‘ठाण्यासह एमएमआर क्षेत्राच्या विकासासाठी कटिबद्ध’

मुख्यमंत्री फडणवीस यांचे ठाणेकरांना आश्वासन


ठाणे : ''ठाणे आणि संपूर्ण एमएमआर क्षेत्रात वाहतुक कोडींचा प्रश्न गंभीर आहे. ही समस्या सरकारला ठाऊक आहे. यावर उपाय म्हणून ठाण्यात मेट्रो सुरू झाली आहे. त्याचे काम पुढेदेखील सुरू राहिल तसेच परिसरातील वेगवेगळे भागदेखील जोडली जातील'' असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित आणि ठाणेकरांना आश्वस्त केले. ते ठाण्यातील राम गणेश गडकरी रंगायतन येथे बुधवारी झालेल्या विशेष चर्चासत्रात बोलत होते. ज्येष्ठ संपादक मिलिंद बल्लाळ आणि अभिनेत्री तेजश्री प्रधान यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची मुलाखत घेतली.


मुख्यमंत्र्यांनी ठाणे व एमएमआर क्षेत्रातील वाहतूक, कचरा व्यवस्थापन, पाणी पुरवठा आणि शहर विकास यासंदर्भात पुढील योजना स्पष्ट केल्या. ते म्हणाले, ''वाहतुकीचा प्रश्न सोडविण्यासाठी पहिल्या पाच वर्षांत मेट्रो संकल्पपूर्ती, २०३० पर्यंत सर्व मेट्रो ठाण्याशी जोडण्याचा मनोदय बोलून दाखवला. कोस्टल रोडद्वारे वाहतूक शहराबाहेर नेऊन कोंडी कमी करण्याचा प्रयत्न तसेच शेवटच्या व्यक्तीपर्यंत कनेक्टिव्हिटी सुनिश्चित केल्याचे सांगितले.


पुढील ३–४ वर्षात सर्व डंपिंग बंद करून बायो मायनिंग प्रकल्प सुरू करण्यात येतील. कोलशेत-दिवा मार्गावर पाच जेटी उभारून वॉटर टॅक्सी सुरू करणार असल्याचे सांगुन घोडबंदर रोडसह ग्रोथ हब बनवणे, ठाण्यात इन्क्युबेशन सेंटरबाबतचे नियोजनही फडणवीस यांनी सविस्तरपणे मांडले. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, प्रदेश सचिव माधवी देसाई, जिल्हा अध्यक्ष संदीप लेले आदी उपस्थित होते.


तीन वर्षांत पाणी समस्या सोडवणार


पोशीर आणि पेल्हार धरणाचे काम पुढील ३ वर्षांत पूर्ण करणार आहोत. गारगाई प्रकल्पासाठी वन विभागाची परवानगी मिळाली आहे. लवकरच ५०० एमएलडी पाण्याची व्यवस्था होईल. काळू धरण पूर्ण होईपर्यंत मुंबई-ठाण्यात पाणी समस्या सुटणार असल्याचा दावाही त्यांनी केला.


त्यांचा बॅण्ड वाजवल्याणार :


उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे प्रमुख नेते आहेत. बाळासाहेबांची शिवसेना त्यांच्या नेतृत्वाखाली चालत आहे आणि ठाणे हे त्यांच्या राजकीय ओळखीचे केंद्र आहे. या शहरात त्यांना दुखावणे योग्य नव्हते. यामुळेच कार्यकर्त्यांचा आग्रह असला तरी आम्ही कमी जागा घेऊन शिंदे यांच्या शिवसेनेसोबत युती करण्याचा निर्णय घेतला. असे स्पष्ट करून मुखमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, महाराष्ट्रात हिंदूहदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हा एकच ब्रॅण्ड होता. आता कुणीही ब्रॅण्ड म्हणुन उभे राहिले तरी त्यांचा बॅण्ड वाजवल्या शिवाय राहणार नाही असा इशाराही त्यांनी दिला.

Comments
Add Comment

Eknath Shinde : ठाणे क्लस्टर योजनेला गती देण्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

वागळे इस्टेट, किसननगर, कोपरी क्लस्टर महाप्रीतकडून एमएसआरडीसीकडे देण्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे

Central Railway Power Block Update : मध्य रेल्वेवर पॉवर ब्लॉक; ६ जूनला अनेक गाड्या रद्द, वेळापत्रकात बदल, लोकल सेवांवरही परिणाम!

कल्याण (Mumbai Central Railway Block) : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात आटगाव स्थानकावर नवीन इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग (Electronic Interlocking)

No-Parking Restrictions Ulhasnagar Roads : ठाणेकरांनो लक्ष द्या! उल्हासनगरमधील 'या' ५ मुख्य रस्त्यांवर २४ तास नो-पार्किंग; वाहतूक पोलिसांचा कडक निर्णय

उल्हासनगर : उल्हासनगर शहरात (Ulhasnagar) दररोज होणाऱ्या वाहतूक कोंडीतून नागरिकांची सुटका करण्यासाठी ठाणे वाहतूक

Thane News : दिवा येथून ७ वर्षीय चिमुकली बेपत्ता; ३६ तासांच्या प्रयत्नानंतर ठाणे पोलिसांना यश

ठाणे : ठाणे (Thane News) जिल्ह्यातील दिवा परिसरातून बेपत्ता झालेल्या ७ वर्षीय मुलीचा अवघ्या ३६ तासांत शोध घेण्यात ठाणे

Bhiwandi Water : भिवंडीच्या १५ लाख लोकांना २७३ एमएलडी पाणी मिळणार, ४२६ कोटींचा पाणी प्रकल्प

भिवंडी : अमृत अभियान २.० उपक्रमांतर्गत भिवंडी-निझामपूर शहराच्या विस्तारित पाणीपुरवठा योजनेंतर्गत १५ लाख

Actor Sharad Ponkshe : सावरकरांचे विचार विश्व कल्याणाचे - अभिनेते शरद पोंक्षे

ठाणे : स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे विचार कोणीही थांबवू शकत नाही. त्यांचे विचार विश्वकल्याणाचे आहेत. त्यांचे