अंबरनाथमध्ये काँग्रेसच्या कारवाईचा शिवसेनेला फटका; भाजपची मुसंडी

रवींद्र चव्हाणांनी २४ तासांत सूत्रे हलवली


अंबरनाथ : अंबरनाथ नगरपालिकेतील सत्तासंघर्षाने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवली आहे. भाजप–काँग्रेस युतीमुळे सुरू झालेल्या राजकीय भूकंपानंतर अवघ्या २४ तासांत भाजपने संपूर्ण चित्र पालटून टाकले, तर काँग्रेस अक्षरशः रिकामी झाली आहे. या घडामोडी शिवसेनेसाठी (शिंदे गट) धोक्याची घंटा मानली जात आहे. अंबरनाथ नगरपालिकेत भाजप आणि काँग्रेसच्या अनपेक्षित युतीची सर्वत्र चर्चा रंगली होती. या निर्णयावर काँग्रेसच्या राज्य नेतृत्वाने तीव्र नाराजी व्यक्त करत सर्व १२ नगरसेवकांना निलंबित केले, तर अंबरनाथ ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रदीप पाटील यांची हकालपट्टी करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या घडामोडींवर नाराजी व्यक्त केली होती.


निलंबनानंतर २४ तासही उलटत नाहीत तोच काँग्रेसचे सर्व १२ नगरसेवक भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. अंबरनाथमधील काँग्रेस पूर्णपणे संपुष्टात आली असून, भाजपचे संख्याबळ लक्षणीयरीत्या वाढले आहे.


चव्हाणांचा टॉप गियर; २०२९ ची तयारी:


भाजप प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर रविंद्र चव्हाण यांनी संघटनात्मक ताकदीवर भर दिला. कल्याण-डोंबिवलीत शिवसेनेचे (शिंदे गट) अनेक पदाधिकारी भाजपमध्ये दाखल झाले. खा. श्रीकांत शिंदे यांचे निकटवर्तीय दिपेश म्हात्रे यांनीही कमळ हाती घेतले. भाजप आणि श्रीकांत शिंदे यांच्यातील तणाव जुना असून, २०२४ लोकसभा निवडणुकीत भाजप कार्यकर्त्यांमध्ये नाराजी होती, अशी चर्चा होती. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना ठाण्यात भाजप बॅकफूटवर गेली होती; २०२४ नंतर चित्र बदलले. चव्हाणांकडे प्रदेशाध्यक्षपद आले. चव्हाण यांनी पक्षप्रवेशांचा सपाटा लावत शिवसेनेची (शिंदे गट) राजकीय कोंडी सुरू केली आहे. अंबरनाथ, बदलापूरसारख्या पारंपरिक शिवसेना गडांमध्ये भाजपचे नगराध्यक्ष झाले, ठाणे जिल्ह्यात सत्तासंतुलन वेगाने बदलत आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते, २०२९ च्या निवडणुकांसाठी भाजप स्वबळावर लढण्याच्या तयारीत असून, चव्हाणांनी टाकलेला ‘टॉप गियर’ शिवसेनेसाठी (शिंदे गट) वर्तमानातच नव्हे, तर भविष्यातही मोठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे.


संख्याबळात बदल, शिवसेनेची (शिंदे गट) कोंडी


अंबरनाथ नगरपालिकेत शिंदेसेनेने सर्वाधिक २७ जागा जिंकल्या होत्या. भाजपला १४, काँग्रेसला १२, तर राष्ट्रवादी काँग्रेसला ४ जागा मिळाल्या. भाजपने काँग्रेस व राष्ट्रवादीला सोबत घेत शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवले होते. मात्र आता १२ नगरसेवक भाजपमध्ये आल्याने सत्तासमीकरण पूर्णपणे बदलले आहे. दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष असतानाही भाजपने नगराध्यक्षपद मिळवले असून, नव्या पक्षप्रवेशांमुळे शिवसेनेला (शिंदे गट) उपनगराध्यक्षपद व समित्यांवरील दावा कमजोर झाला आहे.

Comments
Add Comment

Eknath Shinde : 'कच्छी समाजाशी नातं हे कुटुंबासारखंच'; ठाण्याच्या विकासासाठी शासन कटिबद्ध – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे : कच्छी अस्मिता मंचतर्फे आयोजित 'कच्छी पगडी कोणशिरे' या गौरव सोहळ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कच्छी

Thane Crime : क्लिनिंगसाठी आलेल्या महिलेने चोरले ३.५ लाखांचे मंगळसूत्र; ठाणे पोलिसांनी तासाभरात परत मिळवले

ठाणे पोलिसांची कामगिरी, अवघ्या एका तासात मिळवले चोरी झालेले दागिने  ठाणे  : ठाण्यातील (Thane) राबोडी पोलिसांनी जलद

Kalyan Dombivli Rain Update : कल्याण-डोंबिवलीत पावसाची दाणादाण : नाले ओव्हरफ्लो, घरांमध्ये पाणी साचल्याने नागरिकांची मोठी तारांबळ

कल्याण : कल्याण-डोंबिवली आणि आसपासच्या परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शहरात दाणादाण उडाली असून जनजीवन

Dombivli News : मुसळधार पावसात डोंबिवलीत नागरिक हैराण; पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत, चोरट्यांच्या टोळीची दहशत

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात गेल्या चार ते पाच दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे (Heavy Rain)

Thane Crime : निर्दयीपणाचा कळस; साडेतीन वर्षांच्या मुलाला गरम उलथण्याने दिले चटके

Thane News : ठाणे-बोरिवली बोगदा प्रकल्पासाठी कासारवडवलीत वाहतूक बदल; ६ जुलै ते ५ ऑगस्टपर्यंत मार्ग बंद

ठाणे : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (MMRDA) महत्त्वाकांक्षी ठाणे-बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्पाच्या