हल्दियात भारतीय नौदल नवा तळ उभारणार

बंगालच्या उपसागरात नौदलाची पकड वाढणार


कोलकात्ता : पश्चिम बंगालमधील हल्दिया येथे भारतीय नौदल नवीन नौदल तळ (नेव्ही बेस) उभारणार असल्याची माहिती संरक्षण सूत्रांच्या अहवाल्याने दिली आहे. चीनच्या वाढत्या नौदल हालचाली तसेच बांगलादेश–पाकिस्तानशी संबंधित बदलत्या प्रादेशिक सुरक्षा परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर हे महत्त्वाचे पाऊल उचलले जात आहे. यामुळे उत्तर बंगालच्या उपसागरात भारताची सागरी उपस्थिती अधिक मजबूत होणार आहे.


हा तळ पूर्ण स्वरूपाचा नौदल कमांड नसून तो नेव्हल डिटॅचमेंट म्हणून कार्य करणार आहे. येथून लहान युद्धनौका आणि हायस्पीड बोटी तैनात केल्या जाणार आहेत. ज्यामुळे सागरी पाळत, गस्त आणि तत्काळ कारवाईची क्षमता वाढणार आहे. नौदल सध्या असलेल्या हल्दिया डॉक कॉम्प्लेक्सचा वापर करणार असल्याने कमी अतिरिक्त पायाभूत सुविधांमध्ये हा तळ लवकर कार्यान्वित करता येणार आहे. सुरुवातीला स्वतंत्र जेट्टी उभारली जाईल आणि आवश्यक सहायक सुविधा विकसित केल्या जातील.


या तळावर सुमारे १०० अधिकारी आणि खलाशी तैनात असतील. हल्दिया हे कोलकातापासून सुमारे १०० किलोमीटर अंतरावर असून येथे थेट बंगालच्या उपसागरात प्रवेश मिळतो. त्यामुळे हुगळी नदीमार्गे होणारा वेळेचा अपव्यय टळणार असून नौदलाची प्रतिसाद क्षमता अधिक वेगवान होईल.


हल्दिया तळावर फास्ट इंटरसेप्टर क्राफ्ट आणि ३०० टन वजनाची न्यू वॉटर जेट फास्ट अटॅक क्राफ्ट तैनात केली जाणार आहे. या बोटी ४० ते ४५ नॉट्स म्हणजेच सुमारे ८० किमी प्रतितास वेगाने धावू शकतात. या बोटींमधून १० ते १२ जवान वाहून नेले जाऊ शकतात. त्यांचा उपयोग किनारी गस्त, घुसखोरी रोखणे, बंदर सुरक्षेसह विशेष मोहिमांसाठी केला जाणार आहे.


या नौकांवर CRN-९१ तोफा बसवण्यात येणार असून भविष्यात नागास्त्रसारख्या लोइटरिंग म्युनिशन सिस्टीम बसवण्याची शक्यता आहे. यामुळे अचूक हल्ला क्षमता आणि पाळत ठेवण्याची ताकद अधिक वाढणार आहे.


हे पाऊल नौदलाच्या व्यापक आधुनिकीकरण आणि विस्तार कार्यक्रमाचा भाग आहे. २०२४ मध्ये संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या डिफेन्स ॲक्विझिशन कौन्सिलच्या बैठकीत १२० फास्ट इंटरसेप्टर क्राफ्ट आणि ३१ NWJFAC खरेदीला मंजुरी देण्यात आली होती. हल्दियातील हा नवा तळ भारताच्या सागरी सुरक्षेला नवे बळ देणारा ठरणार आहे.

Comments
Add Comment

ज्या संस्कृती इतरांना नष्ट करू पाहतात, त्या स्वतःच नष्ट होतात!

सोमनाथ स्वाभिमान पर्वात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संदेश सोमनाथ : ज्या संस्कृती इतरांना नष्ट करू पाहतात, त्या

स्वामी विवेकानंद यांची जयंती ; १० मुद्दे जे तुमचे भाषण गाजवतील

आज आपण 'युगपुरुष' स्वामी विवेकानंद यांची १६३ वी जयंती साजरी करणार आहोत. हा दिवस संपूर्ण भारतात 'राष्ट्रीय युवा

महाराष्ट्रातल्या जिल्हा परिषदांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर पडणार ?

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुका लांबणीवर पडण्याची शक्यता

कॅनडाचा इमिग्रेशन यूटर्न

नव्या नियमांचा भारतीय विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांसाठी अडथळा नवी दिल्ली : कॅनडाने २०२६ साठी विद्यार्थी आणि

‘अल्मोंट-कीड’ बालसिरपमध्ये ‘इथिलीन ग्लायकॉल’

औषधांच्या सुरक्षिततेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह नवी दिल्ली : मुलांना दिल्या जाणाऱ्या औषधांच्या सुरक्षिततेवर

Indore Truck Accident : मुंबई-आग्रा हायवेवर गाड्यांचा चेंदामेंदा! तीव्र उतारावर ट्रकचे नियंत्रण सुटले अन् सात गाड्या एकमेकांवर...

महू : मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील मानपूर भेरू घाटात शनिवारी सकाळी सात वाहनांचा साखळी अपघात झाल्याची