निवडणुकीत नातवाचे तिकीट कापताच आजीने धरलं 'या' मंत्र्याला धारेवर

कोल्हापूर : राज्यात सर्वच्या सर्व २९ मनपांसाठी १५ जानेवारीला मतदान आणि १६ जानेवारीला मतमोजणी तसेच निकाल आहे. या मनपांसाठी सर्वच पक्ष आपापल्या ताकदीनुसार प्रचार करत आहेत. प्रचाराची रणधुमाळी उडाली आहे. या वातावरणात काही ठिकाणी नवे तर काही ठिकाणी जुनेच उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. राजकीय सोयीसाठी काही ठिकाणी निष्ठावंतांना डावलून इतर पक्षातून आपल्याकडे नुकत्याच आलेल्या व्यक्तीला जिंकून येण्याच्या क्षमतेचा विचार करुन


महापालिका निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. सर्वत्र निवडणुकीची रणधुमाळी आहे. त्यामुळे काही ठिकाणी नवे उमेदवारांची ओळख होत आहे तर काही ठिकाणी जुने उमेदवार पुन्हा उभे राहता आहेत काही ठिकाणी निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून अलीकडेच पक्षात दाखल झालेल्या उमेदवारांना तिकीट मिळत आहे. त्यामुळे काही ठिकाणी उमेदवारांचे आणि इच्छुकांचे रुसवे फुगवे सुरू आहेत.


अश्यातच कोल्हापुरातून एका आजीचा एका नेत्याशी बोलतानाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. आपल्या नातवाला डावलून दुसऱ्याला तिकीट दिल्याने आजीने चक्क मंत्र्यालाच धारेवर धरले आहे. प्रत्येक नेता आपल्या पक्षाच्या उमेदवारांसाठी प्रचारसभा, प्रचारफेऱ्या घेत आहे. मतदारसंघांमध्ये जाऊन मतदारांची भेट घेत आहे. भाजपचे नेते चंद्रकांत पाटीलही कोल्हापुरात प्रचारासाठी गेले होते. तेव्हाच त्यांना एका आजीने विचारलेला प्रश्न सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.


आजींचा नातू महानगरपालिका निवडणुकीत भाजपकडून उमेदवारी मिळावी यासाठी इच्छुक होता. स्थानिक पातळीवर त्याने तयारीही केली होती. मात्र उमेदवारांच्या यादीत नाव न आल्याने कुटुंबीयांमध्ये नाराजीचे वातावरण पसरले. अखेर या नाराजीचा उद्रेक थेट मंत्र्यांसमोरच झाला. मंत्री चंद्रकांत पाटील हे कोल्हापूर येथे कार्यक्रमासाठी आले होते. त्यावेळी अचानक एका आजीने त्यांचा रस्ता अडवला. “माझ्या नातवाचं तिकीट का कापलं?” असा थेट सवाल करत आजीने आपली व्यथा मांडली. आजीचा रोखठोक सवाल आणि त्यामागची भावनिक बाजू पाहून उपस्थित कार्यकर्तेही क्षणभर अवाकही झाले.


या प्रसंगी वातावरण हाताळत चंद्रकांत पाटील यांनी आजीचा हात हातात घेऊन त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. 'यावेळी जमलं नाही, पुढच्या वेळी नक्की तुमच्या नातवाला तिकीट देऊ' असे आश्वासन देत आजीची समजूत काढली. या आश्वासनानंतरच आजीचा राग काहीसा शांत झाल्याचे व्हिडीओ मधून दिसले. उमेदवारीच्या तिकिटावरून अनेक ठिकाणी नाराजीचे सूर उमटत राहतात, मात्र आजीने रोखठोक वागत सरळ मंत्र्यालाच जाब विचारल्याने हा प्रसंग लक्ष वेधणारा ठरला आहे

Comments
Add Comment

रब्बी हंगामातील 'ई-पीक पाहणी'ला ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ

- ४५ टक्के शेतकरी अजूनही प्रक्रियेबाहेर; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा मुंबई : राज्यातील रब्बी

ग्रामीण भागातील घरबांधणी आता होणार सुलभ; बांधकाम परवानगीचे अधिकार तालुका स्तरावर देण्याचे संकेत!

- मंत्री उदय सामंत यांचे विधानपरिषदेत आश्वासन मुंबई : राज्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना आपल्या घराच्या

Jalna: गॅस एजन्सीचे गोडाऊन फोडले अन् ११० सिलिंडर चोरले, जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

जालना: जालना तालुक्यातील रामनगर परिसरात गॅस एजन्सीच्या गोडाऊनमध्ये चक्क गॅस सिलिंडरची मोठी चोरी झाल्याचा

Weather Update: महाराष्ट्रातील ११ जिल्ह्यांना अलर्ट, ताशी ३० ते ५० किमी वेगाने वारे वाहणार

मुंबई: महाराष्ट्रावर ऐन उन्हाळ्यात अस्मानी संकट घोंघावत आहे. मार्च महिन्याच्या सुरुवातीला उष्णतेच्या लाटेने

लालपरीचा कायापालट, २२ हजार बसेस पूर्णपणे बदलणार; मंत्री सरनाईकांची माहिती

मुंबई : ग्रामीण महाराष्ट्राची लाईफलाईन मानली जाणारी लालपरी आता मोठ्या बदलाच्या दिशेने वाटचाल करत आहे. राज्य

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी, गॅस बुकींगनंतर ९६ तासांत सिलेंडर घरपोच होणार; जिल्हाधिकाऱ्यांचे एजन्सींना आदेश

पुणे: मराठी नववर्षारंभ म्हणजेच गुढी पाडव्याचा सण अवघ्या दोन-तीन दिवसांवर येऊन ठेपला असताना गॅस टंचाईमुळे