पनवेल महापालिका निवडणुकीत राजकीय पक्षांकडून महिलांना मोठ्या प्रमाणावर उमेदवारी

पनवेल : पनवेल महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत यंदा महिलांचा लक्षणीय सहभाग पाहायला मिळत असून ५० टक्के आरक्षण असल्यामुळे विविध राजकीय पक्षांकडून तब्बल १०८ महिला उमेदवारांना निवडणूक रिंगणात उतरवण्यात आले आहे. सर्वाधिक महिला उमेदवारांना भाजपने संधी दिली असून, त्यापाठोपाठ शेतकरी कामगार पक्ष आणि अपक्ष उमेदवारांचा क्रमांक लागतो. या महिला उमेदवारांपैकी कोण ‘संधीचे सोने’ करणार, हे चित्र निवडणूक निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.


महापालिका निवडणुकीसाठी पुरुष उमेदवारांप्रमाणेच महिला उमेदवारांनीही गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून आपल्या प्रभागांमध्ये जोरदार तयारी केली होती. महिला, ज्येष्ठ नागरिक, लहान मुले तसेच पशुधन यांच्यासाठी सामाजिक उपक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम, छोटेखानी सभा, मेळावे अशा विविध उपक्रमांच्या माध्यमातून त्यांनी मतदारांशी थेट संपर्क वाढविण्यावर भर दिला.प्रभागातील पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापन, वीजपुरवठा, मुलांच्या शाळांमधील प्रवेश, नोकरीच्या संधी, तसेच राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ नागरिकांपर्यंत पोहोचवणे या माध्यमातून अनेक महिला इच्छुकांनी नागरिकांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे अनेक प्रभागांमध्ये महिला उमेदवारांचे मजबूत नेटवर्क तयार झाले होते.


दरम्यान, निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच महिला उमेदवारांसह त्यांचे पती, वडील, भाऊ व कुटुंबीय यांनी उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न केले होते.


‘लाडक्या बहिणींपैकी’ कोण मतदारांचा विश्वास संपादन करून विजयी ठरणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

Comments
Add Comment

‘आशियामध्ये शांततेसाठी अरब राष्ट्राची भूमिका कौतुकास्पद’

नवी दिल्ली : अरब देशाच्या परराष्ट्रमंत्र्यांनी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी

कुर्ला पश्चिम भागातील तुंबणाऱ्या पाण्याचा आता बंदोबस्त...

मुंबई (सचिन धानजी) : कुर्ला पश्चिम येथील प्रिमियर नाल्याला जोडणाऱ्या भारतीय नगर नाला आणि विनोबा भावे नाल्याचे

विपुल अमृतलाल शाह यांचा ‘द केरळा स्टोरी 2: गोज़ बियॉन्ड’ — उल्का गुप्ता, ऐश्वर्या ओझा आणि अदिती भाटिया यांच्या प्रभावी कॅरेक्टर पोस्टर्सचे अनावरण

अधिक ताकदवान, अधिक काळोख, अधिक खोल: ‘द केरळा स्टोरी 2: गोज़ बियॉन्ड’मधील प्रमुख महिला कलाकारांचे कॅरेक्टर

हिंजवडी–शिवाजीनगर मेट्रो मार्च अखेरीस सुरू

पुणे : हिंजवडी–शिवाजीनगर मेट्रो प्रवास लवकरच मार्च अखेरीस सुरू होण्याची शक्यता आहे. मेट्रो प्रकल्पाने यापूर्वी

भारतातील मलेरिया रुग्णसंख्येत लक्षणीय घट

मुंबई : मलेरिया हा आजार एकेकाळी भारतातील सार्वजनिक आरोग्यासमोरील मोठे आव्हान मानला जात होता. मात्र गेल्या दशकात

‘जा-मर’ म्हणणे जीवन संपविण्यास प्रवृत्त करणे नव्हे!

हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल कोची : दोन व्यक्तीच्या भांडणादरम्यान एकाने जा आणि मर यांसारखी विधाने करणे हे