प्रचाराचा धुरळा शांत; उद्या मतदान

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासन तयार


विरार :वसई विरार शहर महानगरपालिकेच्या ११५ जागांसाठी गुरुवारी मतदान होणार आहे. त्या अनुषंगाने मंगळवारी सायंकाळी प्रचाराची मुदत संपली असून, उमेदवारांनी आता खाजगी रीत्या गाठीभेटी सुरू केल्या आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासन सज्ज झाली आहे. मतदान केंद्र, मतमोजणी केंद्र, स्ट्रॉंग रूम, कर्मचारी प्रशिक्षण, अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली असून संपूर्ण तयारी करण्यात आल्याची माहिती पालिकेने दिली.


वसई विरार महानगरपालिका हद्दीत ११५ जागांसाठी उद्या ( गुरुवारी ) मतदान होणार आहे. यासाठी एकूण ५४७ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून ११ लाख २६ हजार ४०० मतदार या उमेदवारांचे भवितव्य ठरवणार आहेत. निवडणुकीसाठी एकूण १ हजार ३३५ मतदार केंद्र तयार करण्यात आली आहेत. या ठिकाणी एकूण ८ हजार १० कर्मचारी तैनात करण्यात आले असून या सर्वांना प्रशिक्षण देखील देण्यात आले आहे. तसेच ३१७ ठिकाणी दिव्यांगांसाठी व्हीलचेअरची व्यवस्था करण्यात आली आहे. या व्यतिरिक्त निवडणुकीकरिता ९ निवडणूक निर्णय अधिकारी आणि ९० केंद्र निहाय अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आल्याची माहिती पालिका आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी यांनी दिली. तसेच प्रशासनातर्फे सर्व तयारी पूर्ण झाली असून वसई विरार मधील मतदारांनी मतदानाच्या दिवशी जास्तीत जास्त मतदान करून लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होण्याचे आवाहन आयुक्तांनी केले आहे.


७० टक्के मतदारांना स्लिप पोहचल्या :


वसई - विरार महानगरपालिका हद्दीतील उमेद्वारांसाठी शहराबाहेर राहणाऱ्या मतदारांकडून टपाली मतदान करण्यात आले आहे. एकूण ९३२ मतदारांनी टपाली मतदान केले आहे. तसेच यासह उद्या होणाऱ्या मतदानासाठी मतदारांपर्यंत मतदान स्लिप पोचविण्याचे काम देखील सुरु असून ते ७० टक्के पूर्ण झाल्याची माहिती पालिकेने दिली. तसेच मतदारांना आपल्या मतदान केंद्राची माहिती हवी असल्यास पालिकेच्या संकेतस्थळावर याबाबतची माहिती उपलब्ध असल्याची माहिती पालिकेने दिली. यासह मतदान करताना मतदारांनी ४ मत एका वेळी देणे गरजेचे आहे. मात्र एखाद्या मतदाराने केवळ एकाच उमेदवाराला मत दिल्यानंतर इतर तिघांना मत देण्यास नकार दिल्यास उपस्थित कर्मचाऱ्यांच्या मदतीने नोटावर मत देण्यात येणार असल्याचिं माहिती पालिका आयुक्तांनी दिली.

Comments
Add Comment

Bullet Train : बुलेट ट्रेनचे राज्यातील काम जोरात, तंत्रज्ञांनी पालघर जिल्ह्यात केली कमाल

पालघर : मुंबई - अहमदाबाद बुलेट ट्रेनचे काम प्रगतीपथावर आहे. केंद्रातल्या मोदी सरकार आणि राज्यातल्या फडणवीस

Mumbai-Ahmedabad Bullet Train : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन: पालघरमध्ये तिसऱ्या डोंगराळ बोगद्याचे काम फत्ते; अवघ्या ५ महिन्यांत महाराष्ट्रातील 'हे' मोठे आव्हान पूर्ण

पालघर : देशातील पहिल्या हाय-स्पीड रेल्वे प्रकल्पाच्या (high-Speed Railway Project) म्हणजेच 'मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन'च्या

मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील अपघातात ठार १३ जणांवर अंत्यसंस्कार, पीडित कुटुंबांचे पालकत्व शासन स्वीकारणार

डहाणू : मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील धनिवरी येथे १८ मे रोजी झालेल्या भीषण अपघातातील १३ मृतांवर आज अत्यंत

Palghar Accident : काळजाचा ठोका चुकवणारं दृश्य! एकाच रांगेत १२ मृतदेह, बापूगावात महिलांचा हृदय पिळवटून टाकणारा आक्रोश

पालघर : आनंदाने नटलेले घर, साखरपुड्याच्या निमित्ताने जमलेले सर्व नातेवाईक आणि उत्साहाचे वातावरण... पण नियतीच्या

Palghar Accident : साखरपुड्याच्या वऱ्हाडावर काळाचा घाला, १३ जणांचा मृत्यू; मृतांच्या वारसांना मदत जाहीर

डहाणू : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर डहाणू तालुक्यातील धानोरी येथे रविवारी दुपारी एक अत्यंत भीषण आणि

Mumbai- Ahemdabad Expressway Accident : डहाणूमध्ये 100 वऱ्हाड्यांनी भरलेल्या ट्रकला भरधाव कंटेनरची धडक; 12 जणांचा जागीच मृत्यू, 25 हून अधिक गंभीर

डहाणू : साखरपुड्याचा आनंद साजरा करण्यासाठी निघालेल्या एका कुटुंबावर आणि त्यांच्या पाहुण्यांवर काळाने अचानक