निवृत्ती नियोजनामध्ये सुरक्षितता व वाढीचे संतुलन राखले पाहिजे : शीतल देशपांडे

मुंबई (प्रतिनिधी) : निवृत्तीचे नियोजन हा जीवनातील आर्थिक सुरक्षिततेचा सर्वात महत्त्वपूर्ण पैलू आहे. या नियोजनामुळे निवृत्तीनंतरच्या जीवनामध्ये आर्थिक सुरक्षितता, स्थिरता आणि समाधानाची खात्री मिळते. कामामधून निवृत्त झाल्यानंतर तुमचे नियमित उत्पन्न बंद होते, पण खर्च सुरू राहतात, ज्यामध्ये वैद्यकीय गरजांमुळे अधिक भर होते. योग्य नियोजन केले नाही तर जीवनशैली टिकवून ठेवण्यासाठी, जीवनावश्यक खर्चाची पूर्तता करण्यासाठी संघर्ष करावा लागू शकतो. निवृत्तीचे नियोजन काळासह या गरजांची पूर्तता करण्यासाठी आवश्यक असलेला पुरेसा निधी जमा होण्यास मदत करते, ज्यासह तुम्ही निवृत्तीनंतरचे जीवन कोणत्याही अर्थिक अडचणीशिवाय आरामात व स्वावलंबीपणे जगू शकाल. निवृत्तीसाठी गुंतवणूक करताना गुंतवणूक किमान आर्थिक विकास आणि महागाई यानुसार वाढली पाहिजे. किमान परताव्याचे लक्ष्य ठरवताना आर्थिक विकास दर आणि 'महागाई दर यांचा विचार केला पाहिजे. तुमची गुंतवणूक महागाईपेक्षा संथगतीने वाढत असेल तर जीवनाश्यक गरजांची पूर्तता करण्यामध्ये आणि निवृत्तीची उद्दिष्टे गाठण्यामध्ये अडथळे येऊ शकतात.

Comments
Add Comment

अर्थनिरक्षरांची निरर्थक आवई!

सीए आनंद देवधर उद्धव ठाकरे हे अर्थनिरक्षर आहेत. त्यामुळे, महानगरपालिका वाचवायची असेल तर केंद्र, राज्य आणि मुंबई

सन २०२६ मधील प्रश्न

उदय पिंगळे, mgpshikshan@gmail.com सन २०२६ मध्ये नुकताच आपण प्रवेश केला, या नवीन वर्षाच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा! झेरोदाच्या

‘टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस’ काय करते?

डॉ. सर्वेश सुहास सोमण, samrajyainvestments@gmail.com आजपासून आपण आपल्या लेखमालेतून निफ्टीमधील दिग्गज कंपन्यांची सखोल माहिती घेणार

आकडे अर्थसंकल्पाचे आणि राजकोषीय तुटीचे

महेश देशपांडे एव्हाना देशाला अर्थसंकल्पाचे वेध लागले आहेत. त्याबाबतची तयारी शासकीय पातळीवर जोरात सुरु आहे. ही

चांदी नव्या उच्चांकावर २६०००० पार का वाढतीये चांदी 'या' कारणामुळे!

मोहित सोमण: जागतिक अस्थिरतेत चांदीने आज धुमाकूळ घातला आहे. एका सत्रात चांदी थेट ११००० रुपये प्रति तोळा दराने

'प्रहार' शनिवार Exclusive Market Outlook: बाजारात 'कंसोलिडेशनची' फेज सोमवार मंगळवारी सुरूच राहणार! प्रहारशी बोलताना तज्ञांची 'इनसाईड' स्टोरी

मोहित सोमण: एकूणच शेअर बाजार या आठवड्यातील अतिशम अस्थिर होते. काल सलग नवव्या सत्रात घसरल्याने मोठ्या प्रमाणात