मनोज जरांगे यांच्या मागण्या मुख्यमंत्री पूर्ण करतील असा विश्वास
मुंबई : मराठा समाजाबाबतचे शासन निर्णय (जीआर) योग्य प्रकारे लागू करण्यामध्ये जर कोणी अधिकारी जाणीवपूर्वक आडकाठी आणत असेल, तर अशा अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, माहिती भाजपचे नेते प्रसाद लाड यांनी शुक्रवारी दिली. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक असून त्यांच्या सर्व मागण्या मुख्यमंत्री पूर्ण करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
ॲमस्टेलवीन : भारतीय महिला हॉकी संघाने FIH महिला हॉकी विश्वचषक २०२६मध्ये शानदार कामगिरी करत पाचव्या स्थानावर स्पर्धेचा शेवट केला. पाचव्या स्थानासाठी ...
मुंबईत रक्षाबंधन सोहळ्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना प्रसाद लाड यांनी मराठा आरक्षण आणि मनोज जरांगे यांच्या आंदोलनाबाबत भाष्य केले. जरांगे यांनी मुंबईऐवजी अंतरवाली सराटीत उपोषण करण्याचा घेतलेला निर्णय स्वागतार्ह असल्याचे सांगत लाड म्हणाले की, सणासुदीच्या काळात मुंबईत त्रास होऊ नये म्हणून आम्ही त्यांना विनंती केली होती. त्याचा त्यांनी मान राखला. राज्य सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात अनेक महत्त्वपूर्ण जीआर काढले आहेत, परंतु प्रशासकीय पातळीवर काही ठिकाणी तफावत राहिल्यामुळे हे आदेश ग्रामीण भागातील तळागाळापर्यंत पूर्णपणे पोहोचू शकले नाहीत, हे त्यांनी मान्य केले.
लोणावळा : जुन्या पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर गुरुवारी, २७ ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास भीषण अपघात झाला. कार्ला फाट्याजवळील वाकसई गावाच्या ...
मुख्यमंत्र्यांनी संबंधित विभागाला स्पष्ट निर्देश दिले असून, जे अधिकारी चुकीच्या पद्धतीने काम करत आहेत किंवा कागदपत्रांच्या अंमलबजावणीत अडथळे निर्माण करत आहेत, त्यांच्यावर निश्चितपणे कारवाई केली जाईल, असे लाड यांनी स्पष्ट केले.