मागच्या वर्षांच्या तुलनेत या वर्षींच्या विमानसेवेत झाले एवढी वाढ ?

मुंबई : विमा वाहतुकीबाबतच्या ताज्या अहवालानुसार मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर वर्षभरात म्हणजेच २०२५ मध्ये एकूण ३ लाख ३१ हजार ११ विमानांची वाहतूक झाली. यात ९२ हजार १४१ आंतरराष्ट्रीय आणि २ लाख ३८ हजार ८७० देशांतर्गत विमानं होती. या विमानांद्वारे वर्षभरात ५ कोटी ५५ लाख प्रवाशांची वाहतूक झाली. प्रवासी संख्येत २०२४ च्या तुलनेत १.३ टक्क्यांची तर विमान वाहतुकीत २०२२ च्या तुलनेत जवळपास २५ टक्क्यांची वाहतूक झाली आहे.


मुंबईतून प्रामुख्याने दिल्ली, बंगळुरू, कोलकाता, हैदराबाद, दुबई, अबुधाबी, लंडन हिथ्रो आणि सिंगापूर या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात विमान वाहतूक झाली. तसेच २०२५ मध्ये मुंबईतून अल्माटी, अम्मान, बाली (डेनपसार), कोपनहेगन, फुजैराह, क्राबी, मँचेस्टर, तिबिलिसी, आदमपूर, अमरावती, हिंडन, झारसुगुडा, पोरबंदर, सोलापूर या शहरांसाठी विमानसेवा सुरू झाली आहे.


मुंबईतून २०२५ मध्ये सर्वाधिक विमानं दिल्लीसाठी उडाली. नंतर बंगळुरू आणि गोव्यासाठी मुंबईतून मोठ्या संख्येने उड्डाणे झाली. मुंबई - दिल्ली या विमान मार्गावरुन १७ टक्के प्रवासी वाहतूक झाली. मुंबई - दुबई या आंतरराष्ट्रीय विमान मार्गावर १५ टक्के प्रवासी वाहतूक झाली. आंतरराष्ट्रीय प्रवासी वाहतुकीच्या बाबतीत मुंबई - दुबई या मार्गानंतर २८.२ टक्‍क्‍यांसह आशिया-पॅसिफिक आणि १४.५ टक्‍क्‍यांसह युरोपचा क्रमांक आहे. मुंबई विमानतळावरुन ये - जा करणाऱ्यांपैकी या सेवा आंतरराष्‍ट्रीय प्रवासी वाहतुकीमध्‍ये तर इंडिगो, एअर इंडिया आणि आकासा एअर या देशांतर्गत प्रवासी वाहतुकीत अव्वल आहेत.


मुंबईतून देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय शहरांमध्ये होत असलेल्या विमान वाहतुकीमुळे प्रवाशांची सोय झाली आहे. विविध शहरांमध्ये कमीत कमी वेळात पोहोचण्यासाठी प्रवासी मुंबईतून विमान प्रवासाचा पर्याय आनंदाने निवडत आहेत.

Comments
Add Comment

टाटा मुंबई मॅरेथॉनसाठी धावपटू सज्ज

मुंबई : आशियातील सर्वात मानाची आणि जगातील अव्वल मॅरेथॉनपैकी एक असलेली 'टाटा मुंबई मॅरेथॉन' यंदा २१ व्या वर्षात

महापालिकेत स्वतंत्र सांस्कृतिक विभाग, पर्यटन विभागाची स्थापना

महायुतीने दिला मुंबईतील मतदारांना शब्द मुंबई : मुंबईची संस्कृती, कला व वारसा जतन व प्रोत्साहन देण्यासाठी मुंबई

मंत्री नितेश राणे यांच्या बंगल्याबाहेर बेवारस बॅग

मुंबई : राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या मुंबईतील शासकीय निवासस्थानाबाहेर

जिल्हा परिषदांच्या निवडणुका पुन्हा ‘कोर्टा’च्या कचाट्यात

सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या सुनावणीकडे लक्ष मुंबई : राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या

'मुंबईला जागतिक दर्जाचे शहर करणार'

मुंबई : विकास हाच आमचा केंद्रबिंदू असून मुंबईचा रखडलेला विकास पुन्हा वेगाने सुरू करण्यात आला. घरकुल योजना,

वर्षभरात मुंबई ‘बांगलादेशीमुक्त’ करणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : 'मुंबईत अवैधरीत्या वास्तव्य करणाऱ्या सर्व बांगलादेशी नागरिकांना शोधून काढून येत्या येत्या वर्षभरात