Devendra Fadnavis: “दोन भाऊ येऊन गेले, पण त्यांना श्रीरामाची आठवणही झाली नाही”

नाशिक : निवडणुकीच्या रणधुमाळीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नाशिकच्या सभेतून उद्धव आणि राज यांच्यावर जोरदार टीका केली. “मी श्रीराम प्रभूंना वंदन करतोय. मात्र काल-परवा दोन भाऊ नाशिकमध्ये येऊन गेले, पण त्यांना रामाची आठवणच झाली नाही. नाशिकमध्ये येऊन ज्यांनी राम मांडला नाही, त्यांच्या मनात आता राम उरलेला नाही. जो रामाचा नाही, तो कोणत्याही कामाचा नाही,” अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे बंधूंवर अप्रत्यक्षपणे जोरदार टीका केली. ते नाशिकमधील प्रचारसभेत बोलत होते.

“अलीकडच्या काळात काही लोक देव आहेत की नाहीत, असा प्रश्न उपस्थित करत आहेत. काही जण देवाची खिल्ली उडवत आहेत. त्यांच्याबद्दल मी फार काही बोलणार नाही. मात्र नाशिकचा खरा विकास झाला असेल आणि पुढे होणार असेल, तर तो करण्याची क्षमता केवळ भारतीय जनता पक्षात आहे,” असे फडणवीस म्हणाले. नाशिक ‘दत्तक’ घेतल्याच्या वक्तव्यावरून होत असलेल्या टीकेलाही मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिले. “माझी खिल्ली उडवली गेली की नाशिक दत्तक घेतलं, त्याचं काय झालं? मी 2017 आणि 2019 मध्ये विरोधी पक्षनेता होतो. फक्त दोन वर्ष माझ्याकडे होती, तरी मी कधी तक्रार केली नाही. आम्ही तक्रार करणारे लोक नाही,” असे ते म्हणाले.

कोविड काळाचा उल्लेख करत फडणवीस यांनी विरोधकांवर निशाणा साधला. “कोविडच्या काळात उबाठा, मनसे, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते घरी बसले होते. त्या काळात देवाभाऊ नाशिकमध्ये होते. कोविड केअर सेंटरपासून आयसीयूपर्यंत ते फिरत होते. पण निवडणुका आल्या की नाशिकला येणारे आणि संपल्या की विसरणारे हे निवडणूक पर्यटक आहेत,” असा आरोप त्यांनी केला.
Comments
Add Comment

देवेंद्र फडणवीसांच्या एका कॉलनं बदलला निर्णय, प्राजक्त तनपुरेंनी राहुरी पोटनिवडणुकीतून घेतली माघार

राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवार अर्ज भरण्याची मुदत सोमवारी संपुष्टात आली आहे. या निवडणुकीत दिवंगत

Nagpur Crime : नागपूर हादरलं! पैशांसाठी १४ वर्षीय मित्राची निघृण हत्या

नागपूर : नागपूर शहरात अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. शहराला हादरवून सोडणाऱ्या १४ वर्षीय मुलाच्या अपहरण आणि

Gautami patil : गौतमी पाटीलच्या 'या' नवीन गाण्यानं घातला धूमाकूळ

मुंबई : आपल्या मनमोहक अदांनी प्रेक्षकांची मनं जिंकणारी महाराष्ट्राची लाडकी नृत्यागंणा गौतमी पाटील ( Gautami Patil ) चा

Gautami Patil : भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणावर गौतमी पाटीलनं दिली प्रतिक्रिया, म्हणाली...

नाशिक : नाशिक येथील भोंदू बाबा अशोक खरातचे दिवसेंदिवस अनेक काळे कारनामे समोर येत असून महिला लैंगिक शोषण, आर्थिक

Bigg Boss Marathi 6 : पहिला फायनलिस्ट कोण ठरणार ? तिकीट टू फिनालेची उत्सुकता वाढली

मुंबई : बिग बॉस मराठी ६ सीझन आता शेवटच्या टप्प्यात पोहचलं असून ११ जानेवारी २०२५ रोजी सुरु झालेल्या बिग बॉस मराठी

Ramayana Movie : रामायणमध्ये भूमिका साकारणार बिग बींचा जावई, 'या' महत्वाच्या भूमिकेत झळकणार

मुंबई : रामायण ( Ramayana ) सिनेमाची सध्या जोरदार चर्चा सुरु असून रामायणमधील रणबीर कपूर ( Ranbir Kapoor) चा पहिला लूक पाहिल्यानंतर