Bangladesh News : बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या, तरुणाला बेदम मारहाण आणि विषबाधा; अल्पसंख्याकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

ढाका : बांगलादेशातील राजकीय अस्थिरतेच्या काळात हिंदू समुदायाला लक्ष्य करण्याचे सत्र अद्यापही सुरूच असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. गुरुवारी सुनामगंज जिल्ह्यात जॉय महापात्रो नावाच्या एका हिंदू तरुणाची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली. या घटनेमुळे बांगलादेशातील हिंदू अल्पसंख्याकांमध्ये भीतीचे आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. जॉय महापात्रोच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, एका स्थानिक कट्टरपंथी व्यक्तीने जॉयला गाठून त्याला आधी लाथाबुक्क्यांनी आणि काठ्यांनी गंभीर मारहाण केली. मारहाणीत तो रक्ताळलेला असतानाच, नराधमाने त्याला बळजबरीने विष पाजले. या दुहेरी हल्ल्यामुळे जॉयची प्रकृती खालावली आणि त्यातच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. जॉयच्या कुटुंबीयांनी या प्रकरणी स्थानिक प्रशासनाकडे दाद मागितली असून दोषीला कठोर शिक्षा करण्याची मागणी केली आहे. गेल्या काही महिन्यांपासून बांगलादेशात हिंदूंची घरे, मंदिरे आणि व्यक्तींना सातत्याने लक्ष्य केले जात आहे. सुनामगंजमधील या ताज्या घटनेने सुरक्षा यंत्रणांच्या दाव्यांची लक्तरे वेशीवर टांगली आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर मानवाधिकार संघटनांनी या घटनेचा निषेध केला असून, बांगलादेशच्या अंतरिम सरकारने हिंदूंच्या रक्षणासाठी ठोस पावले उचलावीत, अशी मागणी केली जात आहे.



बांगलादेशातील हिंदू लोकसंख्या खूप घाबरली...


महापात्रा यांची प्रकृती बिघडली आणि त्यांना सिल्हेट एमएजी उस्मानी मेडिकल कॉलेज रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे अतिदक्षता विभागात उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. या घटनेने बांगलादेशातील अल्पसंख्याक हिंदू लोकसंख्येत प्रचंड भीती निर्माण झाली आहे.



नरसिंगडी शहरात एका हिंदू व्यक्तीची हत्या...


बांगलादेशमध्ये अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस यांच्या कार्यकाळात अल्पसंख्यांकांवरील हल्ल्यांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. काही दिवसांपूर्वीच बांगलादेशातील नरसिंगदी शहरात अज्ञात हल्लेखोरांनी एका ४० वर्षीय हिंदू व्यक्तीची धारदार शस्त्राने भोसकून हत्या केली होती. यामुळे बांगलादेशातील हिंदू लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.



पत्रकार राणा प्रताप यांना अतिरेक्यांनी गोळ्या झाडल्या अन्...


५ जानेवारी रोजी, जाशोरमधील कोपलिया बाजारात हिंदू व्यापारी आणि पत्रकार राणा प्रताप यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. मागील महिन्याच्या १८ डिसेंबर रोजी, मैमनसिंगमधील कापड कारखान्यातील कामगार दीपू चंद्र दास यांना ईशनिंदेच्या आरोपाखाली मारहाण करून ठार मारण्यात आले. नंतर त्यांचा मृतदेह झाडाला बांधून जाळण्यात आला.



खोकन चंद्र दास यांची चाकूने वार करून हत्या...


३१ डिसेंबर २०२५ रोजी, शरीयतपूरमध्ये व्यापारी खोकन चंद्र दास यांना चाकूने वार करून जाळण्यात आले. तीन दिवसांनी ढाका येथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. हिंदूंच्या वारंवार होणाऱ्या हत्येबद्दल मानवाधिकार गट आणि अल्पसंख्याक समुदायाच्या सदस्यांनी गंभीर चिंता व्यक्त केली आहे. त्यांचे म्हणणे आहे की अटकेतील विलंब आणि स्थानिक अधिकाऱ्यांकडून कमकुवत कारवाई यामुळे गुन्हेगारांना प्रोत्साहन मिळत आहे आणि असुरक्षित समुदायांमध्ये भीती वाढत आहे.

Comments
Add Comment

Nashik News: कडाक्याच्या थंडीने घेतला पहिला बळी, निफाडमध्ये 22 वर्षीय तरुणाचा मृत्यु

नाशिक:निफाड तालुक्यात कडाक्याच्या थंडीने पहिला बळी घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. देवगाव (ता. निफाड)

Cricket News: स्थानिक क्रिकेटपटुचा सामानादरम्यान मैदानातच मृत्यु; खेळता खेळता अचानक खाली पडला..

मिझोरममध्ये क्रिकेटसृष्टीत दुर्दैवी घटना घडली आहे. राज्याचे माजी रणजी क्रिकेटपटू आणि वेंघनुई रेडर्स सीसीचे

कल्याणमध्ये उबाठाला मोठा झटका

अधिकृत उमेदवाराचा शिवसेनेत प्रवेश कल्याण : महापालिका निवडणुकीसाठी १५ जानेवारीला मतदान होणार असून, प्रचार अंतिम

पाणंद रस्ते समितीत सह अध्यक्षांसह परिषद सदस्य अन पाच प्रगतशील शेतकरी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निर्णय योजना प्रभावी करण्याचे चंद्रशेखर चंद्रशेखर बावनकुळे यांचे

Bihar Crime NEWS:"ट्रान्सजेंडरसोबत प्रेम, लग्न झाले, पण नको ते घडले…"धक्कादायक घटना !

बिहार :प्रेमामध्ये माणुस काहीही करू शकतो. असच एका युवकाने ट्रान्सजेंडरसोबत लग्न केलं पण तिच गोष्ट त्याच्या

Beed Crime News :"बीडमध्ये भररस्त्यात गोळीबार;अनैतिक संबंधांचा भयंकर कट उघड!

बीड: बीडमध्ये मंगळवारी दुपारी २.३० च्या सुमारास अंकुश नगर येथे जोरदार गोळ्याचा आवाज आला.. तेव्हा एका तरुणाची