टी-२० विश्वचषकातून वगळल्यानंतर अखेर शुभमनचे मौन सुटले

बडोदरा : भारतीय कसोटी आणि एकदिवसीय संघाचा कर्णधार शुभमन गिलने २०२६ च्या टी-२० विश्वचषक संघातून वगळल्याबद्दल अखेर आपले मौन सोडले आहे. या निर्णयावर त्याने एक तात्त्विक भूमिका घेतली असून, निवड समितीच्या निर्णयाचा आदर करत असल्याचे म्हटले आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्याच्या पूर्वसंध्येला वडोदरा येथे पत्रकारांशी बोलताना गिल म्हणाला, "मी जिथे असायला हवं, बरोबर तिथेच आहे."


भारताचा वनडे कर्णधार शुभमन गिल एकेकाळी टी-२० संघाचा उपकर्णधार होता. सूर्यकुमार यादवनंतर आता गिल टी-२० संघासह तीनही फॉरमॅटचा कर्णधार होणार अशी चर्चा सुरू होती. मात्र भारतात अवघ्या काही महिन्यात सुरू होणाऱ्या टी-२० वर्ल्डकपचा भारतीय संघ जाहीर झाला आणि शुभमन गिलसह सर्वांनाच धक्का बसला. १५ सदस्यांच्या संघात उपकर्णधार शुभमन गिललाच डच्चू देण्यात आला होता. उपकर्णधारपदावरून गिलला थेट संघाबाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. त्यामुळे निवडसमिती अध्यक्ष अजित आगरकर आणि गौतम गंभीर यांच्या टीम सिलेक्शनवर अनेक प्रश्नचिन्ह देखील उपस्थित झाले. संघ जाहीर झाला त्यावेळी गिल काही बोलला नव्हता. मात्र आता वन-डे मालिकेपूर्वी कर्णधार म्हणून प्रेस पत्रकारांशी बोलताना त्याला याबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी त्याने टी-२० संघातून वगळ्याबद्दल त्याची काय भावना आहे याबाबत वक्त झाला. शुभमन गिलने निवडसमिती बाबत देखील आपले मत मांडले. त्यानं कोणतेही वादग्रस्त वक्तव्य न करत निवडसमितीचा निर्णय मान्य केला. तो म्हणाला, मी निवडसमितीच्या निर्णयाचा पूर्णपणे आदर करतो. मी टी-२० संघाला शुभेच्छा देतो. मला आशा आहे के वर्ल्डकप जिंकतील.' त्याचप्रमाणे गिलचे लक्ष आता फक्त संघावर आहे.

Comments
Add Comment

फिटनेस स्टार मयांक पवार याचे ३७ व्या वर्षी आकस्मिक निधन

मुंबई : रिअ‍ॅलिटी शोच्या दुनियेतून प्रसिद्धी मिळवलेले आणि फिटनेस क्षेत्रात स्वतंत्र ओळख निर्माण करणारे

ICC Women's T20 World Cup : आयसीसी महिला टी२० विश्वचषकाचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर; जाणून घ्या भारताचा सामना कधी ?

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) आयसीसी महिला टी२० विश्वचषक २०२६ चे संपूर्ण वेळापत्रक जाहीर केले. ही

विंडीजचा झिम्बाब्वे विरुद्ध मोठा विजय

मुंबई : आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकप स्पर्धेतील सुपर ८ फेरीत वेस्ट इंडिज विरुद्ध झिम्बाब्वे हा सामना

‘जर-तर’च्या समीकरणावर ठरणार भारताचा सेमीफायनलचा प्रवेश!

धावगती उंचावण्यासाठी दोन्ही सामने फरकाने जिंकावे लागणार नवी दिल्ली : टी-२० वर्ल्ड कपमध्ये सर्वात मजबूत संघ

हेटमायर आणि पॉवेलमुळे वेस्ट इंडिजने ओलांडला २५० धावांचा टप्पा

मुंबई : आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकप स्पर्धेतील सुपर ८ फेरीत वेस्ट इंडिज विरुद्ध झिम्बाब्वे हा सामना

T20 World Cup 2026 Ind vs SA : आपण पॉवरप्लेमध्येच सामना गमावला - सूर्यकुमार यादव

आयसीसी टी-२० विश्वचषक २०२६ चा ४३ वा सामना अहमदाबाद येथे भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळला गेला. हा सामना