मुंबईत उबाठाकडून ९ मुस्लीम चेहरे मैदानात

भाजपकडून एकही मुस्लीम उमेदवार नाही


मुंबई :  मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी उमेदवारांचा प्रचार आता टिपेला पोहोचला असून मराठी आणि हिंदुत्व यावरून प्रचाराचे लोळ उडताना पहायला मिळत आहे. मात्र, हिंदुत्वाचा नारा देणाऱ्या भाजपकडून एकही मुस्लीम उमेदवाराला उमेदवारी देण्यात आलेली नाही. याउलट मुंबई महापालिका निवडणुकीत उबाठाकडून ९ मुस्लीम चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. एरव्ही समाजवादी पक्ष आणि एमआयएम यासह काँग्रेसकडून मुस्लीम उमेदवाराला संधी देण्यात येत असली तरी भाजपने यंदाही एकाही उमेदवाराला संधी देत आपली हिंदुत्वाची भूमिका कायम ठेवली आहे.


मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत प्रत्येक पक्षाने आपल्या पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना संधी देत त्यांना उमेदवारी देण्याचा प्रयत्न केला. मात्र, भाजपकडून हिंदुत्वाचा पुरस्कार केला जात असल्याने भाजपाकडून मुस्लिमांना किती संधी दिली जाते याकडे सर्वांचे लक्ष होते. मात्र, भाजपने यंदा एकाही मुस्लीम उमेदवाराला संधी दिलेली नाही. या उलट उबाठा आणि शिवसेनेने प्रत्येकी ०९ मुस्लीम उमेदवाराला संधी दिली आहे. तर काँग्रेस पक्षाच्यावतीने ३३ मुस्लीम उमेदवारांना संधी देण्यात आली आहे.


समाजवादी पक्ष आणि एमआयएम हे पक्ष मुस्लिमांचे असल्याने या पक्षाकडून मुस्लीम उमेदवारांना सर्वाधिक उमेदवारी दिली जाते. त्यामुळे या पक्षाकडून दिल्या जाणाऱ्या उमेदवारीची चर्चा नसली तरी त्याखालोखाल काँग्रेस पक्षाकडून मुस्लिमांना उमेदवारी दिली जाते.


कोणत्या पक्षात मुस्लीम उमेदवार किती?




  • भाजप : ००

  • काँग्रेस : ३३

  • राष्ट्रवादी काँग्रेस : ११

  • शिवसेना : ०९

  • उबाठा ०९

  • वंचित : ००

  • मनसे : ०२

  • राष्ट्रवादी काँग्रेस शप ०२

Comments
Add Comment

मुंबईतील प्रत्येक रेल्वे स्थानकात आता 'आरोग्य कवच'

मुंबई : उपनगरीय रेल्वे मार्गांवरील वाढते अपघात आणि प्रवाशांचा जीवघेणा प्रवास रोखण्यासाठी राज्य सरकारने विशेष

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शुक्रवार ६ मार्च रोजी मांडणार राज्याचा अर्थसंकल्प

मुंबई : महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून, शुक्रवारी ६ मार्च रोजी मुख्यमंत्री देवेंद्र

लक्षवेधींची संख्या कमी केल्याने सत्ताधारी आणि विरोधी आमदारांकडून नाराजी

गटनेत्यांची बैठक घेणार; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे आश्वासन मुंबई : राज्य विधिमंडळाच्या

भारतीय जनता युवा मोर्चा, मुंबईच्या अध्यक्षपदी दीपक सिंह यांची नियुक्ती

मुंबई : भारतीय जनता युवा मोर्चा, मुंबईचे महामंत्री दीपक आजाद सिंह यांची आज पक्षाचे मुंबई अध्यक्ष आमदार अमित साटम

'जलवाहतूक क्षेत्रात जागतिक दर्जाच्या सुविधा निर्माण करणार'

मुंबई : रायगड जिल्ह्यातील दिघी बंदराचा कायापालट करून तेथे जागतिक दर्जाच्या सुविधा निर्माण करण्यावर राज्य

सिंधुदुर्गच्या विकासासाठी पर्यावरणाचा समतोल आणि जनहिताला प्राधान्य

मुंबई : केंद्र शासनाच्या २४ फेब्रुवारी २०२६ रोजीच्या अधिसूचनेच्या अनुषंगाने सिंधुदुर्ग च्या विविध