Ambarnath News : अंबरनाथचे काँग्रेसचे १२ नगरसेवक भाजपच्या वाटेवर; मोठी खळबळ

अंबरनाथ : अंबरनाथ नगरपालिकेच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली असून काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आलेल्या १२ नगरसेवकांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी ठाण्यातील पत्रकार परिषदेत ही अधिकृत माहिती दिली असून, येत्या दोन ते तीन दिवसांत हा भव्य प्रवेश सोहळा पार पडणार असल्याचे स्पष्ट केले आहे.



विकासासाठी भाजपचा पर्याय!


अंबरनाथ शहराच्या रखडलेल्या विकासाला गती देण्यासाठी आणि मतदारांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी आम्ही भाजपमध्ये जात आहोत, अशी भूमिका या नगरसेवकांनी घेतली आहे. विशेष म्हणजे, या पत्रकार परिषदेला काँग्रेसचे निलंबित ब्लॉक अध्यक्ष प्रदीप पाटील यांची उपस्थिती सर्वांचे लक्ष वेधून घेणारी ठरली. नगरसेवकांसोबतच काँग्रेसचे अनेक आजी-माजी पदाधिकारीही भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याने अंबरनाथमध्ये काँग्रेसची ताकद मोठ्या प्रमाणावर घटण्याची शक्यता आहे.



प्रदेशाध्यक्षांची दिशाभूल झाली - प्रदीप पाटील


नगरसेवकांची बाजू मांडताना प्रदीप पाटील म्हणाले की, "आम्ही केवळ शहराच्या हितासाठी 'अंबरनाथ विकास आघाडी' स्थापन केली होती. मात्र, काही घटकांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची दिशाभूल केली. पक्षाने आम्हाला विश्वासात न घेता थेट कारवाई केल्यामुळे आम्ही आता भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे." या राजकीय भूकंपामुळे अंबरनाथ नगरपालिकेत भाजपचे पारडे जड झाले असून आगामी काळात शहराच्या सत्तेची समीकरणे पूर्णपणे बदलणार आहेत.

Comments
Add Comment

निवडणूक प्रक्रियेत गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई

मुंबई : मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ अनुषंगाने गुरुवार, l १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान

मुंबई विद्यापीठात अत्याधुनिक सीओआरएस स्टेशन उभारणार

भारतीय सर्वेक्षण विभागासोबत सामंजस्य करार मुंबई : देशातील भू-स्थानिक तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण

वांद्र्यांतील रस्ते विकास महामंडळाच्या मुख्यालयावर फेब्रुवारीत हातोडा

पुनर्विकासातून ८ हजार कोटींचा महसूल अपेक्षित मुंबई : वांद्रे रेक्लेमेशन येथील महाराष्ट्र राज्य रस्ते विकास

उमेदवारांना अनावश्यक 'एनओसी'ची सक्ती का?

जनहित याचिकेवर आज मुंबई उच्च न्यायालयात तातडीची सुनावणी मुंबई : गरज नसतानाही निवडणूक निर्णय अधिकारी

मुंबईतील काही ठिकाणी मतदान केंद्रांत बदल

राजकीय पक्षांसह उमेदवारांना माहिती देण्याचे अतिरिक्त आयुक्त डॉ. अश्विनी जोशी यांचे निर्देश मुंबई : मुंबई

महापालिकेच्या शाळांमध्ये गळती कुठे, उबाठाला दिसते कुठे?

वाह रे वाह... पटसंख्या वाढवण्यासाठी दहावीनंतर बारावीपर्यंतचे कॉलेज सुरू करणार म्हणे उबाठा- मनसेचा वचननामा, आमचा