'मुंबईत फक्त जय श्रीराम म्हणणारेच निवडून द्यायचे'


मुंबई : मनात जय श्रीराम म्हणा आणि मतदान करा. मुंबईचा रंग बदलू द्यायचा नसेल तर जय श्रीराम म्हणणारे नगरसेवक निवडून द्या असे आवाहन मंत्री नितेश राणे यांनी केले. ते मुंबई महापालिका निवडणुकीसाठी चांदिवलीच्या संघर्ष नगरमध्ये घेतलेल्या प्रचारसभेत बोलत होते.


चांदिवली मध्ये येण्याची वेगळी मजा आहे कारण इथे आजूबाजूला हिरवे साप वळवळतात, असे सूचक वक्तव्य नितेश राणेंनी केले. नितेश राणेंच्या या वक्तव्याला उपस्थितांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सभेत बोलताना वॉर्डाच्या विकासाला काहीही कमी पडू देणार नाही, अशी हमी मंत्री नितेश राणे यांनी दिली. प्रचारसभेत बोलताना त्यांनी उद्धव आणि राज यांच्यावर सडकून टीका केली. हिंदू मतांमध्ये फूट पाडण्यासाठी उद्धव आणि राज एकत्र आले आहेत. मुंबईचा रंग बदलू द्यायचा नसेल तर मतांमध्ये फूट पाडून चालणार नाही. एकजुटीने उभे राहा आणि जय श्रीराम म्हणणाऱ्या नगरसेवकांना निवडून द्या, असे नितेश राणे म्हणाले.



राज्यात देवाभाऊंचे सरकार आहे. कोणी मुंबईवर राज्य करण्याचं स्वप्न बघत असेल आणि त्यासाठी इथे राहणाऱ्या सामान्य मुंबईकरांवर हात उगारत असेल तर त्याला परिणाम भोगावे लागतील. जो हात तुमच्यावर उठेल तो हात आम्ही ठेवणार नाही हा शब्द देतो, असे नितेश राणे म्हणाले. त्यांनी मुंबई भलत्यांच्या हाती जाणार नाही याची खबरदारी घेण्याचे आवाहन मतदारांना केले. मुंबई वर सत्ता ही आय लव महादेव वाल्यांचीच असायला पाहिजे आणि त्यासाठी तुमचे ही योगदान असायला हवे. मनात जय श्रीराम म्हणा आणि मतदान करा. मुंबईचा रंग बदलू द्यायचा नसेल तर जय श्रीराम म्हणणारे नगरसेवक निवडून द्या असे आवाहन मंत्री नितेश राणे यांनी केले.


हिंदूंना संघटित होण्याचे आवाहन नितेश राणेंनी केले. ज्याला महादेव आवडतात तोच मुंबई महापौर पदावर बसेल असा विश्वास त्यांनी सभेत बोलताना दिला. विकासासाठी भाजपला साथ देण्याचे आवाहनही नितेश राणेंनी मतदारांना केले.


Comments
Add Comment

Nashik : कांद्यापासून AI पर्यंत ! मुख्यमंत्री फडणवीसांनी नाशिकच्या शेतकऱ्यांना सांगितला तंत्रज्ञानाचा मंत्र

Nashik : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज विविध विकासकामांचे उदघाटन आणि लोकार्पणासाठी नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर

Viral 'brother-sister' : ३५ हजार फूट उंचीवरही राखीचं नातं; एअर इंडियाचे भाऊ-बहिण बनले सहकारी, कहाणी होतेय व्हायरल

नवी दिल्ली: रक्षाबंधनाच्या पवित्र सणाचे औचित्य साधून एअर इंडियाने मणिपूरमधील एका होतकरू भाऊ-बहिणीची

Nashik : कांदा एक्सप्रेस आता चेन्नईला ! मनमाडहून ८०० टन कांदा रवाना होणार

Nashik : देशभरात कांद्याच्या भावात अचानक वाढ झाल्यानंतर सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने

Prasad Lad : मराठा समाजासाठीच्या 'जीआर'च्या अंमलबजावणीत आडकाठी आणणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई होणार - प्रसाद लाड यांची माहिती

मनोज जरांगे यांच्या मागण्या मुख्यमंत्री पूर्ण करतील असा विश्वास मुंबई : मराठा समाजाबाबतचे शासन निर्णय (जीआर)

Jalgaon Crime : दोन तरुणांशी वाद अन् बियर बार मालक सरपंचाचा हवेत गोळीबार , नेमकं काय घडलं ?

Jalgaon Crime : जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील डांभुर्णी येथे गुरुवारी रात्री हवेत गोळीबार केल्याच्या घटनेने खळबळ

FIH Hockey World Cup : जर्मनीवर ३-१ असा दणदणीत विजय; भारतीय महिला हॉकी संघाची विश्वचषकात ऐतिहासिक कामगिरी

ॲमस्टेलवीन : भारतीय महिला हॉकी संघाने FIH महिला हॉकी विश्वचषक २०२६मध्ये शानदार कामगिरी करत पाचव्या स्थानावर