वर्षभरात मुंबई ‘बांगलादेशीमुक्त’ करणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : 'मुंबईत अवैधरीत्या वास्तव्य करणाऱ्या सर्व बांगलादेशी नागरिकांना शोधून काढून येत्या येत्या वर्षभरात मुंबई 'बांगलादेशीमुक्त' करू', अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी केली. महायुतीच्या जाहीरनाम्याच्या प्रकाशन कार्यक्रमात ते बोलत होते.


फडणवीस म्हणाले, 'मुंबईला बांगलादेशी आणि रोहिंग्यांपासून मुक्त करू. वर्षभरात बांगलादेशी शोधून काढू आणि त्यांना परत पाठवून देऊ. बांगलादेशी नागरिक मुख्यत्वे पश्चिम बंगालमधून येतात. तेथे कागदपत्रे तयार करून मुंबईत बेकायदेशीर वास्तव्य करतात. ते आपल्यासारखे दिसतात आणि भाषाही बोलतात, त्यामुळे त्यांना ओळखणे कठीण जाते. यासाठी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी च्या माध्यमातून एक विशेष टूल विकसित करण्यात येत आहे. हे टूल सहा महिन्यांत तयार होईल आणि त्याच्या मदतीने बांगलादेशींना शोधणे सोपे होईल. १०० टक्के बांगलादेशी शोधून त्यांना बांगलादेशला पाठवू,' असे आश्वासन फडणवीसांनी दिले.


या घोषणेबरोबरच पालिकेत पारदर्शकतेवरही भर देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले, 'बिल्डिंग प्लानमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करू. डेव्हलपमेंट कंट्रोल रेग्युलेशन्स डेव्हलपमेंट प्लॅन आणि जिओ स्पेशल डेटाचा वापर करून एआय मॉडेल तयार करण्यात येईल. हे मॉडेल बिल्डिंग प्लॅनमध्ये काय चुकीचे आहे किंवा काय बदल करावे लागेल, हे स्वतः सांगेल. यामुळे बांधकाम प्रक्रियेत होणाऱ्या अनियमितता रोखता येतील आणि शहराच्या विकासाला गती मिळेल', असा विश्वास त्यांनी


व्यक्त केला. कचरा व्यवस्थापनावरही फडणवीस यांनी विशेष भर दिला. ते म्हणाले, 'डंपिंग ग्राउंड बंद करण्याकडे आमची वाटचाल सुरू आहे. नवीन पद्धतीने झिरो गार्बेजचा प्लान राबविण्यात येत आहे. कचऱ्यापासून वीज निर्मितीचा प्रकल्प सुरू करण्यात येणार असून, त्यातून स्वच्छ वीज उत्पादन केले जाईल. याशिवाय गॅस निर्मितीही करण्यात येईल. वाहनांसाठी अक्षय ऊर्जा आणि ग्रीन ऊर्जेवर आधारित क्लायमेट अॅक्शन प्लान हाती घेण्यात आला आहे. मुंबईला एक शाश्वत शहराकडे घेऊन जाण्याचा हा प्रयोग आहे,' असे फडणवीस यांनी सांगितले. या योजना शहरातील पर्यावरणीय समस्या सोडवण्यास मदत करतील आणि मुंबईला जागतिक दर्जाचे हरित शहर बनवतील, असा दावा
त्यांनी केला.

Comments
Add Comment

Bike Rider Riddhi Thakkar: बाईक राइडिंगसाठी गेली, पण काळाने घात केला; मुंबईच्या 24 वर्षीय तरुणीचा भीषण अपघाती मृत्यू

मुंबई :  मुंबईतील (Mumbai) कांदिवली पश्चिम परिसरात राहणाऱ्या 24 वर्षीय रिद्धी ठक्करचा छत्तीसगडमधील धमतरी जिल्ह्यात

Weather Update : महाराष्ट्रातील विविध भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज

मुंबई : राज्यात श्रावणाचं आगमन धो धो पावसानं होणार आहे. महाराष्ट्रातील विविध भागांत गुरुवार १३ ते शनिवार १५ ऑगस्ट

Nitesh Rane : मच्छीमार बांधवांसाठी आधुनिक व सर्व सुविधांयुक्त वास्तू उभारणार – मंत्री नितेश राणे

· मरोळ मच्छी मार्केटच्या विकासकामांना गती देणार मुंबई, दि. 12: मुंबईतील मच्छीमार बांधवांसाठी महत्त्वपूर्ण

Water Metro : महाराष्ट्र सागरी मंडळाच्या अर्थसंकल्पाला मंजुरी; वॉटर मेट्रोसह विविध प्रकल्पांना मिळणार गती

मुंबई : महाराष्ट्राच्या सागरी क्षेत्रातील पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र सागरी मंडळाने अनेक

Chandrashekhar Bawankule : राज्यात 60 ‘आदर्श दुय्यम निबंधक’ कार्यालये उभारणार; पुण्यातील कोथरूडमध्ये पहिले कार्यालय

मुंबई : राज्यातील दुय्यम निबंधक कार्यालयांचे आधुनिकीकरण करण्यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. नोंदणी

Jalgaon Crime : कंटाळा आला आहे, आता मी निघतो...; सुसाईड नोट लिहून तरुणाची आत्महत्या

Jalgaon Crime : राजस्थानमध्ये पाठविलेल्या मालाचे ७ लाख रुपये मिळत नसल्याने एका तरुण उद्योजकाने आपली जीवनयात्रा संपवली