मच्छीमारांसाठी २६ नव्या योजना राबविणार

मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांची ग्वाही


वसई :मच्छीमार बांधवांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी आम्ही सदैव प्रयत्नात आहोत. केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून आता नवीन २६ योजना मच्छीमार बांधवांच्या हितासाठी राबविण्यात येतील अशी ग्वाही राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी दिली. वसई विरार महापालिकेच्या निवडणुकीसाठी सोमवारी महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ वसई येथे पार पडलेल्या सभेत मंत्री राणे यांनी सांगितले की, मी राणे आहे. दिलेला शब्द पाळणे असे आमच्यावर राणे साहेबांचे संस्कार आहेत. आमचा शब्द म्हणजे बंदुकीतील गोळीसारखा आहे. त्यामुळे जे बोलतो ते आम्ही करतो. मच्छीमार बांधवांसाठी दोन लाखांचे बिनव्याजी कर्ज मिळणार आहे. सर्व मच्छीमारांना याचा लाभ मिळणार आहे. तसेच मच्छीमारांसाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून २६ नवीन योजना आणणार आहोत, असे त्यांनी यावेळी सांगितले. वाढवण बंदरामुळे मच्छीमारी बंद होईल अशी अफवा ज्यांना मच्छीमारी व्यवसायातील पाच टक्के ही कळत नाही ते लोक पसरवीत आहेत. मात्र, तुम्ही काहीही काळजी करू नका, असे त्यांनी सांगितले. तर दिवाणमान येथे झालेल्या सभेत, आय लव महादेव विचाराचे नगरसेवक, महापौर तुम्ही बसवावेत हे सांगण्यासाठी मी इथे आलोय, असे मंत्री राणे म्हणाले. तुम्ही फक्त आशीर्वाद द्या. १६ तारखेनंतर या परिसराचा कायापालट करण्याची जबाबदारी आमची आहे. आम्हाला इथे हिंदू-मुसलमान करायचे नाही पण तुम्ही हिंदूबरोबर मस्ती करणार असाल तर आम्ही ही दोन हाथ करायला तयार आहोत. शेवटी आम्ही बाळासाहेबांचे ओरिजनल सैनिक आहोत, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

Comments
Add Comment

Operation Antim Prahaar अंतर्गत ८ नक्षलवाद्यांना अटक, गडचिरोली जिल्हा अखेर नक्षलमुक्त

गडचिरोली : नक्षलवादी चळवळीचे समूळ उच्चाटन करण्यासाठी गडचिरोली पोलिसांनी राबविलेल्या 'ऑपरेशन अंतिम प्रहार' या

NCP : पटेल, तटकरे पदावर कायम, राष्ट्रवादी काँग्रेस लवकरच निवडणूक आयोगाला नवीन पत्र पाठवणार

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अंतर्गत बदलांबाबत सुरू असलेल्या मोठ्या राजकीय चर्चांना पूर्णविराम

Rain Update : वेळेआधीच मान्सून अंदमानात, महाराष्ट्रात २ ते ५ जून दरम्यान पावसाच्या आगमनाचा अंदाज

मुंबई : देशाच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. यंदा 'अल निनो'चे

Weather Alert : मुंबई, ठाणे, पालघर, रायगडमध्ये उष्णतेची लाट

मुंबई : राज्यात सध्या एकीकडे अवकाळी पाऊस तर दुसरीकडे कडाक्याचे ऊन अशी दुहेरी हवामान स्थिती पाहायला मिळत आहे. याच

Modi : सध्याचे दशक अनिश्चितता, जागतिक संकटाचे

नेदरलँड : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी आपल्या नेदरलँड्स दौऱ्यादरम्यान द हेग येथे भारतीय समुदायाला

Education : १ जुलैपासून इयत्ता ९ वी आणि १० वीसाठी तीन भाषा अनिवार्य, CBSE चा निर्णय

नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून इयत्ता ९ वी आणि १० वीच्या भाषा