उबाठाची मते विकत घेण्याची धडपड, वरळीत केले पैसेवाटप


मुंबई : मुंबई महापालिकेसाठी १५ जानेवारी मतदान होणार आहे. प्रचाराला अवघे काही तास उरले आहेत. या परिस्थितीत प्रत्येक उमेदवार आणि त्याचे कार्यकर्ते ताकद पणाला जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. नेमक्या अशा वेळी आपण केलेली कामं सांगत प्रचार करण्याऐवजी उबाठा उमेदवारांचे समर्थक मतदारांना पैसे वाटून मतं विकत घेण्याची धडपड करत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.


वरळीत प्रभाग १९३ मध्ये उमेदवार हेमांगी वरळीकर यांचे पती हरिश वरळीकर यांनी महिलांना बैठकीच्या नावाखाली बोलावून थेट पैसे वाटल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. अपक्ष उमेदवाराने तसेच महायुतीच्या प्रभाग १९३ मधील उमेदवाराने हे आरोप केले आहेत. उबाठाकडून मतदारांना सुरू असलेल्या पैसे वाटपाचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत. हेमांगी वरळीकर यांच्या विरोधात उभ्या असलेल्या उमेदवारांनी घडलेल्या प्रकाराची दखल घेत निवडणूक निवडणूक अधिकाऱ्यांनी नियमानुसार कारवाई करावी अशी मागणी केली आहे.


हेमांगी वरळीकर यांचे पती हरिश वरळीकर यांनी महिलांना पैसे वाटल्याचा आरोप सूर्यकांत कोळी यांनीही केला आहे. सूर्यकांत कोळी हे उबाठाचे माजी शाखाप्रमुख आहेत. त्यांनीच पैसे वाटपाचे व्हिडीओ समोर आणले आहेत. आता निवडणूक अधिकारी काय कारवाई करतात याकडे अनेकांचे लक्ष आहे.


मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी आहे. मुंबई महापालिकेचे वार्षिक बजेट हे देशातल्या इतर सर्व महापालिकांपेक्षा प्रचंड मोठे आहे. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शहर असल्यामुळे मुंबईला विशेष महत्त्व आहे. अशा या मुंबईच्या महापालिकेवर मागील २५ वर्षांपासून ठाकरेंच्या नेतृत्वात सत्ता राबवली जात होती. ही सत्ता यापुढेही राहणार की जाणार हे १६ जानेवारीला मतमोजणीतून स्पष्ट होणार आहे. घोडमैदान जास्त दूर नाही. यामुळे राजकीय आरोप प्रत्यारोपांचा जोर वाढला आहे.


याआधी सोमवारी रात्री मुंबईत शिवाजी पार्क मैदानावर महायुतीची प्रचारसभा झाली. या सभेतून महायुतीच्या नेत्यांनी उद्धव यांच्या पक्षाच्या महापालिकेतील सत्तेला थेट आव्हान दिले. उद्धव यांच्या पक्षाने सत्तेत असताना मुंबईच्या विकासाकरिता एकही योजना राबवली नाही. आधीच्या सरकारांनी सुरू केलेल्या विकास योजनांना स्थगिती देणे, सरकारी योजनांतून मलिदा खाणे असे उद्योग बिनबोभाट सुरू ठेवले. पण जनतेसाठी काम केले नाही. याउलट महायुतीने राज्यात सत्तेत आल्यापासून मुंबई तसेच राज्यातील इतरही सर्व शहरांच्या विकासाकरिता विचारपूर्वक विविध कामं करायला सुरुवात केली, असे मुख्यमंत्री म्हणाले. महायुतीच्या प्रचारसभेला अवघे काही तास होत नाहीत तोच मुंबईत उबाठाकडून मतदारांना पैसे वाटप झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात पुढे काय घडते याकडे अनेकांचे लक्ष आहे.




Comments
Add Comment

Prashant Kishor : जनतेने बिहारसाठी 'चांगल्या' मुख्यमंत्र्याची निवड करण्याचा संदेश दिला, विजयानंतरची प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया

पाटणा : बिहारच्या बांकीपूर विधानसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत जन सुराज पक्षाचे संस्थापक आणि अध्यक्ष

Rain Update : 'पश्चिमी विक्षोभा'मुळे देशभरात मुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अनेक राज्यांना सतर्कतेचा इशारा

नवी दिल्ली : हवामान विभागाने देशभरात आठवडाभर मान्सून सक्रिय राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. उत्तर भारतातील

FYJC : अकरावी प्रवेशासाठी मंगळवार ४ ऑगस्टपासून विशेष फेरी

मुंबई : शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठीच्या इयत्ता अकरावी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत आतापर्यंत १५ लाखांहून

Devendra Fadnavis : राष्ट्रीय स्तरावर शालेय शिक्षणात महाराष्ट्राचे महत्त्वपूर्ण स्थान; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राज्यातील शालेय शिक्षण क्षेत्रात अभिनव उपक्रमांची अंमलबजावणी https://prahaar.in/2026/08/03/promotion-for-18-officers-of-the-legislature-secretariat/ शालेय

Mumbai Metro : मेट्रो -६ प्रकल्पाचे ८८ टक्के काम पूर्ण, कारशेडचा प्रश्न कायम

मुंबई : स्वामी समर्थ नगर-जोगेश्वरी-विक्रोळी मेट्रो-६चे काम अंतिम टप्प्यात पोहोचले असले तरी कांजुरमार्ग कारशेडचा

Chandrashekhar Bawankule : आमचा 'शेर' महाराष्ट्रात प्रचंड ताकद निर्माण करतोय!

- महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून मंत्री नितेश राणे यांच्याबद्दल गौरवोद्गार - नितेश राणे