मच्छीमारांसाठी २६ नव्या योजना राबविणार

मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांची ग्वाही


वसई :मच्छीमार बांधवांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी आम्ही सदैव प्रयत्नात आहोत. केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून आता नवीन २६ योजना मच्छीमार बांधवांच्या हितासाठी राबविण्यात येतील अशी ग्वाही राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी दिली. वसई विरार महापालिकेच्या निवडणुकीसाठी सोमवारी महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ वसई येथे पार पडलेल्या सभेत मंत्री राणे यांनी सांगितले की, मी राणे आहे. दिलेला शब्द पाळणे असे आमच्यावर राणे साहेबांचे संस्कार आहेत. आमचा शब्द म्हणजे बंदुकीतील गोळीसारखा आहे. त्यामुळे जे बोलतो ते आम्ही करतो. मच्छीमार बांधवांसाठी दोन लाखांचे बिनव्याजी कर्ज मिळणार आहे. सर्व मच्छीमारांना याचा लाभ मिळणार आहे. तसेच मच्छीमारांसाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून २६ नवीन योजना आणणार आहोत, असे त्यांनी यावेळी सांगितले. वाढवण बंदरामुळे मच्छीमारी बंद होईल अशी अफवा ज्यांना मच्छीमारी व्यवसायातील पाच टक्के ही कळत नाही ते लोक पसरवीत आहेत. मात्र, तुम्ही काहीही काळजी करू नका, असे त्यांनी सांगितले. तर दिवाणमान येथे झालेल्या सभेत, आय लव महादेव विचाराचे नगरसेवक, महापौर तुम्ही बसवावेत हे सांगण्यासाठी मी इथे आलोय, असे मंत्री राणे म्हणाले. तुम्ही फक्त आशीर्वाद द्या. १६ तारखेनंतर या परिसराचा कायापालट करण्याची जबाबदारी आमची आहे. आम्हाला इथे हिंदू-मुसलमान करायचे नाही पण तुम्ही हिंदूबरोबर मस्ती करणार असाल तर आम्ही ही दोन हाथ करायला तयार आहोत. शेवटी आम्ही बाळासाहेबांचे ओरिजनल सैनिक आहोत, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

Comments
Add Comment

Plane Crashes : बीजिंगमध्ये हाहाकार! १७०० फुटी 'चायना झुन' टॉवरमध्ये घुसलं विमान

बीजिंगच्या सर्वात उंच इमारतीला विमानाची जोरदार धडक   चीन: चीनची (China) राजधानी बीजिंगमध्ये (Beijing) शुक्रवारी एक

ISSF Junior World Championship. :आयएसएसएफ ज्युनियर विश्व अजिंक्यपद स्पर्धेत भारताचा देदिप्यमान विजय

आयएसएसएफ (ISSF) ज्युनियर विश्व अजिंक्यपद स्पर्धा २०२६: भारताचा देदिप्यमान विजय; २४ पदकांसह अव्वल स्थान

Dam Water Levels : रायगड जिल्ह्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ

जिल्ह्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ नागरिकांसह शेतकऱ्यांना मोठा दिलासा अलिबाग : रायगड जिल्ह्यात मागील

Rice productivity : कोकणातील तांदूळ उत्पादकतेत १२ टक्क्याने घट

खारजमिनीत वाढ, हवामान बदल आणि वाढत्या नागरिकरणाचा विपरीत परिणाम रायगड : कोकण किनारपट्टीचे मुख्य, पारंपरिक आणि

India-Nepal Trade : भारताचा नेपाळला मोठा दणका! सीमेवर १३ लाख किलो चहा खोळंबला; नव्या नियमांमुळे व्यापारावर परिणाम

सीमेवर १३ लाख किलो चहा खोळंबला भारताच्या नव्या नियमांमुळे नेपाळच्या व्यापारावर परिणाम नवी दिल्ली : भारत आणि

Home Minister Amit Shah : एका पंधरवड्यात ६ हजार कोटी रुपयांचे ड्रग्ज जाळणार

एका पंधरवड्यात ६ हजार कोटी रुपयांचे ड्रग्ज जाळणार नवी दिल्ली : पुढील १५ दिवसांत संपूर्ण देशात ६००० कोटी रुपये