मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर दुटप्पी!

मोहम्मद कैफ याचे संघ व्यवस्थापनावरही गंभीर आरोप


नवी दिल्ली : न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत भारतीय संघाला एकामागून एक दुखापतींचे धक्के सहन करावे लागत आहेत. रिषभ पंत मालिकेआधीच दुखापतग्रस्त झाला, तर पहिल्या एकदिवसीय सामन्यात वॉशिंग्टन सुंदरला दुखापत झाली. तरीही मुख्य प्रशिक्षक व संघ व्यवस्थापनाने त्याला फलंदाजीला पाठवले आणि त्यांच्या याच निर्णयावर माजी फलंदाज मोहम्मद कैफ संतापला आहे.


सुंदरने त्या सामन्यात ७ चेंडूंत ७ धावा केल्या होत्या. सामन्यानंतर वॉशिंग्टन सुंदरने मालिकेतून माघार घेतली. त्याच्या जागी उर्वरित दोन वन डे सामन्यांसाठी आयुष बडोनीची निवड करण्यात आली. पण, जखमी असूनही सुंदरला फलंदाजी करण्याच्या निर्णयावर राग व्यक्त करताना मोहम्मद कैफने संघ व्यवस्थापन व गौतम गंभीर यांचा दुटप्पीपणा समोर आणला. त्याने शुभमन गिलचे उदाहरण दिले. शुभमन दुखापतग्रस्त झाला तेव्हा गंभीर आणि संघ व्यवस्थापनाने कशा प्रकारने त्याला वाचवले, हे कैफने सांगितले.


‘शुभमन गिल दुखापतग्रस्त झाला ते आठवते का, कोलकाता येथे झालेल्या त्या कसोटीत तो फलंदाजीला आला नव्हता. तो मोठ्या धावसंख्येचा सामना झाला होता आणि गिलने २०-३० धावा जरी केल्या असत्या, तर भारताला विजय मिळवण्यास मदत झाली असती, असे लोकांना वाटत होते. तरीही तो फलंदाजीला आला नाही. त्याची दुखापत आणखी वाढू नये म्हणून त्याला सुरक्षित ठेवले गेले. पण, सुंदरच्या बाबातीत असे का केले नाही? त्यामुळेच सुंदरला फलंदाजीला पाठवण्याचा निर्णय चुकीचा असल्याचे मला वाटते. केएल राहूलसोबत धाव घेताना त्याला आणखी त्रास झाला असता,’ असे कैफ म्हणाला.


भारतीय संघाने तो सामना जिंकला असला तरी सुंदरला फलंदाजीला पाठवणे धोक्याचे ठरू शकले असते. तो म्हणाला, तो दुखापतग्रस्त होता आणि तुम्हाला प्रत्येक चेंडूवर फक्त धावा करायच्या होत्या, तर तुम्ही दुसऱ्या एखाद्या खेळाडूला पाठायला हवे होते. एखादा खेळाडू जखमी असताना तुम्ही त्याला फलंदाजीला पाठवून त्याची दुखापत आणखी वाढली असती. चेंडू डीप पॉइंट किंवा स्क्वेअर लेगला गेला, तरी तो दुसरी धाव धावू शकत नव्हता. तो केवळ एकच धाव घेऊ शकत होता. म्हणून मला वाटते तो चुकीचा निर्णय होता. तुम्ही कुलदीप किंवा दुसऱ्या कोणाला पाठवू शकले असता. जेव्हा परिस्थिती टाळण्यासाऱखी नसती तर सुंदरला पाठवणे मी समजू शकत होतो, असेही कैफ म्हणाला.

Comments
Add Comment

न्यूझीलंडने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेची निराशाजनक सुरुवात

कोलंबो : आर. प्रेमदासा स्टेडियम येथे आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकपमधील सुपर ८ फेरीतला श्रीलंका विरुद्ध

...तरच भारत सेमी फायनल खेळू शकेल

मुंबई : आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकपमध्ये सुपर ८ फेरीचे सामने सुरू आहेत. ग्रुप एक मध्ये वेस्ट इंडिज (धावगती

फिटनेस स्टार मयांक पवार याचे ३७ व्या वर्षी आकस्मिक निधन

मुंबई : रिअ‍ॅलिटी शोच्या दुनियेतून प्रसिद्धी मिळवलेले आणि फिटनेस क्षेत्रात स्वतंत्र ओळख निर्माण करणारे

ICC Women's T20 World Cup : आयसीसी महिला टी२० विश्वचषकाचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर; जाणून घ्या भारताचा सामना कधी ?

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) आयसीसी महिला टी२० विश्वचषक २०२६ चे संपूर्ण वेळापत्रक जाहीर केले. ही

विंडीजचा झिम्बाब्वे विरुद्ध मोठा विजय

मुंबई : आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकप स्पर्धेतील सुपर ८ फेरीत वेस्ट इंडिज विरुद्ध झिम्बाब्वे हा सामना

‘जर-तर’च्या समीकरणावर ठरणार भारताचा सेमीफायनलचा प्रवेश!

धावगती उंचावण्यासाठी दोन्ही सामने फरकाने जिंकावे लागणार नवी दिल्ली : टी-२० वर्ल्ड कपमध्ये सर्वात मजबूत संघ