मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा; प्रभाग क्रमांक १७ - अ मधून निलेश भोजने पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात

नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक १७-अ मधील राजकीय चित्र आता बदलताना दिसत आहे. भाजपचे उमेदवार निलेश भोजने यांचा उमेदवारी अर्ज बाद करण्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने अमान्य ठरवला असून, त्यांना निवडणूक लढवण्याची परवानगी दिली आहे. या निर्णयामुळे भाजपला मोठा दिलासा मिळाला आहे.


निवडणूक प्रक्रियेदरम्यान भोजने यांच्या मालमत्तेशी संबंधित कथित अनधिकृत बांधकामाचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. त्या आधारे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांचा अर्ज फेटाळला होता. या निर्णयाविरोधात भोजने यांनी न्यायालयात धाव घेतली होती.


प्रकरणाच्या सुनावणीत न्यायालयाने निर्णय प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. उमेदवारी नाकारताना कायदेशीर बाबींचा पुरेसा विचार करण्यात आलेला नसल्याचे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने संबंधित आदेशाला स्थगिती दिली. तसेच भोजने यांचे नाव उमेदवारांच्या अधिकृत यादीत समाविष्ट करण्याचे निर्देश देण्यात आले.


या निकालाचा थेट परिणाम प्रभाग १७-अ मधील राजकीय गणितांवर होणार आहे. भाजपची उमेदवारी धोक्यात आल्यानंतर पक्षाने पर्यायी उमेदवारांचा विचार सुरू केला होता. मात्र, आता थेट भाजप उमेदवार पुन्हा मैदानात आल्याने शिवसेना (शिंदे गट) विरुद्ध भाजप अशी थेट लढत रंगण्याची चिन्हे आहेत.


दरम्यान, न्यायालयीन स्थगिती हटवल्यानंतर निवडणूक प्रक्रियेला गती मिळाली असून ठरलेल्या तारखेनुसार येत्या १५ तारखेला मतदान होणार आहे. नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी दाखल झालेल्या ९५६ अर्जांपैकी ८३९ अर्ज वैध ठरले आहेत, तर ११७ अर्ज विविध कारणांमुळे रद्द झाले आहेत. विभागनिहाय पाहता घणसोली आणि नेरूळ भागात सर्वाधिक अर्ज बाद झाले असून वाशी विभागात ही संख्या अत्यल्प आहे.

Comments
Add Comment

Nashik : अशोक खरातच्या आजच्या सुनावणीत काय घडलं ? भोंदू खरातची रवानगी आता...

नाशिक : स्वतःला ‘दैवी शक्ती’ असलेला पुरुष भासवून कोणाचे आर्थिक शोषण तर अनेक महिलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या भोंदू

Raja Shivaji : राजा शिवाजी मधील अफझलखानाची भेट आणि जोरदार टीकास्त्र; रितेशने नेमकं दाखवलं आहे तरी काय ?

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचे दैवत, राजांच्या अनेक गोष्टी प्रत्येक मराठी माणूस हा लहानपणापासून

BMC सभागृहनेत्यांचा पुन्हा आवाजावरून त्रागा

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या सभागृहातील ध्वनी यंत्रणेतील दोष निवारण करण्यास अद्यापही

BMC स्थायी समिती अध्यक्ष करणार मुंबईतील रस्त्यांची पाहणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : पावसाळा जवळ आला असून अनेक ठिकाणी रस्त्यांची कामे तसेच इतर प्रकल्पांची कामे सुुरु

BMC च्या तक्रारींचे होणार जलद निवारण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईकर नागरिकांना नागरी सेवा-सुविधा पुरविताना नागरिकांचा सहभाग वाढवून त्यांच्या

केंद्र सरकारच्या iGOT–‘Sadhana Saptah 2026’ मध्ये महाराष्ट्र अव्वल

मुंबई : केंद्र सरकारच्या ‘मिशन कर्मयोगी’ अंतर्गत आयोजित ‘साधना सप्ताह २०२६ मध्ये राज्याने देशात प्रथम क्रमांक