मागच्या वर्षांच्या तुलनेत या वर्षींच्या विमानसेवेत झाले एवढी वाढ ?

मुंबई : विमा वाहतुकीबाबतच्या ताज्या अहवालानुसार मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर वर्षभरात म्हणजेच २०२५ मध्ये एकूण ३ लाख ३१ हजार ११ विमानांची वाहतूक झाली. यात ९२ हजार १४१ आंतरराष्ट्रीय आणि २ लाख ३८ हजार ८७० देशांतर्गत विमानं होती. या विमानांद्वारे वर्षभरात ५ कोटी ५५ लाख प्रवाशांची वाहतूक झाली. प्रवासी संख्येत २०२४ च्या तुलनेत १.३ टक्क्यांची तर विमान वाहतुकीत २०२२ च्या तुलनेत जवळपास २५ टक्क्यांची वाहतूक झाली आहे.


मुंबईतून प्रामुख्याने दिल्ली, बंगळुरू, कोलकाता, हैदराबाद, दुबई, अबुधाबी, लंडन हिथ्रो आणि सिंगापूर या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात विमान वाहतूक झाली. तसेच २०२५ मध्ये मुंबईतून अल्माटी, अम्मान, बाली (डेनपसार), कोपनहेगन, फुजैराह, क्राबी, मँचेस्टर, तिबिलिसी, आदमपूर, अमरावती, हिंडन, झारसुगुडा, पोरबंदर, सोलापूर या शहरांसाठी विमानसेवा सुरू झाली आहे.


मुंबईतून २०२५ मध्ये सर्वाधिक विमानं दिल्लीसाठी उडाली. नंतर बंगळुरू आणि गोव्यासाठी मुंबईतून मोठ्या संख्येने उड्डाणे झाली. मुंबई - दिल्ली या विमान मार्गावरुन १७ टक्के प्रवासी वाहतूक झाली. मुंबई - दुबई या आंतरराष्ट्रीय विमान मार्गावर १५ टक्के प्रवासी वाहतूक झाली. आंतरराष्ट्रीय प्रवासी वाहतुकीच्या बाबतीत मुंबई - दुबई या मार्गानंतर २८.२ टक्‍क्‍यांसह आशिया-पॅसिफिक आणि १४.५ टक्‍क्‍यांसह युरोपचा क्रमांक आहे. मुंबई विमानतळावरुन ये - जा करणाऱ्यांपैकी या सेवा आंतरराष्‍ट्रीय प्रवासी वाहतुकीमध्‍ये तर इंडिगो, एअर इंडिया आणि आकासा एअर या देशांतर्गत प्रवासी वाहतुकीत अव्वल आहेत.


मुंबईतून देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय शहरांमध्ये होत असलेल्या विमान वाहतुकीमुळे प्रवाशांची सोय झाली आहे. विविध शहरांमध्ये कमीत कमी वेळात पोहोचण्यासाठी प्रवासी मुंबईतून विमान प्रवासाचा पर्याय आनंदाने निवडत आहेत.

Comments
Add Comment

US-India Trade Deal: मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून भारत-अमेरिका मुक्त व्यापार कराराचे कौतुक

मुंबई: भारत युरोप मुक्त व्यापार करारानंतर आता भारत अमेरिका या दोन देशांमध्ये मुक्त करार झाला आहे. स्वतः

ठाणे जिल्ह्यात महापौर पदावर ‘लाडक्या बहीणीं’चे राज्य

पद आरक्षित नसतानाही शिवसेनेकडून तीन महापालिकांत महिलांना संधी मुंबई : महापालिका निवडणूक पार पडल्यानंतर आता

सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता केल्यास २५० पासून २५ हजार दंड, नियमांचे उल्लंघन केल्यास दंडात्मक कारवाई

मुंबई : मुंबई महानगरपालिकेकडून घनकचरा आणि स्वच्छता विषयक जागृता निर्माण केली जात आहे. यामध्ये कचरा निर्माण

रस्त्यावर थुंकल्यास, कचरा टाकल्यास होणाऱ्या दंडाच्या रकमेत वाढ

महापालिकेने नव्याने स्वच्छता उपविधी तयार दंडाची रक्कमेची आकारणी २ फेब्रुवारीपासून अमलात मुंबई : मुंबई

मेट्रो- ४ मार्गिकेच्या कामाला गती

भांडुप येथे ३२५ मेट्रिक टनचे तीन स्टील स्पॅन्स यशस्वीरीत्या स्थापित मुंबई : महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून

महाराष्ट्रासाठी रेल्वेची २३ हजार कोटी रुपयांची विक्रमी अर्थसंकल्पीय तरतूद

मुंबई : रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय तरतुदीबाबत सोमवारी माहिती देताना