मच्छीमारांसाठी २६ नव्या योजना राबविणार

मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांची ग्वाही


वसई :मच्छीमार बांधवांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी आम्ही सदैव प्रयत्नात आहोत. केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून आता नवीन २६ योजना मच्छीमार बांधवांच्या हितासाठी राबविण्यात येतील अशी ग्वाही राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी दिली. वसई विरार महापालिकेच्या निवडणुकीसाठी सोमवारी महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ वसई येथे पार पडलेल्या सभेत मंत्री राणे यांनी सांगितले की, मी राणे आहे. दिलेला शब्द पाळणे असे आमच्यावर राणे साहेबांचे संस्कार आहेत. आमचा शब्द म्हणजे बंदुकीतील गोळीसारखा आहे. त्यामुळे जे बोलतो ते आम्ही करतो. मच्छीमार बांधवांसाठी दोन लाखांचे बिनव्याजी कर्ज मिळणार आहे. सर्व मच्छीमारांना याचा लाभ मिळणार आहे. तसेच मच्छीमारांसाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून २६ नवीन योजना आणणार आहोत, असे त्यांनी यावेळी सांगितले. वाढवण बंदरामुळे मच्छीमारी बंद होईल अशी अफवा ज्यांना मच्छीमारी व्यवसायातील पाच टक्के ही कळत नाही ते लोक पसरवीत आहेत. मात्र, तुम्ही काहीही काळजी करू नका, असे त्यांनी सांगितले. तर दिवाणमान येथे झालेल्या सभेत, आय लव महादेव विचाराचे नगरसेवक, महापौर तुम्ही बसवावेत हे सांगण्यासाठी मी इथे आलोय, असे मंत्री राणे म्हणाले. तुम्ही फक्त आशीर्वाद द्या. १६ तारखेनंतर या परिसराचा कायापालट करण्याची जबाबदारी आमची आहे. आम्हाला इथे हिंदू-मुसलमान करायचे नाही पण तुम्ही हिंदूबरोबर मस्ती करणार असाल तर आम्ही ही दोन हाथ करायला तयार आहोत. शेवटी आम्ही बाळासाहेबांचे ओरिजनल सैनिक आहोत, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

Comments
Add Comment

DCM Eknath Shinde : उपमुख्यमंत्री शिंदेंनी केली मिसिंग लिंकच्या कामाची पाहणी, महाराष्ट्र दिनी होणार उद्घाटन; मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील घाटाला मिळणार बायपास

मुंबई : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाला पूर्णतः ‘ऍक्सेस कंट्रोल’ बनवणाऱ्या महत्त्वाच्या ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे

Drugs Case : मीरा रोडमध्ये २३.३ लाख रुपयांचे ड्रग्स जप्त, तिघांना अटक

मीरा रोड : मुंबईलगतच्या मीरा-भाईंदर शहरात पोलिसांनी गेल्या दोन दिवसांत वेगवेगळ्या कारवाईत एकूण तेवीस लाख तीस

MODI : पंतप्रधान मोदींचा सोमवारी आणि मंगळवारी सिक्कीम तर बुधवारी आणि गुरुवारी उत्तर प्रदेशचा दौरा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सोमवारी २७ आणि मंगळवार २८ एप्रिल असा दोन दिवसांचा सिक्कीम दौरा तसेच

PM MODI : 'आजच्या जागतिक तणावाच्या काळात बुद्धांचे विचार अधिक महत्त्वाचे'

नवी दिल्ली : बुद्धांचा संदेश केवळ भूतकाळ नाही, तो आजही प्रासंगिक आहे आणि भविष्यासाठीही आवश्यक आहे. बुद्ध

Karnataka : पादचारी पूल कोसळला, आठ जखमी

मंगळुरू : कर्नाटकमध्ये दक्षिण कन्नड जिल्ह्यातील मूडबिद्री तालुक्यात एक अरुंद पादचारी पूल कोसळला. या

Lungi Ngidi : लुंगी एनगिडीला रुग्णालयातून डिस्चार्ज, चाहत्यांचे मानले आभार

नवी दिल्ली : दिल्ली कॅपिटल्सचा वेगवान गोलंदाज लुंगी एनगिडीने रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर आपली पहिली