‘अदानी नको, पण ममदानी–मुलतानी चालतात?’ ठाकरे बंधूंवर नितेश राणेंचा घणाघात

मुंबई : राज आणि उद्धव ठाकरे यांच्या कालच्या भाषणानंतर राज्यातील राजकीय वातावरण अधिक तापले असून, भाजप आमदार नितेश राणे यांनी ठाकरे बंधूंवर जोरदार टीका केली आहे. उद्योगपती अदानींवर सातत्याने टीका करणाऱ्या ठाकरे गटाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत नितेश राणेंनी सोशल मीडियावर एक ट्विट केले असून, ते सध्या राजकीय वर्तुळात महत्वाचा विषय ठरला आहे.


नितेश राणे यांनी आपल्या ट्विटमध्ये ठाकरे बंधूंच्या धोरणांवर बोट ठेवत, “अदानी चालत नाही, पण ममदानी आणि मुलतानी चालतात?” असा सवाल उपस्थित केला आहे. या एका ओळीमुळे ठाकरे गटाची उद्योग, गुंतवणूक आणि विकासाबाबतची भूमिका पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.



कालच्या भाषणावरून थेट पलटवार


राज आणि उद्धव ठाकरे यांनी कालच्या सभेत उद्योगसमूह, मुंबईतील प्रकल्प आणि भांडवलदारांवर टीकेची धार लावली होती. याच भाषणाचा संदर्भ घेत नितेश राणेंनी ठाकरे गटावर दुहेरी निकष लावण्याचा आरोप केला आहे. विकासाच्या नावाखाली काही उद्योगपतींना विरोध आणि काहींना मूकसंमती, अशी भूमिका ठाकरे गट घेत असल्याचा दावा त्यांनी केला.





‘विकासाला विरोध म्हणजे मुंबईचं नुकसान’


“मुंबईचा विकास रोखून धरायचा आणि मग भावनिक मुद्द्यांवर मतं मागायची,” अशी ठाकरे गटाची भूमिका आहे. नितेश राणे यांच्या मते, मुंबई आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी मोठ्या गुंतवणुकीची गरज असताना केवळ राजकीय भूमिकेपोटी उद्योगांना विरोध करणे हे राज्याच्या हिताचे नाही. “जेव्हा राज्यात गुंतवणूक येते, रोजगारनिर्मिती होते, तेव्हा त्याला विरोध का?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.



सोशल मीडियावर प्रतिक्रिया, ठाकरे गट अडचणीत


नितेश राणेंचं हे ट्विट व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. भाजप समर्थकांकडून या ट्विटचं समर्थन केलं जात असून, ठाकरे गटाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. तर ठाकरे गटाकडे या प्रश्नाचे उत्तरच नसल्याने ते मुकगिळून बसावे लागत आहे.


दरम्यान, नितेश राणेंच्या या ट्विटनंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं असून, BMC निवडणुकीच्या तोंडावर आरोप–प्रत्यारोपांची धार अधिक तीव्र होण्याची चिन्हं दिसत आहेत.

Comments
Add Comment

Bhandup : आशियातील सर्वात मोठा जलशुद्धीकरण प्रकल्प साकारतोय भांडुप संकुलात

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : भांडुप संकुलातील ७.४ हेक्‍टर जागेवरील नवीन जलशुद्धीकरण प्रकल्प आशियातील सर्वात मोठ्या

Bhandup Sewage Treatment Plant : भांडुपचा मल जल शुध्दीकरण प्रकल्प ऑक्टोबर २०२६मध्ये होणार कार्यान्वित

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : भांडुप येथील मल जल शुध्दीकरण प्रकल्पाचे काम आता पूर्ण होवून येत्या ऑक्टोबर २०२६ पर्यंत

Kanjurmarg Dumping Ground : कांजूरमार्ग डम्पिंग ग्राऊंडवर साडेतीन हजार झाडांची लागवड

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : घनकचरा व्यवस्थापन पायाभूत सुविधांचे हरित आणि शाश्वत परिसंस्थेमध्ये रूपांतर

Ind vs Afg : भारताने अफगाणिस्तान विरूद्धची वन डे सीरिज २-० अशी जिंकली, दुसऱ्या मॅचमध्ये मोठ्या फरकाने बाजी मारली

लखनऊ : भारताने अफगाणिस्तान विरूद्धची वन डे सीरिज २-० अशी जिंकली. पहिली वन डे सात विकेट्स राखून आणि दुसरी वन डे १७०

Cricket : टीम इंडिया 'ए' ची फायनलमध्ये धडक; अफगाणिस्तानचा १०१ धावांनी धुव्वा

दांबुला : प्रियांश आर्या, तिलक वर्मा आणि कुमार कुशाग्र यांच्या शानदार अर्धशतकांच्या जोरावर आणि निशांत सिंधूच्या

Vidhan Parishad : राज्याच्या विधानपरिषदेतील ११ जागांसाठी गुरुवारी मतदान

मुंबई : महाराष्ट्र विधान परिषदेच्या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातील उर्वरित अकरा जागांसाठी गुरुवारी मतदान