'ठाकरेंचा बालेकिल्ला ? याच भागातून आमचे उमेदवार तीन वेळा मोठ्या मताधिक्याने विजयी'



मुंबई : वरळी विधानसभा मतदारसंघातील राजकीय वातावरण आता तापू लागले आहे. भाजपचे आक्रमक नेते आणि मंत्री नितेश राणे यांनी वरळीत प्रचारसभेत बोलताना आदित्य ठाकरे आणि उबाठा गटावर तिखट शब्दांत टीका केली. "हा ठाकरेंचा बालेकिल्ला आहे असे म्हणण्याची आता गरज उरलेली नाही, कारण आम्हीही तीन-तीन वेळा मोठ्या मताधिक्याने निवडून येतो," असे म्हणत त्यांनी सुरुवातीलाच आव्हान दिले.

बीडीडी चाळ आणि विकासाचा मुद्दा


वरळीतील कळीचा मुद्दा असलेल्या बीडीडी चाळीच्या पुनर्विकासावरून राणेंनी आदित्य ठाकरेंना घेरले. "वडील मुख्यमंत्री होते आणि मुलगा मंत्री, तरीही बीडीडी चाळीत राहणाऱ्या मराठी माणसाला न्याय मिळाला नाही. हा प्रश्न सोडवण्यात ते सपशेल अपयशी ठरले आहेत," असा आरोप त्यांनी केला. तसेच, बीडीडी चाळीच्या विकासासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असे आश्वासनही त्यांनी दिले.

हिंदुत्व आणि 'हिरवे साप'


बाळासाहेब ठाकरेंच्या हिंदुत्वाचा संदर्भ देत नितेश राणे म्हणाले की, "बाळासाहेबांनी कधीच हिंदुत्वाशी तडजोड केली नाही, म्हणूनच मुंबईतील मराठी माणूस दंगलीत वाचला. मात्र, आज त्यांच्या पक्षात बॉम्बस्फोटाच्या आरोपींना आणि 'हिरव्या सापांना' प्रवेश दिला जात आहे. जर आज बाळासाहेब असते, तर त्यांनी अशा लोकांना ढुंगणावर लाथ मारून बाहेर काढले असते."

अमित आणि आदित्य यांच्यावर टीका


अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यातील वाढत्या जवळीकीवर भाष्य करताना राणे म्हणाले की, "आम्ही एकत्र आलो नाही तर हे दोन्ही भाऊ बेरोजगार होतील, या भीतीनेच ते एकत्र आले आहेत." तसेच, मुंबईतील मराठी माणसाचा टक्का घसरण्याला सध्याची सत्ताधारी यंत्रणा जबाबदार असल्याचे त्यांनी नमूद केले.

अस्तित्वाची लढाई आणि थेट आव्हान


"ही निवडणूक केवळ मतांची नसून आपल्या अस्तित्वाची आहे. जर यांची सत्ता आली तर मुंबईतील मंदिरे सुरक्षित राहणार नाहीत," अशी भीती त्यांनी व्यक्त केली. भाषणाच्या शेवटी त्यांनी महायुतीच्या उमेदवाराला निवडून आणण्याचे आवाहन केले. "आमचा उमेदवार निवडून आला तर विजयाचे फटाके वाजवायला मी स्वतः येणार आणि एक फटाक्याची माळ 'मातोश्री' (कलानगर) समोरही लावणार," असे थेट आव्हान त्यांनी दिले.

Comments
Add Comment

Municipal Corporation : पीओपींच्या गणेश मूर्तींबाबत महापालिकेने भूमिका स्प्ष्ट करावी2

स्थायी समितीत सदस्यांनी मागणी विसर्जित गणेश मूर्तींवर प्रक्रिया करण्याच्या प्रकल्प खर्चाला मान्यता मुंबई : 

Ritu Tawade : प्रत्येक मुंबईकरांने एक झाड लावावे

मुंबईच्या महापौरांनी केले आवाहन मुंबई : मुंबई हिरवीगार करण्यासाठी मुंबई महापालिकेने जोरदार मोहीम हाती घेतली

MLA Amit Satam: हत्तीच्या पिंजऱ्याच्या जागेवर बिबट्या, रेड पांडा, हुलॉक गिबन आणि बिंटुरोंग

आमदार अमीत साटम यांचे महापौर रितू तावडे, महापालिका आयुक्त अश्विनी भिडे, यांना पत्र* मुंबई : मुंबई भाजप अध्यक्ष

Police Character certificate : फेरीवाल्यांना क्यु आर कोड देताना पोलिस चारित्र्य प्रमाणपत्र तपासा

भाजपचे तिवाना यांची स्थायी समितीच्या बैठकीत हरकतीच्या मुद्दयादवारे मागणी मुंबई : मुंबई महानगरपालिकेमार्फत

Zakir Naik : 'त्या' महिलांना दाखवले झाकीर नाईकचे व्हिडीओ, TCS मधील धक्कादायक प्रकार

 मुंबई : नोकरीच्या ठिकाणी दबाव टाकून जबरदस्तीने इस्लाम धर्म स्वीकारण्यास भाग पाडण्यासाठी टीसीएसच्या नाशिक

Sunetra Pawar : बारामतीतील वादळग्रस्त भागातील जनजीवन तातडीने पूर्ववत करा...

मुळासकट उन्मळून पडलेल्या झाडांचे पुनर्रोपण करा  उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचे निर्देश मुंबई:-