अंबरनाथमध्ये काँग्रेसच्या कारवाईचा शिवसेनेला फटका; भाजपची मुसंडी

रवींद्र चव्हाणांनी २४ तासांत सूत्रे हलवली


अंबरनाथ : अंबरनाथ नगरपालिकेतील सत्तासंघर्षाने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवली आहे. भाजप–काँग्रेस युतीमुळे सुरू झालेल्या राजकीय भूकंपानंतर अवघ्या २४ तासांत भाजपने संपूर्ण चित्र पालटून टाकले, तर काँग्रेस अक्षरशः रिकामी झाली आहे. या घडामोडी शिवसेनेसाठी (शिंदे गट) धोक्याची घंटा मानली जात आहे. अंबरनाथ नगरपालिकेत भाजप आणि काँग्रेसच्या अनपेक्षित युतीची सर्वत्र चर्चा रंगली होती. या निर्णयावर काँग्रेसच्या राज्य नेतृत्वाने तीव्र नाराजी व्यक्त करत सर्व १२ नगरसेवकांना निलंबित केले, तर अंबरनाथ ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रदीप पाटील यांची हकालपट्टी करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या घडामोडींवर नाराजी व्यक्त केली होती.


निलंबनानंतर २४ तासही उलटत नाहीत तोच काँग्रेसचे सर्व १२ नगरसेवक भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. अंबरनाथमधील काँग्रेस पूर्णपणे संपुष्टात आली असून, भाजपचे संख्याबळ लक्षणीयरीत्या वाढले आहे.


चव्हाणांचा टॉप गियर; २०२९ ची तयारी:


भाजप प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर रविंद्र चव्हाण यांनी संघटनात्मक ताकदीवर भर दिला. कल्याण-डोंबिवलीत शिवसेनेचे (शिंदे गट) अनेक पदाधिकारी भाजपमध्ये दाखल झाले. खा. श्रीकांत शिंदे यांचे निकटवर्तीय दिपेश म्हात्रे यांनीही कमळ हाती घेतले. भाजप आणि श्रीकांत शिंदे यांच्यातील तणाव जुना असून, २०२४ लोकसभा निवडणुकीत भाजप कार्यकर्त्यांमध्ये नाराजी होती, अशी चर्चा होती. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना ठाण्यात भाजप बॅकफूटवर गेली होती; २०२४ नंतर चित्र बदलले. चव्हाणांकडे प्रदेशाध्यक्षपद आले. चव्हाण यांनी पक्षप्रवेशांचा सपाटा लावत शिवसेनेची (शिंदे गट) राजकीय कोंडी सुरू केली आहे. अंबरनाथ, बदलापूरसारख्या पारंपरिक शिवसेना गडांमध्ये भाजपचे नगराध्यक्ष झाले, ठाणे जिल्ह्यात सत्तासंतुलन वेगाने बदलत आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते, २०२९ च्या निवडणुकांसाठी भाजप स्वबळावर लढण्याच्या तयारीत असून, चव्हाणांनी टाकलेला ‘टॉप गियर’ शिवसेनेसाठी (शिंदे गट) वर्तमानातच नव्हे, तर भविष्यातही मोठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे.


संख्याबळात बदल, शिवसेनेची (शिंदे गट) कोंडी


अंबरनाथ नगरपालिकेत शिंदेसेनेने सर्वाधिक २७ जागा जिंकल्या होत्या. भाजपला १४, काँग्रेसला १२, तर राष्ट्रवादी काँग्रेसला ४ जागा मिळाल्या. भाजपने काँग्रेस व राष्ट्रवादीला सोबत घेत शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवले होते. मात्र आता १२ नगरसेवक भाजपमध्ये आल्याने सत्तासमीकरण पूर्णपणे बदलले आहे. दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष असतानाही भाजपने नगराध्यक्षपद मिळवले असून, नव्या पक्षप्रवेशांमुळे शिवसेनेला (शिंदे गट) उपनगराध्यक्षपद व समित्यांवरील दावा कमजोर झाला आहे.

Comments
Add Comment

Drugs Case : मीरा रोडमध्ये २३.३ लाख रुपयांचे ड्रग्स जप्त, तिघांना अटक

मीरा रोड : मुंबईलगतच्या मीरा-भाईंदर शहरात पोलिसांनी गेल्या दोन दिवसांत वेगवेगळ्या कारवाईत एकूण तेवीस लाख तीस

Shivshahi Bus Fire : ठाणे स्टेशनवर ‘शिवशाही’ बसला भीषण आग; १५ प्रवासी थोडक्यात बचावले

ठाणे रेल्वे स्टेशन परिसरातील सेटीस ब्रिजवर आज म्हणजेच गुरुवार २३ एप्रिल रोजी ‘शिवशाही’ बसला अचानक भीषण आग

Central Railway : मध्य रेल्वे सलग तिसऱ्या दिवशी ४५ मिनिटे उशिराने; प्रवाशांचे हाल

ठाणे : डोंबिवली स्थानकावर रिकाम्या रेल्वेचा डब्बा घसरला आणि संपूर्ण मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले, त्या

Mumbai Local : डोंबिवलीमध्ये रिकाम्या लोकलचा डब्बा रुळावरून घसरला; लोकलचे वेळापत्रक कोलमडले

ठाणे : डोंबिवली, ठाणे, कल्याण, या परिसरातून अनेक लोक मुंबईत आपल्या कामानिमित्त येत असतात. अशातच जर मुंबईच्या

Thane : मेट्रो, टनेल, पॉड टॅक्सी ते परवडणारी घरे; ठाणे बनतंय सुपर सिटी

ठाणे : “पूर्वी ‘पुणे तिथे काय उणे’ म्हटले जायचे; आता ‘ठाणे तिथे काय उणे’ असे आत्मविश्वासाने म्हणण्याची वेळ आली

Thane Illegal Cylinder Storage : ‘डॉमिनोज पिझ्झा’मधून ४.५९ लाखांचा सिलिंडर साठा जप्त

शिधावाटप भरारी पथकाचे छापासत्र; एकाला बेड्या, १४० सिलिंडर घेतले ताब्यात मुंबई : व्यावसायिक वापरासाठीच्या