ओडिशात विमान दुर्घटना; ९ प्रवाशांना घेऊन जाणारे विमान कोसळले

ओडिशा : ओडिशातील राउरकेला परिसरात एक गंभीर विमान दुर्घटना घडली असून, इंडिया वन कंपनीचे छोटे विमान उड्डाणानंतर काही क्षणांतच कोसळले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे विमान भुवनेश्वरहून राउरकेलाकडे जात होते. उड्डाण घेतल्यानंतर थोड्याच वेळात रघुनाथपाली परिसरात विमान जमिनीवर आदळले. या विमानात पायलटसह एकूण ९ जण प्रवास करत होते.



जखमींवर उपचार सुरू


प्राथमिक माहितीनुसार, या अपघातात सहा जण जखमी झाले असून त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी दोन ते तीन जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. उर्वरित तीन प्रवाशांबाबत अद्याप अधिकृत माहिती मिळालेली नाही.



अपघाताचं कारण अस्पष्ट


विमानात नेमका तांत्रिक बिघाड झाला होता की अन्य कोणतं कारण अपघातामागे आहे, याबाबत सध्या स्पष्टता नाही. ओडिशा पोलीस आणि संबंधित यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या असून, अपघाताच्या कारणांचा सखोल तपास सुरू आहे. तपासानंतर अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment

भारतासाठी आनंदाची बातमी ! चीन, पाकिस्तानची झोपच उडणार ; भारत आणि रशियामध्ये मोठा करार

Big deal between India and Russia : भारत आणि रशिया या दोन देशांतील मैत्रीपूर्ण संबंध संपूर्ण जगाला माहित आहे. जगाचा विरोध धुडकावत कधी

Heat Wave: पुढील तीन दिवस जरा जपूनच ! राज्यातील 'हे' शहर जगातील सर्वाधिक उष्ण शहरांच्या यादीत; नाशिकची स्थिती काय ?

Maharashtra Weather Update : राज्यभरात तपमानानं कहर केल्याचे चित्र आहे. अशातच प्रादेशिक हवामान विभागाने वर्तविलेल्या

West Bengal Election 2026 : विक्रमी मतदानामुळे ममता बॅनर्जींचे सरकार संपुष्टात येईल - अमित शाह

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान जिल्ह्यातील राणाघाट येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

Karnataka : पादचारी पूल कोसळला, आठ जखमी

मंगळुरू : कर्नाटकमध्ये दक्षिण कन्नड जिल्ह्यातील मूडबिद्री तालुक्यात एक अरुंद पादचारी पूल कोसळला. या

West Bengal : पश्चिम बंगालमध्ये ठिकठिकाणी ईडीच्या धाडी

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये दुसऱ्या टप्प्यातील मतदानापूर्वीच अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) राजधानी कोलकात्यात

Indian History : सापडले दोन हजार वर्षे जुने तीन किलो वजनाचे प्राचीन ताम्रपत्र

बिलासपूर : छत्तीसगडच्या बिलासपूर येथील मल्हार परिसरातील रहिवासी संजीव पांडेय यांच्या ताब्यातून सुमारे २०००