महाराष्ट्र झेडपी निवडणूक..!

नवी दिल्ली :  महाराष्ट्रातील जिल्हा परिषद (ZP) आणि पंचायत समिती निवडणुकांबाबत दाखल याचिकांवर आज (१२ जानेवारी २०२६) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. राज्य निवडणूक आयोगाने (SEC) सध्याची ३१ जानेवारी २०२६ ही अंतिम मुदत वाढवून १० फेब्रुवारी २०२६ करण्याची मागणी केली आहे.


आरक्षणाच्या अंमलबजावणीतील अडचणी, ईव्हीएमची कमतरता तसेच सर्व जिल्ह्यांतील निवडणुका एकाचवेळी घेण्यासाठी आवश्यक प्रशासकीय तयारी या कारणांचा हवाला देत ही मुदतवाढ मागण्यात आली आहे.


दरम्यान, आणखी एका याचिकेत सर्व जिल्हा परिषद निवडणुका एकाचवेळी घेण्याची मागणी करण्यात आली आहे. ही मागणी मान्य झाल्यास दहावी-बारावीच्या बोर्ड परीक्षा व त्याची तयारी लक्षात घेता निवडणुका एप्रिल किंवा मे महिन्यापर्यंत पुढे ढकलल्या जाण्याची शक्यता आहे.


आजच्या सुनावणीत सरन्यायाधीशांनी याचिकांवर नोटीस बजावली असून कोणतीही मुदतवाढ सध्या मंजूर केलेली नाही. संबंधित पक्षकारांना उत्तर दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले असून पुढील सुनावणी लवकरच होणार आहे. सध्या निवडणुका पुढे ढकलण्याबाबत कोणताही तातडीचा निर्णय घेण्यात आलेला नाही.

Comments
Add Comment

Gudi Padwa 2026 : गुढीपाडवा, उगादीसह विविध नववर्ष सणानिमित्त पंतप्रधान मोदींनी दिल्या शुभेच्छा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील नागरिकांना गुढीपाडवा, उगादी, चेतीचंद, नवरेह आणि सजिबू

२० हजार लोकांना रोजगार देणारा फॉर्म्युला गृहमंत्री अमित शाहांनी सांगितला; पाच कोटी रुपयांची गुंतवणूक करून ४२ दिवसांत ३५ कोटी रुपये कमावले

नवी दिल्ली: पाच कोटींची गुंतवणूक, ३५ कोटींची कमाई! आणि याला फार काळ लोटलेला नाही. इतकेच नाही, तर २०,००० हून अधिक

दिल्ली आणि इंदूरमधील आगीच्या दुर्घटनांबद्दल पंतप्रधान मोदींकडून शोक व्यक्त

नवी दिल्ली : दिल्लीतील पालम आणि मध्य प्रदेशातील इंदूर येथे वेगवेगळ्या आगीच्या दुर्घटनांबद्दल पंतप्रधान

गुजरातच्या मुंद्रा बंदरात ८०,८८६  मेट्रिक टन कच्चे तेल घेऊन 'जग लाडकी' जहाज दाखल

गांधीनगर : पश्चिम आशियातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, भारतीय ध्वज असलेले कच्चे तेल वाहून नेणारे जहाज 'जग लाडकी'

धक्कादायक घटना, EV ने घेतला सात जणांचा बळी

इंदूर : मध्य प्रदेशमध्ये इंदूरच्या बंगाली स्क्वेअरजवळील बृजेश्वरी कॉलनीत एक धक्कादायक घटना घडली. मनोज पुगालिया

दिल्लीत चार मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : दक्षिण-पश्चिम दिल्लीतील साध नगर, पालम परिसरात बुधवारी चार मजली इमारतीला आग लागल्याची घटना घडली. या