मुंबईतील १४४ माजी नगरसेवक निवडणूक रिंगणात

भाजपाने दिली सर्वाधिक माजी नगरसेवकांना संधी


मुंबई (सचिन धानजी) : मुंबई महापालिकेच्या निवडणूक रिंगणात तब्बल १७०० उमेदवार असून त्यात तब्बल १४४ माजी नगरसेवकांचा समावेश आहे. विशेष म्हणजे या माजी नगरसेवकांमध्ये भाजपाच्यावतीने सर्वाधिक म्हणजे ५८ माजी नगरसेवकांना संधी देण्यात आली आहे. त्याखालोखाल उबाठाने ३९ आणि शिवसेनेने ३७ माजी नगरसेवकांना संधी दिली आहे.


मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत तरुणांना यंदा संधी दिली जाईल अशाप्रकारची घोषणा सर्वच पक्षांच्यावतीने करण्यात आली होती. त्यातच काहींचे प्रभाग आरक्षित झाल्याने तसेच काहींचे वय झाल्याने बाजुला करत अनेक पक्षांनी काही माजी नगरसेवकांचे पत्ते कापले आणि नवीन चेहऱ्यांना संधी दिली. मात्र, महापालिकेचा नगरसेवक म्हणून निवडून येतानाच महापालिकेच्या संसदीय कामकाजाची माहिती असणाऱ्या जुन्या जाणत्या आणि माजी अनुभवी नगरसेवकांचीही सभागृहात गरज असते. त्यामुळे ५० टक्क्यांपेक्षा अधिक जागांवर माजी नगरसेवकांना संधी देवून उर्वरीत जागांवर नवीन आणि तरुण चेहऱ्यांना संधी देणे आवश्यक असते. परंतु यंदा बहुतांशी पक्षांनी नवीन आणि तरुण चेहऱ्यांना संधी दिली असून त्यात माजी नगरसेवकांचा समावेश केवळ २५ ते ३५ टक्के एवढाच असल्याचेच दिसून येत आहे


भाजपाला मागील महापालिका सार्वत्रिक निवडणुकीत भरघोस यश मिळत त्यांचे ८२नगरसेवक निवडून आले होते. पण मागील वेळेस निवडून आलेले आणि त्यापूर्वी निवडून आलेले अशाप्रकारे केवळ ५८ माजी नगरसेवकांना भाजपाने संधी दिली आहे. त्यामुळे बाकीच्यांना आरक्षण आणि इतर कारणांमुळे घरी बसवून पक्षाचे काम करायला भाग पाडले आहे. तर उबाठाने १६५ जागा लढवताना केवळ केवळ ३९ माजी नगरसेवकांना संधी दिली आहे. तर अनेकांचे पत्ते कापले. तर शिवसेनेकडे उबाठातून गेलेले सन २०१७मध्ये निवडून आलेले आणि त्यापूर्वी निवडून आलेल्या ३७ माजी नगरसेवकांना संधी देण्यात आली आहे.


माजी नगरसेवकांना अशाप्रकारे दिली संधी


भाजपा : ५८


शिवसेना : ३७


उबाठा : ३९


मनसे : ०१


राष्ट्रवादी काँग्रेस (शप) : ०१


राष्ट्रवादी काँग्रेस, अभासे, अपक्ष व इतर : ०८

Comments
Add Comment

Jayant Patil : जयंत पाटील यांनी घेतली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट

आमदार जितेंद्र आव्हाडही सोबत; 'नंदनवन'वर एक तास खलबते मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे

Ro-ko Unstoppable : रोहित आणि विराटने रचला इतिहास; गांगुली-द्रविडला मागं टाकतं ही कामगिरी करणारी ठरली तिसरी जोडी

Mumbai : भारत आणि इंग्लंड यांच्यात दुसरा एकदिवसीय सामना कार्डिफ येथे सुरु आहे. इंग्लंडनं टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी

India's energy storage : भारताची ऊर्जा साठवणूक क्षमता २०३५-३६ पर्यंत दहा पटींनी वाढणार

नवी दिल्ली : भारताच्या विकासाच्या प्रवासात ऊर्जा क्षेत्राचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. देशाची वाढती वीज गरज आणि

Indian Fishermen : शिक्षा पूर्ण होऊनही १७८ भारतीय मच्छीमार पाकिस्तानच्या तुरुंगात

कॉन्स्युलर कराराचे उल्लंघन; डहाणू-तलासरीतील १८ कुटुंबांचा न्यायासाठी आक्रोश डहाणू : भारत-पाकिस्तानदरम्यान

CUTS International : बाईक टॅक्सींसाठी देशव्यापी सुसंगत धोरणाची गरज, 'कट्स इंटरनॅशनल'चा अहवाल

नवी दिल्ली : देशातील बाईक टॅक्सी सेवांसाठी सध्या असलेल्या विसंगत राज्यनिहाय नियमांऐवजी, एक सुसंगत आणि

Jagannath Rath Yatra Stampede : जगन्नाथ रथयात्रेदरम्यान प्रचंड गर्दीमुळे चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती; एकाचा मृत्यू, अनेक जखमी

भुवनेशवर : ओडिसातील पुरी येथे गुरुवारी जगप्रसिद्ध जगन्नाथ रथयात्रेदरम्यान चेंगराचेंगरीसदृश परिस्थिती