टाटा मुंबई मॅरेथॉनसाठी धावपटू सज्ज

मुंबई : आशियातील सर्वात मानाची आणि जगातील अव्वल मॅरेथॉनपैकी एक असलेली 'टाटा मुंबई मॅरेथॉन' यंदा २१ व्या वर्षात पदार्पण करत आहे. येत्या १८ जानेवारी रोजी होणाऱ्या या 'गोल्ड लेबल' रेसमध्ये यंदा जागतिक स्तरावरील अत्यंत वेगवान धावपटूंचा ताफा उतरणार आहे. विशेष म्हणजे, सहभागी होणाऱ्या ८ पुरुष आणि ६ महिला धावपटूंच्या वैयक्तिक सर्वोत्तम वेळा सध्याच्या स्पर्धा विक्रमांपेक्षा अधिक जलद असल्याने, यंदा मुंबईच्या रस्त्यांवर नवे विक्रम प्रस्थापित होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.


सध्या पुरुष गटात इथिओपियाचा हायले लेमी बेरहानू आणि महिला गटात अँकिआलेम हायमॅनॉट यांच्या नावावर मुंबई मॅरेथॉनचे विक्रम आहेत. हे विक्रम मोडीत काढणाऱ्या धावपटूला ५० हजार डॉलर्सच्या मुख्य बक्षिसाव्यतिरिक्त अतिरिक्त १५,००० डॉलर्सचे बक्षीस दिले जाणार आहे. या भव्य पारितोषिकांमुळे स्पर्धेची चुरस अधिकच वाढली आहे.


एरिट्रियाचा मेरहावी केसेते या शर्यतीचा मुख्य आकर्षण असेल. त्याच्यासोबत युगांडाचा विश्वविजेता व्हिक्टर किपलांगाट आणि दक्षिण आफ्रिकेचा अनुभवी स्टीफन मोकाका हे विजेतेपदासाठी कडवी झुंज देतील. इथिओपियाचे बाजेझेव अस्मारे आणि ताडू डेमे हे देखील विजयाचे प्रबळ दावेदार मानले जात आहेत. महिलांमध्ये गेल्या वर्षीची कांस्य पदक विजेती मीडिना डेमे आर्मिनो यंदा जेतेपदासाठी सज्ज आहे. तिला झिनाह सेनबेटा, येशी चेकोले आणि श्युरे डेमिसे यांसारख्या वेगवान धावपटूंकडून मोठे आव्हान मिळण्याची चिन्हे आहेत.

Comments
Add Comment

कांदळवन क्षेत्रात अॅमेझॉन, फ्लिपकार्ट, झेप्टोची बेकायदा गोदामे

आमदार संजय उपाध्याय यांचा गंभीर आरोप; पाहणीसाठी गेलेल्या लोकप्रतिनिधींना बाऊन्सर्सकडून दमदाटी मुंबई : मुंबईची

मानखुर्दचा SMS एन्व्होक्लीनचा भस्मीकरण प्रकल्प २१ महिन्यांत हलविणार

मुंबई : मानखुर्द व शिवाजीनगर भागातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेऊन मानखुर्द शिवाजी विधानसभा क्षेत्रातील

शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी कॅनडाचे तंत्रज्ञान महाराष्ट्रात वापरणार

मुंबई : महाराष्ट्रातील शेतीला आधुनिकतेची जोड देण्यासाठी राज्य सरकारने आता जागतिक स्तरावर पावले उचलली आहेत. कृषी

भूमि अभिलेख विभागाचा सुधारित आकृतीबंध मंजूर, नव्या ९९४ पदांची भर पडणार

मुंबई : जमिनीच्या कायदेशीर नोंदी वेगवान होऊन जनतेला दिलासा देण्यासाठी राज्याच्या भूमिअभिलेख विभागाचा

अवैध गौण खनिज उत्खनन करणाऱ्यांवर सरकारचा बडगा

३१ मार्चपर्यंत दंडवसुलीचे आदेश; सुनावणीनंतर १५ दिवसांच्या आत वसुलीची प्रक्रिया मुंबई : राज्यातील अवैध गौण खनिज

रस्ते बांधण्याचे काम ९० टक्के भूसंपादन झाल्यानंतरच सुरू होणार

मुंबई : भूसंपादन प्रक्रिया पूर्ण होऊन ९० टक्के जमीन प्रत्यक्ष ताब्यात आल्याशिवाय रस्त्याच्या कामाला सुरूवात