पुण्यात हत्याकांड; मित्र झाला वैरी, धारदार शस्त्र आणि दगडाने केली हत्या

पुणे : पुण्यात मित्रच निघाले पक्के वैरी... मित्रांनीच दुसऱ्या मित्राला मारहाण करत जीवानिशी मारल्याची धक्कादायक घटना पुण्यातून समोर आली आहे. ही घटना आहे पुणे शहरातील विश्रामवाडी येथे घडली असून, काही दिवसांपूर्वी विश्रामवाडी येथील एक १७ वर्षीय मुलाचे अपहरण झाल्याची बातमी पुणे पोलिसांना मिळाली होती. पोलीस त्या मुलाचा शोध घेत असताना या मुलाची हत्या झाल्याचे पोलिसांना कळले. मृत मुलाचे नाव ( अमनसिंग सुरेंद्रसिंग गचंड ) आहे. मुलाची चाकूने गळा चिरून अमानुषपणे हत्या करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी ५ आरोपींना ताब्यात घेतले आहे. तब्बल ११ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



नेमकं काय घडलं?


खेड शिवापूर येथील वर्तमुख मंदिराच्या डोंगराळ परिसरात २९ डिसेंबरच्या दिवशी मैत्रिणीच्या सांगण्यावरून अमनसिंग ठिकाणी भेटायला गेला. दोघांनी मंदिरात दर्शन घेतले, तेवढ्यात धबाले नावाचा मित्र तिथे आला. तो अमनसिंगला डोंगरावर घेऊन गेला आणि इतर मित्रांनाही तिथे बोलावलं. नंतर आरोपींनी अमनसिंग सोबत पार्टी केली. अमनसिंगला भरपूर बिअर पाजण्यात आली. यानंतर गळयावर कोयत्याने वार करत अमनसिंगची हत्या करण्यात आली. हत्या केल्यानंतर डोकं दगडाने ठेचून मृतदेह खड्ड्यात पुरण्यात आला.


अमनसिंग घरी न आल्याने त्याच्या आईने तक्रार केली. आईच्या तक्रारीवरून गुन्हे शाखेच्या पथकाने तपास करत अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतले. चौकशीत आरोपींनी पूर्वीच्या वादातून अमनसिंगचा खून केल्याची आणि मृतदेह पुरल्याची कबुली दिली.

Comments
Add Comment

BMC सभागृहनेत्यांचा पुन्हा आवाजावरून त्रागा

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या सभागृहातील ध्वनी यंत्रणेतील दोष निवारण करण्यास अद्यापही

BMC स्थायी समिती अध्यक्ष करणार मुंबईतील रस्त्यांची पाहणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : पावसाळा जवळ आला असून अनेक ठिकाणी रस्त्यांची कामे तसेच इतर प्रकल्पांची कामे सुुरु

BMC च्या तक्रारींचे होणार जलद निवारण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईकर नागरिकांना नागरी सेवा-सुविधा पुरविताना नागरिकांचा सहभाग वाढवून त्यांच्या

केंद्र सरकारच्या iGOT–‘Sadhana Saptah 2026’ मध्ये महाराष्ट्र अव्वल

मुंबई : केंद्र सरकारच्या ‘मिशन कर्मयोगी’ अंतर्गत आयोजित ‘साधना सप्ताह २०२६ मध्ये राज्याने देशात प्रथम क्रमांक

BJP : भाजपकडून २३ प्रदेश प्रवक्ते आणि विभागीय प्रसिद्धी प्रमुखांच्या नियुक्त्या जाहीर

मुंबई : पक्षाची भूमिका आक्रमकपणे मांडण्यासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी बुधवारी महाराष्ट्र

Satara IT Park : सातारा जिल्ह्यात आयटी पार्क उभारणार

मुंबई : सातारा जिल्ह्यातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्राला चालना देण्यासाठी मौजे नागेवाडी (ता. सातारा, जि. सातारा)