद्युत प्रकल्प विकसित