Mumbai : किरकोळ वादातून मारामरी,रागाच्या भरात मित्रानेच घेतला...नक्की काय घडलं ?

Mumbai :मुंबईतील एका परिसरात अत्यंत संतापजनक घटना घडली असून, बोलता बोलता वाद झाल्याने एका तरुणावर त्याच्याच मित्राने जीवघेणा हल्ला केल्याचा प्रकार समोर आला आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या किरकोळ वादाचा राग मनात ठेवुन आरोपीने थेट मित्रावर हल्ला केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

या प्रकरणात १९  वर्षीय तौकीर आरीफ शेख याच्यावर अतिफ शेख याने हल्ला केल्याचा आरोप आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ८जानेवारी रोजी तौकीर आणि त्याच्या मित्रांचा मित्र अतिफ शेख यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाला होता. या वादानंतर अतिफने तौकीरला फोन करून धमकी दिली होती, तसेच शिवीगाळ करत परिणामांची चेतावणी दिल्याचा आरोप तक्रारीत नमूद करण्यात आला आहे. १०  जानेवारी रोजी रात्री सुमारे १०.३० वाजताच्या सुमारास तौकीर आपल्या नातेवाईकाला सायन सर्कलवर सोडून लालमिट्टी किस्मतनगर परिसरात परत आला होता. तो एका मित्राला भेटण्यासाठी तेथे थांबला असताना अचानक अतिफ शेख तेथे आला. आरोपीने तौकीरला पाहताच शिवीगाळ सुरू केली. तौकीरने परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न केला, मात्र अतिफने रागाच्या भरात त्याच्यावर जोरदार हल्ला केला.

या हल्ल्यात आरोपीने तौकीरच्या मान आणि कानावर जोरात चावा घेतल्याचा आरोप असून, त्यामुळे तौकीर गंभीर जखमी झाला आहे. या प्रकारामुळे घटनास्थळी उपस्थित नागरिक घाबरून गेले. तौकीरच्या मदतीला धावून आलेल्या नागरिकांनाही आरोपीने धमकावल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तात्काळ पोलिसांना कळवले. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन आरोपी अतिफ शेख याच्याविरोधात गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सुरू आहे. या धक्कादायक घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे.
Comments
Add Comment

दिल्लीत झळकलेला महाराष्ट्राचा मानाचा चित्ररथ आता गिरगावात!

- कर्तव्यपथावर झळकलेल्या महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचा मुंबईकरांना प्रत्यक्ष अनुभव मुंबई : नवी दिल्ली

गुढीपाडव्याच्या दिवशी बीकेसी पासपोर्ट कार्यालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी

मुंबई: मुंबईत एक धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत बीकेसीच्या पासपोर्ट कार्यालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी

मिठी नदीच्या सफाईसाठी कुणी कंपनी पुढे येईना; स्थायी समितीत सविस्तर निवेदन करण्याचे अध्यक्षांचे प्रशासनाचे निर्देश

मुंबई: मुंबईतील मिठी नदीतील गाळ काढण्यासाठी नव्याने कंत्राटदार नियुक्त करण्यासाठी मागवलेल्या निविदेला

मृणालताई गोरे विस्तारित उड्डाणपूलाच्या वाढीव खर्चावरून शंका; स्थायी समितीचे सदस्य करणार प्रत्यक्ष जागेची पाहणी

मुंबई: मृणालताई गोरे रेल्वे उड्डाणपुलाला जोडणाऱ्या राम मंदिर रोड ते गोरेगाव पश्चिम पर्यंतच्या रिलीफ रोड

सहली आडून कंत्राटदारांचे खिसे भरण्याचा घाट भाजपने उधळला

मुंबई: मुंबई महापालिकेच्या शाळांमधील मुलांची राणीबाग आणि बोरीवली नॅशनल पार्कमध्ये सहल आयोजित करण्याचा

अखेर महापौर चषक स्पर्धा होणार; सन २०२६-२७ मध्ये होणाऱ्या महापौर चषक क्रीडा स्पर्धांसाठी पाच कोटी रुपये निधीची तरतूद

मुंबई: डिजिटल युगात मुले भ्रमणध्वनीभोवती गुरफटली आहेत. मुले मैदानी खेळ विसरली आहेत. मुलांचा ‘स्क्रीन टाईम’ कमी