मुंबईत उबाठाकडून ९ मुस्लीम चेहरे मैदानात

भाजपकडून एकही मुस्लीम उमेदवार नाही


मुंबई :  मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी उमेदवारांचा प्रचार आता टिपेला पोहोचला असून मराठी आणि हिंदुत्व यावरून प्रचाराचे लोळ उडताना पहायला मिळत आहे. मात्र, हिंदुत्वाचा नारा देणाऱ्या भाजपकडून एकही मुस्लीम उमेदवाराला उमेदवारी देण्यात आलेली नाही. याउलट मुंबई महापालिका निवडणुकीत उबाठाकडून ९ मुस्लीम चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. एरव्ही समाजवादी पक्ष आणि एमआयएम यासह काँग्रेसकडून मुस्लीम उमेदवाराला संधी देण्यात येत असली तरी भाजपने यंदाही एकाही उमेदवाराला संधी देत आपली हिंदुत्वाची भूमिका कायम ठेवली आहे.


मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत प्रत्येक पक्षाने आपल्या पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना संधी देत त्यांना उमेदवारी देण्याचा प्रयत्न केला. मात्र, भाजपकडून हिंदुत्वाचा पुरस्कार केला जात असल्याने भाजपाकडून मुस्लिमांना किती संधी दिली जाते याकडे सर्वांचे लक्ष होते. मात्र, भाजपने यंदा एकाही मुस्लीम उमेदवाराला संधी दिलेली नाही. या उलट उबाठा आणि शिवसेनेने प्रत्येकी ०९ मुस्लीम उमेदवाराला संधी दिली आहे. तर काँग्रेस पक्षाच्यावतीने ३३ मुस्लीम उमेदवारांना संधी देण्यात आली आहे.


समाजवादी पक्ष आणि एमआयएम हे पक्ष मुस्लिमांचे असल्याने या पक्षाकडून मुस्लीम उमेदवारांना सर्वाधिक उमेदवारी दिली जाते. त्यामुळे या पक्षाकडून दिल्या जाणाऱ्या उमेदवारीची चर्चा नसली तरी त्याखालोखाल काँग्रेस पक्षाकडून मुस्लिमांना उमेदवारी दिली जाते.


कोणत्या पक्षात मुस्लीम उमेदवार किती?




  • भाजप : ००

  • काँग्रेस : ३३

  • राष्ट्रवादी काँग्रेस : ११

  • शिवसेना : ०९

  • उबाठा ०९

  • वंचित : ००

  • मनसे : ०२

  • राष्ट्रवादी काँग्रेस शप ०२

Comments
Add Comment

थकबाकीदारांच्या मालमत्तांची अटकावणी केल्यानंतर थेट लिलाव

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्यावतीने आकारण्यात येणाऱ्या मालमत्ता कराची भरणा नियोजित वेळेत न

मुंबईतील मालमत्ता कर थकवणाऱ्या २० थकबाकीदारांची नावे जाहीर

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : निर्धारित कालावधीमध्ये कर भरणा करण्यास टाळाटाळ करणा-या तसेच आर्थिक क्षमता असूनही

राज्यात ७० हजार पदांची लवकरच नोकरभरती

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; नव्या पद्धतीने भरती होणार मुंबई : राज्यात लवकरच नोकर भरती प्रक्रिया नव्या

त्रिभाषा धोरण राबविण्यासंदर्भात नरेंद्र जाधव समितीकडून सरकारला अहवाल सादर

मुंबई : राज्यातील शाळांमध्ये त्रिभाषा धोरण राबविण्यासंदर्भात शिक्षणतज्ज्ञ डॉ. नरेंद्र जाधव यांच्या समितीनं आज

मोहोळमधील राखीव मतदान यंत्र प्रकरणी संबंधितांवर कठोर कारवाई

राखीव मतदान यंत्र प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेसाठी वापरली नाहीत मुंबई : मोहोळ तालुक्यात (जि. सोलापूर) जिल्हा परिषद

मुंबईच्या लोकलचा कायापालट होणार

मुंबई : गेल्या १०० वर्षात मुंबई आणि मुंबईकरांच्या लाडक्या लाईफलाइनमध्ये म्हणेजच लोकलमध्ये अनेक बदल झाले.